शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

२५४४ जोडण्यांना निधीचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 00:43 IST

मागील तीन ते चार वर्षांपासून महावितरण आपल्या दारी या योजनेतील लाभार्थ्यांना वीज जोडणीची प्रतीक्षा आहे. तब्बल अडीच हजार जण अजूनही शिल्लक आहेत. त्यांची माहिती महावितरणच्या मुख्य कार्यालयाने मागविली असल्याने या कामांसाठी निधी मिळण्याचे संकेत मानले जात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील तीन ते चार वर्षांपासून महावितरण आपल्या दारी या योजनेतील लाभार्थ्यांना वीज जोडणीची प्रतीक्षा आहे. तब्बल अडीच हजार जण अजूनही शिल्लक आहेत. त्यांची माहिती महावितरणच्या मुख्य कार्यालयाने मागविली असल्याने या कामांसाठी निधी मिळण्याचे संकेत मानले जात आहेत.हिंगोली जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून महावितरण आपल्या दारी या योजनेत केलेल्या सर्व्हेक्षणात नोंदणी केलेल्या शेतकºयांना वीज जोडणीची प्रतीक्षा आहे. हे शेतकरी अनेकदा महावितरणच्या कार्यालयात वीज जोडणीसाठी मागणी करताना दिसतात. त्याचबरोबर काँग्रेसच्या वतीने या योजनेला निधी देण्याच्या मागणीसाठी आंदोलनाचा इशाराही दिला होता. खा.राजीव सातव यांनी याप्रश्नी निवेदने दिली तरीही मागील वर्षभरापासून यात कोणतीच प्रगती होताना दिसत नव्हती. आता या योजनेत महावितरणकडून निधी मिळण्याचे संकेत प्राप्त होत आहेत. जिल्ह्यात या योजनेबाबत असलेल्या परिस्थितीचा इत्थंभूत अहवाल मागविण्यात आला आहे.या योजनेत ३६४३ लाभार्थ्यांचे काम होणे बाकी होते. त्यापैकी ३५२२ जोडण्यांचा सर्व्हे केला. यात हिंगोलीत ८८, वसमतला ४८, कळमनुरीत ३६0, औंढ्यात १५३, सेनगावात ३२९ जणांना विविध योजनांमधून वीज जोडणी दिल्याचे आढळून आले आहे. तर हिंगोलीत ५२, कळमनुरीत ४३ व औंढ्यात २६ जण तपासणीत आढळलेच नाहीत. त्यामुळे त्यांचा प्रश्नच आहे. याबाबतचा अहवाल दिला आहे.महावितरण आपल्या दारी या योजनेत पूर्ण करायच्या जोडण्यांची तालुकानिहाय संख्या हिंगोली-५३३, वसमत-३८९, कणमनुरी-७१९, औंढा-४८२ तर सेनगाव ४२१ अशी आहे. या सर्व कामांसाठी अंदाजित २३ ते २५ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. अजून या कामांची अंदाजपत्रके तयारकरण्याच्या कामास प्रारंभ झाला नाही. केवळ या योजनेतील शिल्लक राहिलेल्या लाभार्थ्यांचीच संख्या मुंबईच्या कार्यालयास कळविण्यात आली आहे. पुढील सूचना आल्यानंतर प्रत्यक्ष निधी व इतर बाबींचा अंदाज येईल, असे सांगण्यात आले.या योजनेत निधी नसल्यानेच ही कामे ठप्प होती. आता अहवाल मागितला हे खरे आहे. निधी आल्यास तत्काळ कामे करू, असे कार्यकारी अभियंता शांतीलाल चौधरी यांनी सांगितले.