शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

रुजू झालेल्या अधिकाऱ्यांसमोर दुहेरी आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:36 IST

येथील पंचायत समिती कार्यालयाचा अनागोंदी कारभारामुळे पंचायत समितीत आजपर्यंत रुजू झालेले गटविकास अधिकारी वर्षभरही टिकत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे सेनगाव पं. स.चा कारभार पुर्णत: ढेपाळला असून नव्याने रुजू झालेल्या गटविकास अधिकाºयांसमोर आता दुहेरी आव्हान निर्माण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : येथील पंचायत समिती कार्यालयाचा अनागोंदी कारभारामुळे पंचायत समितीत आजपर्यंत रुजू झालेले गटविकास अधिकारी वर्षभरही टिकत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे सेनगाव पं. स.चा कारभार पुर्णत: ढेपाळला असून नव्याने रुजू झालेल्या गटविकास अधिकाºयांसमोर आता दुहेरी आव्हान निर्माण झाले आहे.सेनगाव पंचायत समिती कार्यालयाला कारभार सर्वश्रुत आहे. कार्यालयात प्रामुख्याने अकार्यक्षम, कामचुकार, कारवाई होऊन पदस्थापना मिळालेल्या अधिकारी कर्मचाºयांचा भरणा जास्त आहे. दौºयांच्या नावाखाली कार्यालयातील कार्यरत कर्मचारी -अधिकारी सातत्याने गैरहजर राहतात. कार्यालयात उशिरा येणे, अनधिकृत गैरहजर राहणे, सर्वसामान्य नागरिकांशी उद्धट वागणे, कार्यालयात मद्यप्राशन करून येणे, कामात अनियमितता, मुख्यालयी न राहणे अशा अनेक प्रकारामुळे सेनगाव पंचायत समिती चांगलीच चर्चेत येत आहे.सेनगाव येथील पंचायत समितीला पूर्णवेळ गटविकास अधिकारी मिळत नाही अन् मिळाला तर सदर गटविकास अधिकाºयांवर कारवाई होते. किवा हे अधिकारी सहा महिने- वर्षभरात बदली करून आपली सुटका करून घेतात, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.या गोंधळात पंचायत समितीचा कारभार कायम प्रभारी गटविकास अधिकाºयांवर लादला जातो. त्यामुळे तालुक्यातील जनता पुरती वैतागली असून पदाधिकारीही हतबल झाले आहेत. त्यातच गेल्या आठवड्यात पं. स. च्या सर्व पदाधिकाºयांनी एकत्र येऊन कार्यालयाला टाळे ठोकण्याच्या नामुष्कीची वेळ ओढावली होती. पंरतु निगरगट्ट अधिकारी -कर्मचाºयांवर या प्रकाराचा कुठलाही परिणाम झाला नसून मनमानी कार्यपद्धती चालूच आहे.या खडतर परिस्थितीत शनिवारी गटविकास अधिकारीपदी के.व्ही.काळे रुजू झाले. सेनगावला नवीन गटविकास अधिकारी मिळाल्याने मात्र जनतेच्याही अपेक्षा वाढल्या आहेत. पं.स.चा ढेपाळलेला कारभार सुधारावा अशी जनतेची मागणी आहे. रुजू झालेले गटविकास अधिकारी काळे यांच्यासमोर सेनगाव पं.स. कार्यालयाचा कारभार सुधारणे त्याच बरोबर तीन वर्ष टिकण्याचे आव्हान आहे. विशेष म्हणजे नवीन रूजू झालेले अधिकारी खरंच बदल करतील काय? सेनगाव पंचायत समितीचा ढेपाळलेला कारभार सुधारेल का? तसेच कार्यालयातील उशिरा येणाºया कर्मचाºयांना आळा बसेल काय? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हे सर्व प्रश्न सुटल्यास खरोखरच पंचायत समितीचा कारभार सुरळीत होण्यास मदत होणार आहे.