शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

गोडतेलाने दीडशेचा टप्पा गाठल्याने फोडणी करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कौठा : मागील काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. त्यामुळे सतत टाळेबंदीची टांगती तलवार आहे. सर्वसामान्य ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कौठा : मागील काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. त्यामुळे सतत टाळेबंदीची टांगती तलवार आहे. सर्वसामान्य माणूस त्रस्त असताना पुन्हा एकदा जीवनाश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. गोडतेलाने दीडशेचा टप्पा गाठल्याने फोडणीला तेलही मिळेना झाले आहे.

किराणा बाजारात सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्याने गृहिणींचे गणित कोलमडले आहे. प्रत्येक घरातील कमावत्या व्यक्तीचे आर्थिक समीकरणही बिघडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांपासून सतत खाद्यतेलाचे भाव वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी गोडतेल शंभर रुपये झाल्याने चिंता व्यक्त होत होती. आता तर ग्रामीण भागात खाद्यतेलाने दीडशेचा टप्पा गाठल्याने सर्वसामान्यांना तेल मिळणेही अवघड होऊन बसले आहे.

दररोज खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी खाद्यतेल महत्त्वाचा घटक आहे. तळण पदार्थ टाळले तरी भाजीची फोडणी व चपातीसाठी गोडतेल आवश्यक आहे. सद्यस्थितीत सोयाबीन ठोक भाव १४५ ते १४८ रुपये झाल्याने ग्रामीण भागात सरासरी प्रतिकिलो भाव दीडशे रुपये झाला आहे. साखर ३६ रुपये ते ४० रुपये किलो, शेंगदाणे ११० ते १२० रुपये किलोने विकले जात आहेत. चहापत्ती ३९० ते ४२० रुपये प्रतिकलो दराने विकली जात आहे. त्यामुळे महागाईच्या काळात चहा पिणेसुद्धा न परवडणारे झाले आहे.

प्रतिक्रिया:

खाद्यतेलासह एकूण होत असलेल्या भाववाढीबाबत गृहिणी आपला रोष व्यक्त करत आहेत. गोडतेल दीडशे रुपये झाले आहे. त्यामुळे सर्व गणित बिघडले आहे. महागाईने कळस गाठला आहे. खाद्यतेलाचे भाव कमी होणे गरजेचे आहे.

- शांताबाई ज्ञानदेव खराटे, कौठा