शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वित्त आयोगाची अर्धी रक्कम वीज थकबाकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 00:54 IST

महानगर पालिका, नगर पालिका, जिल्हा परिषद आणि ग्राम पंचायतीसह विविध पाणी पुरवठा योजनांच्या ३० मार्च २०१८ पर्यंतच्या थकीत वीज बिलापोटी ५० टक्के रक्कम १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून देण्याचा शासन आदेश धडकला आहे. यामुळे एकीकडे पालिकांचे विकासाचे बजेट बिघणार असले तरीही भविष्यात पाणीपुरवठ्याची वीज कापण्याचे प्रकार थांबतील.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महानगर पालिका, नगर पालिका, जिल्हा परिषद आणि ग्राम पंचायतीसह विविध पाणी पुरवठा योजनांच्या ३० मार्च २०१८ पर्यंतच्या थकीत वीज बिलापोटी ५० टक्के रक्कम १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून देण्याचा शासन आदेश धडकला आहे. यामुळे एकीकडे पालिकांचे विकासाचे बजेट बिघणार असले तरीही भविष्यात पाणीपुरवठ्याची वीज कापण्याचे प्रकार थांबतील.पाणीपुरवठा आणि पथदिव्यांची कोट्यवधीची देयके थकित असलेल्या राज्यात अनेक महानगर पालिका, नगर पालिका, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीही आहेत. एवढेच नव्हे, तर थकीत रक्कम भरण्याचे पुढे नावच न घेतल्याने दंड आणि व्याजाची रक्कमही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. काहींनी चालू देयक भरण्याचा फंडा शोधला होता. मात्र काही दिवसांपासून महावितरण यात सक्तीची भूमिका घेत असल्याने अडचणी होत होत्या. अनेक ठिकाणी वीज कापल्याने पाणी बंद व शहरात अंधार होत होता. यावर मात करण्यासाठी १४ व्या वित्त आयोगातून ५0 टक्के रक्कम शासनच थेट महावितरणला देणार आहे. तर उर्वरित रक्कम भरण्यासाठी महावितरणने सुलभ हफ्ते पाडून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सदर ५० टक्के रक्कम भरल्यानंतर उर्वरित रक्कम महावितरणला भरणे संबंधित संस्थेस बंधनकारक राहणार आहे. विशेष बाब म्हणजे ग्रामविकास विभागामार्फत भरण्यात येणारी ५० टक्के रक्कम ही शासन स्तरावर परस्पर भरण्यात येणार आहे. मराठवाड्यासह राज्यभरात अनेक स्थानिक संस्थांचे वीज देयके आणि व्याज व दंड रक्कम मोठ्या प्रमाणात थकलेली असून या निर्णयामुळे मोठा फायदा होणार आहे.हिंगोलीत बैठकया निर्णयाच्या पार्श्वभूमिवर न.प.त मुख्याधिकारी रामदास पाटील, उपअभियंता डी.ई.पिसे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यात व्याज व दंड माफ करून थकित वीजबिलाची रक्कम किती आहे, याची माहिती घेण्याचे ठरले. पाणीपुरवठा व पथदिवे दोन्हींच्याही थकबाकीचा यात विचार होणार आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीmahavitaranमहावितरण