शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाचा पारा गेला ४0 अंशांच्या पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 00:11 IST

यंदा आधीच दुष्काळी स्थिती असून उन्हाचा पाराही मार्च महिन्यातच ४0 अंश सेल्सियसच्या पुढे गेला आहे. त्यामुळे बाष्पीभवनानेही जलसाठ्यांतील पाणी कमी होत असून दुसरीकडे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : यंदा आधीच दुष्काळी स्थिती असून उन्हाचा पाराही मार्च महिन्यातच ४0 अंश सेल्सियसच्या पुढे गेला आहे. त्यामुळे बाष्पीभवनानेही जलसाठ्यांतील पाणी कमी होत असून दुसरीकडे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे.यंदा पावसाने आॅगस्ट महिन्यापासूनच दगा दिला. या महिन्यात १९ आॅगस्टदरम्यान मोठ्या पावसाने हजेरी तर लावली. मात्र त्यानंतर सप्टेंबर, आॅक्टोबर पूर्णपणे कोरडे गेले. तरीही हिवाळ्याचा काळ मात्र लांबला होता. पार फेब्रुवारी महिन्यापर्यंत थंडीचा कडाका जाणवत होता. मार्चमध्ये वातावरण बदलले. हळूहळू सूर्य आग ओकत होता. आता ४0 अंश सेल्सियसच्या पुढे पारा सरकला आहे. दुपारच्या वेळी घराबाहेरही पडणे मुश्किल झाले आहे. त्याचा शेतीच्या कामांवरही परिणाम होत आहे. यंदा दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता लग्नसराई फारसी दिसत नाही. कदाचित निवडणुकांचाही परिणाम त्यावर झाला आहे. मात्र १८ एप्रिलला मतदान झाल्यानंतर प्रचारकार्य संपणार आहे. त्यानंतर लग्न समारंभांची रेलचेल वाढू शकते. परंतु टंचाईचा काळ लक्षात घेता अनेकांनी जानेवारी, फेब्रुवारीमध्येच विवाह सोहळे आटोपल्याचेही दिसत होते. त्यामुळे प्रवासातील या उन्हाच्या त्रासापासूनही वºहाडी मंडळींची मुक्तता करता आली.मे महिन्यात तर लग्न समारंभांना उन्हासह पाणीटंचाईचाही फटका सोसावा लागू शकतो. रबीचे पीकही घेता आले नाही.काही भागात आॅगस्टच्या पाण्यावरच तलाव भरले अन् त्यावर रबीचे पीक घेतले. मात्र इतरत्र वाळवंटासारखे ओसाड शेतशिवार आहेत.मजुरांचेही मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले आहे. लोकसभा निवडणुकीचा हंगाम सुरू झाला तरीही अजून हा मजूरवर्ग बाहेरच असल्याचे दिसत आहे.अनेक ठिकाणी सेवाभावी वृत्तीतून काही सामाजिक कार्य करणाऱ्या मंडळींनी पाणपोईची उभारणी केली असल्याचे दिसत आहे. या पाणपोईवर पूर्वीप्रमाणे आता माठ व पाणी वितरण करायला माणूस असे चित्र दिसत नाही. आता थंड पाण्याचे जार आणून ठेवले जात आहेत. काही ठिकाणीच जुन्या परंपरेप्रमाणे माठ आहेत. त्यात पाणी आणून टाकले जाते. मात्र जार ठेवणाऱ्यांना सरासरी २0 पेक्षा जास्त जार ठेवावे लागत आहेत. निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या दिवशी तर २0 जार दुपारीच संपले होते. पुन्हा तेवढेच मागण्याची वेळ आली होती.यंदाच्या उन्हाळ्यात सोसाट्याचा वारा व वावटळींचा मोठा त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच रस्त्यांची कामे सुरू असल्याने धुळीच्या लोटांनी जनता नैसर्गिक कारणानेच हैराण झाली आहे.

टॅग्स :Natureनिसर्गTemperatureतापमान