शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

नोव्हेंबरपर्यंत मिळणार प्राधान्य कुटुंब व अंत्योदय लाभार्थींना मोफत धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:20 IST

हिंगाेली : कोरोना संसर्गामुळे गरिबांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शासनाने राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गंत अनुज्ञेय असलेल्या अन्नधान्याव्यतिरिक्त ...

हिंगाेली : कोरोना संसर्गामुळे गरिबांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शासनाने राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गंत अनुज्ञेय असलेल्या अन्नधान्याव्यतिरिक्त प्रति सदस्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गंत जुलै ते नोव्हेंबर २०२१ पर्यंत प्रतिमाह ५ किलो धान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील प्राधान्य कुटुंब व अंत्योदय अन्न योजनेतील ८ लाख ७१ हजार ७७६ पात्र सदस्यांना याचा लाभ मिळणार आहे.

कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प पडले आहेत. याचा सर्वांनाच थोडाअधिक फटका बसला असला तरी सर्वात जास्त झळा हातावर पोट असणाऱ्यांना बसल्या आहेत. हातचा रोजगार हिरावल्याने कुटुंबीयांचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे शासनाने मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला. मोफत धान्य मिळाल्याने कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटण्यास मदत झाली. कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी आर्थिक घडी बसण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे शासनाने आणखी जुलै ते नोव्हेंबरपर्यंत प्राधान्य कुटुंबासह अंत्योदय अन्न योजनेतील सदस्यांना प्रति सदस्य ५ किलो धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. यात ३ किलो गहू तर २ किलो तांदूळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी नियतन मंजूर झाले असून या महिन्याचे अन्नधान्य ३१ जुलै पूर्वी उचलावे लागणार आहे.

महिन्याला मिळणार ४ हजार ३५८ मे.टन धान्य

जिल्ह्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थींना जुलै ते नोव्हेंबर २०२१ साठी मोफत धान्य वितरित करण्यात येणार आहे. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यासाठी जुलै महिन्याचे ४ हजार ३५८ मे.टन धान्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. यात २ हजार ६१५ मे.टन गहू तर १ हजार ७४३ मे.टन तांदळाचा समावेश आहे. जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजनेतील १ लाख ३७ हजार ६८४ लाभार्थी असून प्राधान्य कुटुंब योजनेतील ७ लाख ३४ हजार ९२ लाभार्थी आहेत.

अनुज्ञेय असलेल्या अन्नधान्याव्यतिरिक्तचे मोफत

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गंत अनुज्ञेय असलेल्या नियमित ३५ किलो अन्नधान्याचे अंत्योदय अन्न योजना कुटुंबातील लाभार्थ्यांना वितरण केल्यानंतर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गंत शिधापत्रिकेतील प्रति सदस्याला ५ किलो अन्नधान्याचे (गहू व तांदूळ) मोफत वितरण केले जाणार आहे. तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना देखील अनुज्ञेय असलेल्या ५ किलो प्रति सदस्य अन्नधान्य वितरित केल्यानंतर प्रति सदस्य ५ किलो अन्नधान्याचे मोफत वितरण केले जाणार आहे. रेशन दुकानदारांना मात्र ई-पॉस मशीनद्वारे धान्य वितरित करावे लागणार असल्याचे शासनाचे सहसचिव सुधीर तुंगार यांनी २९ जून रोजी जिल्हा प्रशासनाला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.