शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
3
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
4
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
5
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
6
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
7
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
8
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
9
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
10
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
11
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
12
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
13
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
15
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
20
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज

उन्हाचा पारा गेला ४0 अंशांच्या पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 00:11 IST

यंदा आधीच दुष्काळी स्थिती असून उन्हाचा पाराही मार्च महिन्यातच ४0 अंश सेल्सियसच्या पुढे गेला आहे. त्यामुळे बाष्पीभवनानेही जलसाठ्यांतील पाणी कमी होत असून दुसरीकडे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : यंदा आधीच दुष्काळी स्थिती असून उन्हाचा पाराही मार्च महिन्यातच ४0 अंश सेल्सियसच्या पुढे गेला आहे. त्यामुळे बाष्पीभवनानेही जलसाठ्यांतील पाणी कमी होत असून दुसरीकडे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे.यंदा पावसाने आॅगस्ट महिन्यापासूनच दगा दिला. या महिन्यात १९ आॅगस्टदरम्यान मोठ्या पावसाने हजेरी तर लावली. मात्र त्यानंतर सप्टेंबर, आॅक्टोबर पूर्णपणे कोरडे गेले. तरीही हिवाळ्याचा काळ मात्र लांबला होता. पार फेब्रुवारी महिन्यापर्यंत थंडीचा कडाका जाणवत होता. मार्चमध्ये वातावरण बदलले. हळूहळू सूर्य आग ओकत होता. आता ४0 अंश सेल्सियसच्या पुढे पारा सरकला आहे. दुपारच्या वेळी घराबाहेरही पडणे मुश्किल झाले आहे. त्याचा शेतीच्या कामांवरही परिणाम होत आहे. यंदा दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता लग्नसराई फारसी दिसत नाही. कदाचित निवडणुकांचाही परिणाम त्यावर झाला आहे. मात्र १८ एप्रिलला मतदान झाल्यानंतर प्रचारकार्य संपणार आहे. त्यानंतर लग्न समारंभांची रेलचेल वाढू शकते. परंतु टंचाईचा काळ लक्षात घेता अनेकांनी जानेवारी, फेब्रुवारीमध्येच विवाह सोहळे आटोपल्याचेही दिसत होते. त्यामुळे प्रवासातील या उन्हाच्या त्रासापासूनही वºहाडी मंडळींची मुक्तता करता आली.मे महिन्यात तर लग्न समारंभांना उन्हासह पाणीटंचाईचाही फटका सोसावा लागू शकतो. रबीचे पीकही घेता आले नाही.काही भागात आॅगस्टच्या पाण्यावरच तलाव भरले अन् त्यावर रबीचे पीक घेतले. मात्र इतरत्र वाळवंटासारखे ओसाड शेतशिवार आहेत.मजुरांचेही मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले आहे. लोकसभा निवडणुकीचा हंगाम सुरू झाला तरीही अजून हा मजूरवर्ग बाहेरच असल्याचे दिसत आहे.अनेक ठिकाणी सेवाभावी वृत्तीतून काही सामाजिक कार्य करणाऱ्या मंडळींनी पाणपोईची उभारणी केली असल्याचे दिसत आहे. या पाणपोईवर पूर्वीप्रमाणे आता माठ व पाणी वितरण करायला माणूस असे चित्र दिसत नाही. आता थंड पाण्याचे जार आणून ठेवले जात आहेत. काही ठिकाणीच जुन्या परंपरेप्रमाणे माठ आहेत. त्यात पाणी आणून टाकले जाते. मात्र जार ठेवणाऱ्यांना सरासरी २0 पेक्षा जास्त जार ठेवावे लागत आहेत. निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या दिवशी तर २0 जार दुपारीच संपले होते. पुन्हा तेवढेच मागण्याची वेळ आली होती.यंदाच्या उन्हाळ्यात सोसाट्याचा वारा व वावटळींचा मोठा त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच रस्त्यांची कामे सुरू असल्याने धुळीच्या लोटांनी जनता नैसर्गिक कारणानेच हैराण झाली आहे.

टॅग्स :Natureनिसर्गTemperatureतापमान