शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

भाजीमंडईत कचऱ्याची ढीगारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:25 IST

विरुद्ध दिशेने वाहतूक सुरूच हिंगोली: शहरातील गांधी चौक, महावीर चौक, बस स्थानक परिसर, नांदेड नाका आदी भागांत विरुद्ध दिशेने ...

विरुद्ध दिशेने वाहतूक सुरूच

हिंगोली: शहरातील गांधी चौक, महावीर चौक, बस स्थानक परिसर, नांदेड नाका आदी भागांत विरुद्ध दिशेने वाहतूक सुरूच आहे. या प्रकारामुळे वाहतूक खोळंबून जात आहे. वेळोवेळी संबंधित विभागाला सांगण्यात आले, परंतु अद्याप तरी कोणीही लक्ष दिलेले दिसत नाही. शहर वाहतूक शाखेने याची दखल घेऊन विरुद्ध दिशेने होणारी वाहतूक बंद करावी, अशी मागणी होत आहे.

मिरचीवर औषध फवारणी करावी

हिंगोली: मिरची पिकामध्ये भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास, त्याच्या व्यवस्थापनासाठी मायक्लोब्युटनील १० टक्के डब्लूपी १० ग्राम प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मिरची, भाजीपाला पिकामध्ये रसशोषण करणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास, व्यवस्थापनासाठी पायरीप्राॅक्सिफेन १० टक्के ईसी ४ मिली किंवा फेनप्रोपाथ्रीन १० टक्के ईसी ४ मिली प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असा सल्ला ‘वनामकृ’ विद्यापीठाने दिला आहे.

दारेफळ येथे नामविस्तार दिन साजरा

करंजी : वसमत तालुक्यातील दारेफळ येथे नामविस्तार दिन साजरा करण्यात आला. यावेळी सदानंद गजभारे, उतम जाधव, लक्ष्मण बारहाते, रोहिदास वंजारे, रामचंद्र भुजबळ, श्रीकांत बारहाते, दलित गायकवाड, गंगाधर वंजारे, चंपती भुजबळ, केशव भुजबळ, बालासाहेब बारहाते यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील आखाडाबाळापूर गावासह परिसरातील अनेक गावांमध्ये मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव नित्याचाच झाला आहे. शेतातील विहिरींना या वर्षी चांगले पाणी आहे, परंतु वीज खंडित होत असल्यामुळे पाणी पिकांना देता येत नाही. परिणामी, पिके वाळून जात आहेत. महावितरण कंपनीने या बाबीची दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.

‘रेल्वे उड्डाण पुलावर दुभाजक करावे’

हिंगोली: शहरातील रेल्वे उड्डाण पुलावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. या ठिकाणावरून वाहने वेगाने जात आहेत. रेल्वे उड्डाण पुलावर मागणी करूनही दुभाजक बसविण्यात आलेले नाही. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे, तसेच पुलावर कोठेही गतिरोधकही बसविण्यात आले नाही. संंबंधित विभागाने याची दखल घेऊन दुभाजक व गतिरोधक बसवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

बस स्थानकात धुळीचे प्रमाण वाढले

हिंगोली: शहरातील बस स्थानकात मागील काही महिन्यांपासून धुळीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रवाशांना अतोनात त्रास होत आहे. धुळीबरोबरच स्वच्छतागृहाची दैनावस्था झाली आहे. वेळोवेळी संबंधित विभागाला सांगण्यात आले, परंतु अद्याप तरी कोणत्याही अधिकाऱ्यांनी लक्ष दिलेले दिसत नाही. बस स्थानकातील धुळीचे प्रमाण कमी करून प्रवाशांसाठी सोईसुविधा निर्माण करून द्याव्यात, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

नाल्यांवर औषध फवारणीची मागणी

हिंगोली: शहरातील जिजामातानगर, कापड गल्ली, मंगळवारा, पेन्शनपुरा, तोफखाना, कमलानगर, सिद्धार्थनगर, इंदिरानगर आदी नगरांतील नाल्या वेळेवर साफ होत नसल्यामुळे पाणी रस्त्यावर येत आहे. परिणामी, डासांचा प्रमाण वाढत आहे. नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने याची दखल घेऊन नाल्यांची साफसफाई करून औषधाची फवारणी करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांंनी केली आहे.