शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

मुलींचे वसतिगृह पुन्हा चर्चेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : निधी परत जाण्याच्या भीतीने प्रशासनाकडूनच मुलींच्या वसतिगृहाचे काम जि.प. शाळेच्या मैदानावरील जागा निश्चित न ...

ठळक मुद्देहिंगोली जि.प.च्या स्थायी समितीची बैठक : प्रशासनालाच कामाची घाई का?

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : निधी परत जाण्याच्या भीतीने प्रशासनाकडूनच मुलींच्या वसतिगृहाचे काम जि.प. शाळेच्या मैदानावरील जागा निश्चित न करताच रेटण्याची घाई का होत आहे, असा सवाल स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी केला.जि.प.अध्यक्षा शिवराणी नरवाडे यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीस सीईओ एच.पी.तुम्मोड, उपाध्यक्ष अनिल पतंगे, सभापती प्रल्हाद राखोंडे, संजय देशमुख, रेणूका जाधव, अति.मुकाअ ए.एम.देशमुख यांची उपस्थिती होती. यावेळी गटनेते अंकुश आहेर यांनी दुर्धर आजारावर मदतीसाठी १८१ अर्ज आले असताना मागील दीड वर्षापासून बैठक झाली नसल्याचे समोर आणले. तर यात दहा लाखांची तरतूद असून पुनर्विनियोजनात आणखी दहा लाखांची मागणी केली. प्रशासनाकडून उत्तर देताना यात १२८ पात्र लाभार्थी असून त्यांना दहा हजार प्रत्येकी मदत देण्यात येईल. येत्या सात दिवसांत हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन देण्यात आले. विषय समित्यांच्या अनुपालन अहवालाबातही सर्वच सदस्यांनी आक्रमकपणे मागणी केली. तर जि.प.सदस्य अजित मगर यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेत अजूनही ३६ कोटी शिल्लक आहेत. वारंवार मागणी करूनही रक्कम मिळत नाही. वरिष्ठ अधिकाºयांनी त्यासाठी काहीच पाठपुरावा का केला नाही, असा सवाल करण्यात आला. कृषी अधिकारी खंदारे हे गुणनियंत्रण निरीक्षक आहेत. बोंडअळीच्या आक्रमणानंतरही त्यांनी काहीच काम केले नाही. त्यांच्यावर कारवाईची मागच्या बैठकीत मागणी केली तर आज त्यांना ऐनवेळी नोटीस दिली. त्यामुळे केवळ ठरावांना उत्तरे देण्याचीच कामे होत असल्याचा आरोपही सदस्यांनी केला. यात जि.प.त किती ठराव झाले. त्यांचा काय पाठपुरावा केला जातो, असे संजय कावरखे यांनी विचारले. तर आहेर यांनी किती विकासकामांच्या गंभीर तक्रारी झाल्या, त्यापैकी निपटारा कितींचा बाकी आहे, हे स्थायीसमोर मांडण्यास सांगितले. मात्र अनेक विभागांकडे अशा तक्रारीच नव्हत्या. तर मुलींच्या वसतिगृहांचा प्रश्नही त्यांनी आक्रमकपणे मांडला. यात जि.प.त ठराव झाला की दुसºयाच दिवशी काम सुरू झाले. त्याला मार्क आऊट कुणी दिले, मोक्याची जागा द्यायची नाही, हे ठरल्यावरही मोक्याच्या जागेवरच काम कसे सुरू झाले, याबाबत विचारणा केली. तर मुख्य अभियंत्यांना याबाबत चर्चा करण्याचे ठरले असता दूरध्वनीच लागला नाही.