शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
3
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
4
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
5
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
6
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
7
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
8
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
9
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन
10
धक्कादायक! अखेर ७ सिंहांना मृत्यूदंडाची शिक्षा; 'जंगलाच्या राजा'ला मारण्याची तयारी कोण करतंय?
11
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
12
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
13
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
14
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
15
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
16
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
17
अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
18
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
19
Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
20
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी

नोव्हेंबरपर्यंत मिळणार प्राधान्य कुटुंब व अंत्योदय लाभार्थींना मोफत धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:20 IST

हिंगाेली : कोरोना संसर्गामुळे गरिबांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शासनाने राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गंत अनुज्ञेय असलेल्या अन्नधान्याव्यतिरिक्त ...

हिंगाेली : कोरोना संसर्गामुळे गरिबांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शासनाने राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गंत अनुज्ञेय असलेल्या अन्नधान्याव्यतिरिक्त प्रति सदस्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गंत जुलै ते नोव्हेंबर २०२१ पर्यंत प्रतिमाह ५ किलो धान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील प्राधान्य कुटुंब व अंत्योदय अन्न योजनेतील ८ लाख ७१ हजार ७७६ पात्र सदस्यांना याचा लाभ मिळणार आहे.

कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प पडले आहेत. याचा सर्वांनाच थोडाअधिक फटका बसला असला तरी सर्वात जास्त झळा हातावर पोट असणाऱ्यांना बसल्या आहेत. हातचा रोजगार हिरावल्याने कुटुंबीयांचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे शासनाने मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला. मोफत धान्य मिळाल्याने कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटण्यास मदत झाली. कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी आर्थिक घडी बसण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे शासनाने आणखी जुलै ते नोव्हेंबरपर्यंत प्राधान्य कुटुंबासह अंत्योदय अन्न योजनेतील सदस्यांना प्रति सदस्य ५ किलो धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. यात ३ किलो गहू तर २ किलो तांदूळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी नियतन मंजूर झाले असून या महिन्याचे अन्नधान्य ३१ जुलै पूर्वी उचलावे लागणार आहे.

महिन्याला मिळणार ४ हजार ३५८ मे.टन धान्य

जिल्ह्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थींना जुलै ते नोव्हेंबर २०२१ साठी मोफत धान्य वितरित करण्यात येणार आहे. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यासाठी जुलै महिन्याचे ४ हजार ३५८ मे.टन धान्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. यात २ हजार ६१५ मे.टन गहू तर १ हजार ७४३ मे.टन तांदळाचा समावेश आहे. जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजनेतील १ लाख ३७ हजार ६८४ लाभार्थी असून प्राधान्य कुटुंब योजनेतील ७ लाख ३४ हजार ९२ लाभार्थी आहेत.

अनुज्ञेय असलेल्या अन्नधान्याव्यतिरिक्तचे मोफत

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गंत अनुज्ञेय असलेल्या नियमित ३५ किलो अन्नधान्याचे अंत्योदय अन्न योजना कुटुंबातील लाभार्थ्यांना वितरण केल्यानंतर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गंत शिधापत्रिकेतील प्रति सदस्याला ५ किलो अन्नधान्याचे (गहू व तांदूळ) मोफत वितरण केले जाणार आहे. तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना देखील अनुज्ञेय असलेल्या ५ किलो प्रति सदस्य अन्नधान्य वितरित केल्यानंतर प्रति सदस्य ५ किलो अन्नधान्याचे मोफत वितरण केले जाणार आहे. रेशन दुकानदारांना मात्र ई-पॉस मशीनद्वारे धान्य वितरित करावे लागणार असल्याचे शासनाचे सहसचिव सुधीर तुंगार यांनी २९ जून रोजी जिल्हा प्रशासनाला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.