शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

जिल्ह्यात लाखोंचा गुटखा; अन्न प्रशासन अधिकारी सुस्तच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:29 IST

हिंगोली : जिल्हा पोलिसांनी लाखो रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त करून कारवाईचा सपाटा लावला आहे. ही कारवाई अन्न प्रशासन विभागाने ...

हिंगोली : जिल्हा पोलिसांनी लाखो रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त करून कारवाईचा सपाटा लावला आहे. ही कारवाई अन्न प्रशासन विभागाने करणे अपेक्षित असताना, या विभागातील अधिकारी मात्र परभणीहून गाडा हाकत आहेत. त्यामुळे गुटखा विक्रेत्यांचे फावत आहे.

जिल्ह्यात काही महिन्यांपासून गुटखा विक्रेते सक्रिय झाले आहेत. दररोज लाखो रुपयांचा गुटखा सर्रास विक्री केला जात आहे. साध्या पानटपरी, किराणा दुकानावरही सहज गुटखा मिळत आहे. शासनाने गुटखा विक्रीवर बंदी घातली असताना, जिल्ह्यात मात्र लाखो रुपयांचा गुटखा येत आहे. शेवटच्या विक्रेत्यापर्यंत गुटखा पोहोचती करण्यासाठी साखळीच असल्याचे दिसून येत आहे. अन्न प्रशासन विभागाने गुटखा विक्रेत्यावर कारवाई करणे अपेक्षित असताना, या विभागातील अधिकारी मात्र परभणीहून गाडा हाकत आहेत. मागील काही महिन्यांत या विभागाकडून एकाही गुटखा विक्रेत्यावर कारवाई झाल्याचे ऐकीवात नाही. त्यामुळेच गुटखा विक्रेत्यांचे फावत आहे. पोलिसांनीच अवैध धंद्याविरुद्ध कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. पोलिसांच्या कारवाईमुळेच गुटखा विक्रेत्यांवर थोडा वचक बसल्याचे पाहावयास मिळत आहे. ११ एप्रिल रोजी हिंगोली शहरातील तलाबकट्टा भागातून ३ लाख ३० हजार ७२० रुपयांचा गुटखा पकडून कारवाई केली. त्यानंतर, वसमत येथे आठ दिवसांत तीन कारवाया करण्यात आल्या. १६ एप्रिल रोजी जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई करीत, पोलिसांनी गुटख्यासह तब्बल ४३ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस लाखो रुपयांचा गुटखा पकडत असताना, अन्न प्रशासन विभागातील अधिकारी जिल्ह्यात साधे फिरकतही नसल्याने, त्यांच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. या संदर्भात परभणी येथील अन्न प्रशासन विभागाच्या कार्यालयातील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही.

अन्नपदार्थ भेसळीकडेही दुर्लक्ष

जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अनेक अन्नपदार्थ विक्रेते भेसळयुक्त पदार्थ विक्री करण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही व्यापारी तर अन्न पदार्थांची चढ्या दराने विक्री करीत असल्याच्या तक्रारी येत आहेत. असे असतानाही अन्न प्रशासन विभागातील अधिकारी कोणतीही कारवाई करीत नसल्याचा आरोप होत आहे. हिंगोली जिल्ह्यात स्वतंत्र अन्न व औषध प्रशासन विभागाचे कार्यालय स्थापन करावे, अशी मागणीही होत आहे.