शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

लिपस्टिक नव्हे मास्कला महत्त्व द्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:22 IST

हिंगोली : कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. मास्कमुळे लिपस्टिकची विक्री कमी होत असली तरी, या काळात लिपस्टिक ...

हिंगोली : कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. मास्कमुळे लिपस्टिकची विक्री कमी होत असली तरी, या काळात लिपस्टिक महत्त्वाचे नसून मास्क महत्त्वाचा आहे, अशी प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केली.

कोरोनामुळे शहरातील सर्वच दुकाने आजमितीस बंद आहेत. जे दुकानदार दुकाने उघडतील त्यांना दंड लावला जात आहे. त्यामुळे काॅस्मेटिकचा बाजार थंडावला आहे. दुसरीकडे कोणताही समारंभ करायचा असेल तर मोजकेच अन्‌ तेही २५ माणसे समारंभात असायला पाहिजे, अशी अट आहे. त्यातही प्रत्येकाने मास्क घालणे आवश्यक आहे.

लिपस्टिक शोभेची वस्तू नसून सौंदर्याचाचं भाग असल्याचे काही महिलांनी सांगितले. लिपस्टिकपेक्षा महिलावर्गांनी कोरोना काळात मास्कला प्रथम प्राधान्य द्यावे. आरोग्य चांगले तर बाकी सर्व काही चांगले, असे महिलांचे मत आहे.

प्रतिक्रिया

२४ तास घरातच, मग ब्यूटिपार्लर हवे कशाला?

कोरोना महामारीमुळे २४ तास घरातच बसावे लागत आहे. कोणता सण नाही, उत्सव नाही. घरातील कामेच संपत नाहीत. घरामध्ये राहून लिपस्टिक लावणे योग्यही नाही. मग ब्यूटिपार्लर हवे कशाला, असा प्रश्न काही महिलांनी उपस्थित केला.

सॅनिटायझरचा वापर करा, गर्दीत जाणे टाळा...

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शहरातील सर्वच दुकाने बंद आहेत. लिपस्टिक सौंदर्याचा भाग असला तरी आरोग्याला आधी महत्त्व द्या. लिपस्टिकपेक्षा मास्क, सॅनिटायझरचा वापर करा, गर्दीत जाणे टाळा.

- स्मिता बंडाळे, ब्यूटिपार्लरचालक

संचारबंदीमुळे दुकाने बंदच आहेत...

सध्या दुकाने बंद आहेत. एखादा समारंभ असल्यास काही महिला लिपस्टिक खरेदीसाठी येऊन जातात. एकंदर लिपस्टिकची विक्री कमी असल्याचे दुकानदारांनी सांगितले.

मास्कचा वापर करा

कोरोनाने सर्वत्र हाहाकार उडवून दिला आहे. दिवसागणिक मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. तेव्हा लिपस्टिक महत्त्वाचे नसून मास्क महत्त्वाचा आहे.

-विद्या लाखकर

गर्दीत जाणे टाळावे

आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर मास्कचा वापर करणे हे योग्यच आहे. आरोग्य विभागानेही मास्क वापरण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. तेव्हा महिलांनी मास्कचा वापर करावा.

-शीतल दन्नर