शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

Hingoli: शेतकऱ्याच्या मुलाने घातली आकाशाला गवसणी, पुरुषोत्तम बनला शास्त्रज्ञ

By यशवंत भीमराव परांडकर | Updated: February 25, 2024 14:31 IST

Hingoli News: जि. प. शाळेत शिक्षण घेऊन शास्त्रज्ञ होण्यापर्यंतचे शिक्षण पूर्ण करीत साकारलेल्या पेटंटला भारत सरकारची मंजुरी मिळवित शास्त्रज्ञ होण्याचा बहुमान पटकावला. त्यामुळे येथील शेतकरी कुटुंबातील मुलाच्या कामगिरीचे कौतुक होऊ लागले आहे.

- दिलीप कावरखेगोरेगाव (जि. हिंगोली) : जि. प. शाळेत शिक्षण घेऊन शास्त्रज्ञ होण्यापर्यंतचे शिक्षण पूर्ण करीत साकारलेल्या पेटंटला भारत सरकारची मंजुरी मिळवित शास्त्रज्ञ होण्याचा बहुमान पटकावला. त्यामुळे येथील शेतकरी कुटुंबातील मुलाच्या कामगिरीचे कौतुक होऊ लागले आहे.

पुरुषोत्तम शेषराव कावरखे याचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने जि. प. शाळेशिवाय दुसरा पर्याय नव्हता. प्राथमिक शिक्षण पहिले ते दहावी जि. प. शाळा गोरेगाव येथेच पूर्ण केले. नंतर पुढील शिक्षणासाठी पुरुषोत्तम याने वाशिम येथे प्रवेश घेत इयत्ता बारावी व ऑटोमोबाइल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले.

लहानपणापासून यांत्रिकीकरण आणि नवनवीन उपक्रम साकारण्याची आवड असल्याने अभ्यास करणे सुरू केले. यश पदरात पाडून घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत मिरची देठ कटिंग यंत्राची ओळख करून ते भारत सरकारच्या स्वाधीन केले. यावर भारत सरकारने अभ्यास करून २१ फेब्रुवारी रोजी ‘मिरची स्टेम कटिंग मशीन’ या यंत्रास मान्यता दिली. लहानपणापासून शेतीमध्ये येणाऱ्या अडचणींची आधीपासून जाणीव होती. त्यातूनच मिरचीचे देठ वेगळे करत असताना मुख्यत्वेकरून महिला कामगारांच्या आरोग्यावर मिरचीचा होत असलेला परिणाम लक्षात घेऊन यांत्रिकीकरणाची जोड देऊ शकतो, असा विचारही या विद्यार्थ्याने केला. सदर गोष्टीवर सातत्याने प्रयोग करत २०१६ मध्ये संशोधन करत असताना समाधानकारक परिणाम हाती आला. या अगोदर महिला कामगाराद्वारे मिरची देठ काढण्यामध्ये साधारण दिवसाला १० किलोपर्यंत काम केले जात होते. आता मशीनद्वारे अंदाजे चार ते पाच हजार किलोपर्यंत दिवसाला काम केले जाणार आहे. त्यासाठी हे संशोधन नामांकन करण्यासाठी भारत सरकारच्या पेटंट विभागाकडे २०१६ मध्ये देण्यात आले होते.

चार देशांनी केला होता दावा...तब्बल ८ वर्षे सतत यावर भारत सरकार पेटंट विभागासोबत वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास केला. त्यामध्ये बऱ्याच अडचणीला सामोरे जावे लागले. त्यातून मुख्यत्वेकरून कोरिया देशामधून दोन, जपान देशामधून एक आणि चीनमधून एक अशा एक नाहीत चार-चार देशांनी यावर दावा केला होता. सततच्या अभ्यासातून त्यांचा दावा फेटाळत शेवटी यावर मात करत संशोधन आपल्या नावावर करण्यात यश आले.

यानंतर आता भारत सरकार पेटंट विभागाद्वारे ‘मिरची देठ’ काढण्याचे यंत्राचे संशोधन कायमस्वरूपी पुरुषोत्तम शेषराव कावरखे गोरेगावकर याच्या नावावर करण्यात आले.

‘बायो बाईक’चा केला प्रयोग...या अगोदर इंजिनिअरिंग कॉलेजमधून त्यांनी ‘बायो बाईक’ नावाने यशस्वी प्रयोग केला होता. यामध्ये शेतातील ‘गोबरगॅस’वरती मोटारसायकल चालवण्याचा प्रयोग पूर्ण केला. सद्य:स्थितीत ‘गोबरगॅस’वरून मोटारसायकलबरोबरच कार, ट्रॅक्टर चालविण्यासाठी लागणार गॅस एका छोट्या यंत्राद्वारे प्रत्येक शेतकऱ्याला टँकमध्ये घराच्या घरी साठवता यावा आणि त्यावर शेतीपयोगी आणि गृहोपयोगीबरोबर सर्व स्वयंचलित यंत्रासाठी लागणारे इंधन आता प्रत्येकजण तयार करून शकेल. त्यामुळे शेतकऱ्यांचा पेट्रोल, डिझेल इंधनावरील बराच खर्च वाचणार आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रHingoliहिंगोली