शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

हेमंत पाटलांमुळेच बंडखोरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 00:12 IST

अपक्ष म्हणून मैदानात राहावे, असा आग्रह हेमंत पाटील यांचाही होता, असे सांगत बंडखोर उमेदवार अ‍ॅड. शिवाजी जाधव यांनी आपली तलवार म्यान केली. याबाबत अनेकांचे फोन व मेसेज होते, असे सांगत जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. जाधवांच्या या वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत(जि.हिंगोली) : अपक्ष म्हणून मैदानात राहावे, असा आग्रह हेमंत पाटील यांचाही होता, असे सांगत बंडखोर उमेदवार अ‍ॅड. शिवाजी जाधव यांनी आपली तलवार म्यान केली. याबाबत अनेकांचे फोन व मेसेज होते, असे सांगत जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. जाधवांच्या या वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे.हिंगोलीत शिवसेनेच्या वतीने डॉ. जयप्रकाश मुंदडा यांना उमेदवारी निश्चित झाल्याची अगोदर चर्चा होती. त्यामुळे त्यांच्यासाठीच जाधव यांच्या रुपाने खड्डा खोदण्याचे काम केले जात होते, अशी चर्चा रंगत होती. त्यातूनच जाधव अपक्ष राहण्यास तयार झाले. मात्र नाट्यमय घडामोडीत सेनेचे तिकीट हेमंत पाटील यांना जाहीर झाले. त्यामुळे सर्व चित्र बदलले. हेमंत पाटील जर उमेदवार नसते तर जाधव यांना अपक्ष राहण्यास त्यांचा पाठिंबा राहिला असता का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.विधानसभेसाठी मीच उमेदवारलोकसभा निवडणुकीसाठी भरलेला अपक्ष अर्ज मागे घेत असलो तरी विधानसभेसाठी मी उमेदवार राहीनच, असा सूचक इशारा देत जाधव यांनी अर्ज मागे घेणार असल्याची घोषणा केली. यावेळी मंत्री अर्जून खोतकर यांची उपस्थिती होती. शुक्रवारी खोतकर, संपर्क प्रमुख आनंद जाधव, उमेदवार हेमंत पाटील हे वसमत येथे जाधव यांची भेट घेण्यास आले होते. त्यांच्याशी चर्चा झाल्यावर जाधव यांनी वरील घोषणा केली.... म्हणून माघार -वडजेमी मराठा समाजाच्या काही संघटनांचा प्रमुख या नात्याने निवडणूक लढायची तयारी केली होती. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, उमेदवार हेमंत पाटील यांनी मतविभागणी होऊ नये, यासाठी माघारीची विनंती केली. त्यानुसार माघार घेतल्याचे मनीष वडजे यांनी सांगितले.हिंगोली लोकसभा मतदारसंघातून अ‍ॅड. जाधव यांनी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. मात्र ते ऐकत नव्हते. शेवटी मुलाच्या सोयरिकीसाठी पुण्याला जायचे असतानाही राज्यमंत्री खोतकर यांना मुख्यमंत्र्यांनी वसमतला पाठविले. अ‍ॅड. शिवाजी जाधव यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर जाधव यांनी अर्ज मागे घेण्याची घोषणा केली. तेव्हा जाधव यांनीही उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांनी मोठी जबाबदारी देण्याचे आश्वासन दिल्याचे नंतर पत्रकारांना सांगितले.अ‍ॅड.शिवाजी जाधव म्हणाले, ते वाक्य स्लीप आॅफ टंग होते. मला तसे म्हणायचे नव्हते. हेमंत पाटील यांचा नव्हे, कार्यकर्त्यांचा आग्रह होता. मात्र बोलण्याच्या ओघात चुकीने त्यांचे नाव तोंडात आले.त्यांना तसे म्हणायचे नव्हते-पाटीलते भाषणात बोलले मात्र त्यांना तसे बोलायचे नव्हते. त्यांच्या बोलण्याचा ‘तसा’ अर्थ नाही, अशी प्रतिक्रिया हेमंत पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. विशेष असे की, अ‍ॅड. जाधव यांनी ‘ते’ वाक्य उच्चारताच मंचावर असलेले संपर्क प्रमुख आनंद जाधव व त्यांच्या शेजारी बसलेल्यांमध्ये यावरून कुजबूज झाल्याचेही सर्वांनी पाहिले. यावरून शिवसेनेत सर्व काही आलबेल नव्हते, हे समोर आले आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकlok sabhaलोकसभा