शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

ग्रामपंचायतच्या निवडणूक प्रचारात रंगत वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:17 IST

सध्या सर्वच गावात निवडणुकीची रंगत वाढलेली पहायला मिळत आहे. प्रत्येक गावात प्रचार जोरात सुरु आहे. गावपातळीवरील वातावरण चांगलेच तापलेले ...

सध्या सर्वच गावात निवडणुकीची रंगत वाढलेली पहायला मिळत आहे. प्रत्येक गावात प्रचार जोरात सुरु आहे. गावपातळीवरील वातावरण चांगलेच तापलेले आहे. सर्वच उमेदवार व त्यांचे समर्थक मतदारांशी संपर्क करीत आहेत. उमेदवार आश्वासनांची खैरात देत आहेत. कार्यकर्ते सांभाळता सांभाळता गाव पुढाऱ्याची मात्र चांगलीच दमछाक होताना दिसून येत आहे.

प्रत्येक प्रतिस्पर्धी उमेदवार व त्यांचे पॅनलप्रमुखही निवडणूक प्रतिष्ठेची समजत आहेत. आम्ही निवडून आल्यानंतर गावाचा सर्वांगीण विकास करू गावाचा कायापालट करू, अशी भाषा बोलत आहेत. गावातील अंतर्गत रस्ते, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, नाल्याचा प्रश्न, सर्वच समाजासाठी सामाजिक सभागृह, मागेल त्याला घरकुल आदी विकासकामे खेचून आणूत, अशी पोकळ आश्वासने सर्वच उमेदवार मतदारांना देत आहेत.

सर्वच उमेदवार प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या प्रचार यंत्रणेवर नजर ठेवून आहेत. आपण कुठे कमी पडतो का ? याची चाचपणी ते करीत आहेत. सध्या प्रत्येक गावातील वातावरण चांगलेच तापले असून आपणच निवडून येतो, अशी फुशारकी प्रत्येक उमेदवार मतदारांसमोर मारत आहेत. सर्वजण विकासाच्या आणाभाका घेत असल्यामुळे मतदान कोणाला करावे, असा प्रश्न मतदारांसमोर पडला आहे. प्रत्येक मतदारांची उमेदवार आस्थेवाईकपणे चौकशी करीत आहेत. बाहेरगावी किती मतदार गेलेले आहेत, त्यांच्याशी उमेदवार व त्यांचे समर्थक संपर्क करीत आहेत. प्रत्येक पक्षाचे वरिष्ठ नेते मात्र प्रचारापासून दूर असल्याचे दिसून येत आहेत. प्रत्येक उमेदवार व त्यांच्या पॅनलप्रमुखाच्या तोंडातून विकासाची भाषा बोलल्या जात आहे. गुण्यागोविंदाने राहणारे आज मात्र एकमेकापासून अबोला धरीत आहेत. निवडणुका येतात व जातात ग्रामस्थांनी मात्र निवडणुकीपुरता विरोध करून नंतर गुण्यागोविंदाने गावात राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे.