शहरं
Join us  
Trending Stories
1
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
2
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
3
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
4
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
5
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
6
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
7
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
8
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
9
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
10
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
11
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
12
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
13
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
14
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
15
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
16
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
17
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
18
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान
19
RCB समोर पंजाबी शेर ढेर! रडत खडत शंभरी गाठली; पण PBKS च्या नावे झाला हा लाजिरवाणा विक्रम
20
"पाकिस्तानच्या गोळीबारामुळे बाधित पूंछ आणि इतर भागांसाठी मदत पॅकेज...", राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र

ग्रामपंचायतच्या निवडणूक प्रचारात रंगत वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:17 IST

सध्या सर्वच गावात निवडणुकीची रंगत वाढलेली पहायला मिळत आहे. प्रत्येक गावात प्रचार जोरात सुरु आहे. गावपातळीवरील वातावरण चांगलेच तापलेले ...

सध्या सर्वच गावात निवडणुकीची रंगत वाढलेली पहायला मिळत आहे. प्रत्येक गावात प्रचार जोरात सुरु आहे. गावपातळीवरील वातावरण चांगलेच तापलेले आहे. सर्वच उमेदवार व त्यांचे समर्थक मतदारांशी संपर्क करीत आहेत. उमेदवार आश्वासनांची खैरात देत आहेत. कार्यकर्ते सांभाळता सांभाळता गाव पुढाऱ्याची मात्र चांगलीच दमछाक होताना दिसून येत आहे.

प्रत्येक प्रतिस्पर्धी उमेदवार व त्यांचे पॅनलप्रमुखही निवडणूक प्रतिष्ठेची समजत आहेत. आम्ही निवडून आल्यानंतर गावाचा सर्वांगीण विकास करू गावाचा कायापालट करू, अशी भाषा बोलत आहेत. गावातील अंतर्गत रस्ते, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, नाल्याचा प्रश्न, सर्वच समाजासाठी सामाजिक सभागृह, मागेल त्याला घरकुल आदी विकासकामे खेचून आणूत, अशी पोकळ आश्वासने सर्वच उमेदवार मतदारांना देत आहेत.

सर्वच उमेदवार प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या प्रचार यंत्रणेवर नजर ठेवून आहेत. आपण कुठे कमी पडतो का ? याची चाचपणी ते करीत आहेत. सध्या प्रत्येक गावातील वातावरण चांगलेच तापले असून आपणच निवडून येतो, अशी फुशारकी प्रत्येक उमेदवार मतदारांसमोर मारत आहेत. सर्वजण विकासाच्या आणाभाका घेत असल्यामुळे मतदान कोणाला करावे, असा प्रश्न मतदारांसमोर पडला आहे. प्रत्येक मतदारांची उमेदवार आस्थेवाईकपणे चौकशी करीत आहेत. बाहेरगावी किती मतदार गेलेले आहेत, त्यांच्याशी उमेदवार व त्यांचे समर्थक संपर्क करीत आहेत. प्रत्येक पक्षाचे वरिष्ठ नेते मात्र प्रचारापासून दूर असल्याचे दिसून येत आहेत. प्रत्येक उमेदवार व त्यांच्या पॅनलप्रमुखाच्या तोंडातून विकासाची भाषा बोलल्या जात आहे. गुण्यागोविंदाने राहणारे आज मात्र एकमेकापासून अबोला धरीत आहेत. निवडणुका येतात व जातात ग्रामस्थांनी मात्र निवडणुकीपुरता विरोध करून नंतर गुण्यागोविंदाने गावात राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे.