शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

मुलींचे वसतिगृह पुन्हा चर्चेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : निधी परत जाण्याच्या भीतीने प्रशासनाकडूनच मुलींच्या वसतिगृहाचे काम जि.प. शाळेच्या मैदानावरील जागा निश्चित न ...

ठळक मुद्देहिंगोली जि.प.च्या स्थायी समितीची बैठक : प्रशासनालाच कामाची घाई का?

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : निधी परत जाण्याच्या भीतीने प्रशासनाकडूनच मुलींच्या वसतिगृहाचे काम जि.प. शाळेच्या मैदानावरील जागा निश्चित न करताच रेटण्याची घाई का होत आहे, असा सवाल स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी केला.जि.प.अध्यक्षा शिवराणी नरवाडे यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीस सीईओ एच.पी.तुम्मोड, उपाध्यक्ष अनिल पतंगे, सभापती प्रल्हाद राखोंडे, संजय देशमुख, रेणूका जाधव, अति.मुकाअ ए.एम.देशमुख यांची उपस्थिती होती. यावेळी गटनेते अंकुश आहेर यांनी दुर्धर आजारावर मदतीसाठी १८१ अर्ज आले असताना मागील दीड वर्षापासून बैठक झाली नसल्याचे समोर आणले. तर यात दहा लाखांची तरतूद असून पुनर्विनियोजनात आणखी दहा लाखांची मागणी केली. प्रशासनाकडून उत्तर देताना यात १२८ पात्र लाभार्थी असून त्यांना दहा हजार प्रत्येकी मदत देण्यात येईल. येत्या सात दिवसांत हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन देण्यात आले. विषय समित्यांच्या अनुपालन अहवालाबातही सर्वच सदस्यांनी आक्रमकपणे मागणी केली. तर जि.प.सदस्य अजित मगर यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेत अजूनही ३६ कोटी शिल्लक आहेत. वारंवार मागणी करूनही रक्कम मिळत नाही. वरिष्ठ अधिकाºयांनी त्यासाठी काहीच पाठपुरावा का केला नाही, असा सवाल करण्यात आला. कृषी अधिकारी खंदारे हे गुणनियंत्रण निरीक्षक आहेत. बोंडअळीच्या आक्रमणानंतरही त्यांनी काहीच काम केले नाही. त्यांच्यावर कारवाईची मागच्या बैठकीत मागणी केली तर आज त्यांना ऐनवेळी नोटीस दिली. त्यामुळे केवळ ठरावांना उत्तरे देण्याचीच कामे होत असल्याचा आरोपही सदस्यांनी केला. यात जि.प.त किती ठराव झाले. त्यांचा काय पाठपुरावा केला जातो, असे संजय कावरखे यांनी विचारले. तर आहेर यांनी किती विकासकामांच्या गंभीर तक्रारी झाल्या, त्यापैकी निपटारा कितींचा बाकी आहे, हे स्थायीसमोर मांडण्यास सांगितले. मात्र अनेक विभागांकडे अशा तक्रारीच नव्हत्या. तर मुलींच्या वसतिगृहांचा प्रश्नही त्यांनी आक्रमकपणे मांडला. यात जि.प.त ठराव झाला की दुसºयाच दिवशी काम सुरू झाले. त्याला मार्क आऊट कुणी दिले, मोक्याची जागा द्यायची नाही, हे ठरल्यावरही मोक्याच्या जागेवरच काम कसे सुरू झाले, याबाबत विचारणा केली. तर मुख्य अभियंत्यांना याबाबत चर्चा करण्याचे ठरले असता दूरध्वनीच लागला नाही.