शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
5
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
6
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
7
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
8
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
9
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
10
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
11
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
12
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
13
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
14
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
15
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
16
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
17
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
18
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
19
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
20
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 

ग्रामपंचायत निवडणुकीत जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींचा लागणार कस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:21 IST

हिंगोली जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका या पक्षीय चिन्हावर लढल्या जात नसल्या तरीही बड्या पुढाऱ्यांचे निष्ठावंतच त्यांचे प्रतिनिधी म्हणून गावपातळीवर काम ...

हिंगोली जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका या पक्षीय चिन्हावर लढल्या जात नसल्या तरीही बड्या पुढाऱ्यांचे निष्ठावंतच त्यांचे प्रतिनिधी म्हणून गावपातळीवर काम करीत असतात. याचा परिणाम म्हणून प्रत्यक्ष राजकीय पक्षांचा सहभाग नसला तरीही राजकीयदृष्ट्या गावातील निवडणुकीचे निकालही तेवढेच महत्त्वाचे असतात. या निवडणुकीत जवळपास सर्वच जि.प. पदाधिकाऱ्यांच्या सर्कलमध्ये निवडणुका आहेत. आगामी जि.प. व पं.स. निवडणुकांत फायदेशीर लोकांसाठी ही मंडळी काम करील, असे दिसते.

जिल्हा परिषद अध्यक्षांचा पेडगाव गट

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले यांचा मूळ गट खेर्डा असला तरीही ते आरक्षणामुळे पेडगाव गटात लढले व ४०० मताधिक्याने निवडून आले. आता या दोन्ही गटांतील जवळपास २४ ते २५ ग्रामपंचायतींची निवडणूक आहे. शिवसेना व काँग्रेसचे प्राबल्य असलेला हा भाग आहे. बेले यांच्या खेर्डावाडी गावात कायम बिनविरोध निवड होते. यंदा खेर्डा ग्रा.पं. बिनविरोधच्या हालचाली सुरू आहेत.

जि.प. उपाध्यक्षांचा येहळेगाव सोळंके गट

येहळेगाव सोळंके गटातून आधी पत्नी व आता स्वत: ७५० मताधिक्याने निवडून आलेले मनीष आखरे उपाध्यक्ष आहेत. त्यांच्या म्हाळसापूर गावात यावेळीही बिनविरोधसाठी प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या ताब्यात अनेक ग्रामपंचायती आहेत. यावेळी बिनविरोधचे प्रयत्न अनेक ठिकाणी होत असून, यात यश न आल्यास लढती होतील.

शिक्षण सभापतींचा हट्टा जि. प. गट

हट्टा जि.प. गटातून १८० च्या मताधिक्याने निवडून आलेल्या रत्नमाला प्रभाकर चव्हाण यांच्या गटातील सात ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. त्यांचे गाव असलेल्या तुळजापूरवाडीत मागच्या वेळी बिनविरोध निवडणूक झाली. यंदाही तेच प्रयत्न आहेत. इतरत्र सेना, भाजप व राकाँमध्ये लढती दिसत आहेत.

समाजकल्याण सभापतींचा खरवड गट

समाजकल्याण सभापती फकिरा मुंडे हे खरवड गटातून ६५० मतांनी निवडून आले. मात्र, त्यांचे हिवरा बेल गाव कोथळज गटात येते. येथे बिनविरोध निवड होते. मात्र, एका प्रभागात निवडणुकीची शक्यता आहे. खरवडमध्ये शिवसेना व काँग्रेसमध्येच लढती पाहायला मिळतात.

महिला व बालकल्याण सभापतींचा गोरेगाव गट

जिल्ह्याची राजकीय राजधानी मानल्या जाणाऱ्या गोरेगाव जि.प. गटाच्या रूपाली पाटील या हजारावर मतांनी निवडून आल्या आहेत. या गावात ग्रा.पं.मध्ये त्यांचे प्राबल्य आहे. मात्र, यंदा शिवसेना व काँग्रेसला मिळून भाजपशीही लढत द्यावी लागेल, असे दिसते, तर सर्कलमध्ये इतरत्र सेना व काँग्रेसच्या लढतींची शक्यता आहे.