शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
4
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
5
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
6
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
7
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
8
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
9
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
10
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
11
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
12
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
13
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
14
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
15
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
16
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
17
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
18
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
19
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
20
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका

२५४४ जोडण्यांना निधीचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 00:43 IST

मागील तीन ते चार वर्षांपासून महावितरण आपल्या दारी या योजनेतील लाभार्थ्यांना वीज जोडणीची प्रतीक्षा आहे. तब्बल अडीच हजार जण अजूनही शिल्लक आहेत. त्यांची माहिती महावितरणच्या मुख्य कार्यालयाने मागविली असल्याने या कामांसाठी निधी मिळण्याचे संकेत मानले जात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील तीन ते चार वर्षांपासून महावितरण आपल्या दारी या योजनेतील लाभार्थ्यांना वीज जोडणीची प्रतीक्षा आहे. तब्बल अडीच हजार जण अजूनही शिल्लक आहेत. त्यांची माहिती महावितरणच्या मुख्य कार्यालयाने मागविली असल्याने या कामांसाठी निधी मिळण्याचे संकेत मानले जात आहेत.हिंगोली जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून महावितरण आपल्या दारी या योजनेत केलेल्या सर्व्हेक्षणात नोंदणी केलेल्या शेतकºयांना वीज जोडणीची प्रतीक्षा आहे. हे शेतकरी अनेकदा महावितरणच्या कार्यालयात वीज जोडणीसाठी मागणी करताना दिसतात. त्याचबरोबर काँग्रेसच्या वतीने या योजनेला निधी देण्याच्या मागणीसाठी आंदोलनाचा इशाराही दिला होता. खा.राजीव सातव यांनी याप्रश्नी निवेदने दिली तरीही मागील वर्षभरापासून यात कोणतीच प्रगती होताना दिसत नव्हती. आता या योजनेत महावितरणकडून निधी मिळण्याचे संकेत प्राप्त होत आहेत. जिल्ह्यात या योजनेबाबत असलेल्या परिस्थितीचा इत्थंभूत अहवाल मागविण्यात आला आहे.या योजनेत ३६४३ लाभार्थ्यांचे काम होणे बाकी होते. त्यापैकी ३५२२ जोडण्यांचा सर्व्हे केला. यात हिंगोलीत ८८, वसमतला ४८, कळमनुरीत ३६0, औंढ्यात १५३, सेनगावात ३२९ जणांना विविध योजनांमधून वीज जोडणी दिल्याचे आढळून आले आहे. तर हिंगोलीत ५२, कळमनुरीत ४३ व औंढ्यात २६ जण तपासणीत आढळलेच नाहीत. त्यामुळे त्यांचा प्रश्नच आहे. याबाबतचा अहवाल दिला आहे.महावितरण आपल्या दारी या योजनेत पूर्ण करायच्या जोडण्यांची तालुकानिहाय संख्या हिंगोली-५३३, वसमत-३८९, कणमनुरी-७१९, औंढा-४८२ तर सेनगाव ४२१ अशी आहे. या सर्व कामांसाठी अंदाजित २३ ते २५ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. अजून या कामांची अंदाजपत्रके तयारकरण्याच्या कामास प्रारंभ झाला नाही. केवळ या योजनेतील शिल्लक राहिलेल्या लाभार्थ्यांचीच संख्या मुंबईच्या कार्यालयास कळविण्यात आली आहे. पुढील सूचना आल्यानंतर प्रत्यक्ष निधी व इतर बाबींचा अंदाज येईल, असे सांगण्यात आले.या योजनेत निधी नसल्यानेच ही कामे ठप्प होती. आता अहवाल मागितला हे खरे आहे. निधी आल्यास तत्काळ कामे करू, असे कार्यकारी अभियंता शांतीलाल चौधरी यांनी सांगितले.