शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
2
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
3
२७७ प्रवासांना घेऊन जाणारे मॅक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन ब्रीजला धडकले
4
बांगलादेशी तयार कपड्यांना भारतीय बंदरांची दारे बंद, परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडून अधिसूचना जारी
5
फडणवीस, शिंदे, पवार, यांची पुस्तके कधी येणार?
6
सॉफ्टवेअर इंजिनिअर्ससाठी धोक्याची घंटा! ओपन एआयचा कोडिंग, डीबगिंग करणारा कोडेक्स AI लाँच झाला
7
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
8
अत्याचारप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल, धमकी देऊन पाच लाख उकळले 
9
२३ हजार ३३१ हेक्टरला वळवाचा बसला फटका, या पिकांचं मोठं नुकसान?
10
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
11
एक देश एक निवडणूक : ४.५० लाख कोटींची बचत; मतदानही होईल ९० टक्के! संसदीय समितीचा अंदाज 
12
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
13
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
14
इंद्रायणी पूररेषेतील ३६ बंगले जमीनदोस्त
15
राज्यामध्ये तब्बल सात हजारावर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत; १,९१९ रुग्णांना यकृत, तर १४१ जणांना गरज आहे हृदयाची
16
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
17
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
18
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
19
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
20
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?

गांधी चाैकात माेकाट जनावरांचा मुक्तसंचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:27 IST

शेतशिवारातील वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी औंढा नागनाथ : तालुक्यातील येहळेगाव सो. शेतशिवारातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. यामुळे अनेक ...

शेतशिवारातील वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

औंढा नागनाथ : तालुक्यातील येहळेगाव सो. शेतशिवारातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. यामुळे अनेक शेतीकामांना खोंळबा हाेत आहे. मागील चार-पाच महिन्यांपासून शेतशिवारातील वीजपुरवठा खंडित होत असल्याने हा वीजपुरवठा सुरळीतची मागणी शेतकऱ्यांतून हाेत आहे.

बेशिस्त वाहनांमुळे अपघात वाढले

हिंगोली : शहरातील इंदिरा चौक, गांधी चौक, नांदेड नाका याठिकाणी अनेक वाहनचालक आपले वाहन बेशिस्तपणे व वेगाने धावत असल्याने अनेकदा याठिकाणी अपघात होत आहेत. यामुळे शहरातून बेशिस्तपणे वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध वाहतूक पाेलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे.

रस्त्यावर खड्डेच खड्डे

सवना : सेनगाव तालुक्यातील सवना ते सवना तांडा या दीड किमी रस्त्याचे काम रखडले आहेत. अनेक वाहनधारक या रस्त्यावरून वाहन चालविताना गिट्टीमुळे पडत असल्याच्या घटनाही घडत आहेत. यासाठी या रस्त्याची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी गावकरी करीत आहेत.

नाल्यातील पाणी रस्त्यावर साचले

साखरा : सेनगाव तालुक्यातील साखरा गावातील अनेक भागांतील नागरिकांच्या घरातील सांडपाणी हे नालीत न जाता रस्त्यावर साचत आहे. नालीचे व्यवस्थापन व्यवस्थित न केल्याने गावकऱ्यांचे सांडपाणी हे गावातील रस्त्यांवर साचत आहे. अनेक भागांत पाणी साचल्यामुळे दुर्गंधीमय व घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही पडू लागला आहे.

पीकविमा देण्याची मागणी

बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा गावातील शेतकऱ्यांनी यंदा आपल्या खरीप हंगामातील पिकांचा पीकविमा ऑनलाइन भरला. अतिवृष्टीमुळे अनेकांचे पीक वाहून गेले. याचा पीकविमा मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. पण गावातील अर्ध्याच शेतकऱ्यांना पीकविमा मिळालेला असून, उर्वरित शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीकविमा मिळावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

बसस्थानकात धुळीचे वातावरण

सेनगाव : शहरातील बसस्थानक परिसरातील रस्ते व जमीन पूर्णपणे उखडलेली असल्यामुळे याठिाकणी नेहमी धूळ राहत आहे. अनेकदा बसस्थानकात रस्ते व्हावी, अशी मागणी करूनही बसस्थानक प्रशासन याकडे कानाडोळा करीत आहे. बसस्थानकातील रस्ता कच्चा असल्यामुळे याठिकाणी धूळ उडत असून, याचा त्रास बसस्थानकातील प्रवाशांना होत आहे.

वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला

जवळा पांचाळ : कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ शेतशिवारामध्ये वन्य प्राणी घुसत आहे. अनेकदा रानडुकरांचा कळप, हरीण, रोही हे शेतात घुसून पिकांची नासाडी करीत आहेत. तसेच शेतशिवारात काम करणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांना रानडुक्कर हल्ला करीत असल्याच्या घटनाही घडत आहे. यासाठी वनविभागाने लक्ष देऊन या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.