शहरं
Join us  
Trending Stories
1
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
2
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
3
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
4
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
5
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
6
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
7
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
8
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
9
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
10
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
11
Operation Sindoor Live Updates: "जर पाकिस्तानने आज रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ"
12
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
13
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
14
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
15
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
16
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
17
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
18
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
19
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
20
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी

नोव्हेंबरपर्यंत मिळणार प्राधान्य कुटुंब व अंत्योदय लाभार्थींना मोफत धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:20 IST

हिंगाेली : कोरोना संसर्गामुळे गरिबांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शासनाने राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गंत अनुज्ञेय असलेल्या अन्नधान्याव्यतिरिक्त ...

हिंगाेली : कोरोना संसर्गामुळे गरिबांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शासनाने राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गंत अनुज्ञेय असलेल्या अन्नधान्याव्यतिरिक्त प्रति सदस्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गंत जुलै ते नोव्हेंबर २०२१ पर्यंत प्रतिमाह ५ किलो धान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील प्राधान्य कुटुंब व अंत्योदय अन्न योजनेतील ८ लाख ७१ हजार ७७६ पात्र सदस्यांना याचा लाभ मिळणार आहे.

कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प पडले आहेत. याचा सर्वांनाच थोडाअधिक फटका बसला असला तरी सर्वात जास्त झळा हातावर पोट असणाऱ्यांना बसल्या आहेत. हातचा रोजगार हिरावल्याने कुटुंबीयांचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे शासनाने मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला. मोफत धान्य मिळाल्याने कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटण्यास मदत झाली. कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी आर्थिक घडी बसण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे शासनाने आणखी जुलै ते नोव्हेंबरपर्यंत प्राधान्य कुटुंबासह अंत्योदय अन्न योजनेतील सदस्यांना प्रति सदस्य ५ किलो धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. यात ३ किलो गहू तर २ किलो तांदूळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी नियतन मंजूर झाले असून या महिन्याचे अन्नधान्य ३१ जुलै पूर्वी उचलावे लागणार आहे.

महिन्याला मिळणार ४ हजार ३५८ मे.टन धान्य

जिल्ह्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थींना जुलै ते नोव्हेंबर २०२१ साठी मोफत धान्य वितरित करण्यात येणार आहे. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यासाठी जुलै महिन्याचे ४ हजार ३५८ मे.टन धान्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. यात २ हजार ६१५ मे.टन गहू तर १ हजार ७४३ मे.टन तांदळाचा समावेश आहे. जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजनेतील १ लाख ३७ हजार ६८४ लाभार्थी असून प्राधान्य कुटुंब योजनेतील ७ लाख ३४ हजार ९२ लाभार्थी आहेत.

अनुज्ञेय असलेल्या अन्नधान्याव्यतिरिक्तचे मोफत

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गंत अनुज्ञेय असलेल्या नियमित ३५ किलो अन्नधान्याचे अंत्योदय अन्न योजना कुटुंबातील लाभार्थ्यांना वितरण केल्यानंतर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गंत शिधापत्रिकेतील प्रति सदस्याला ५ किलो अन्नधान्याचे (गहू व तांदूळ) मोफत वितरण केले जाणार आहे. तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना देखील अनुज्ञेय असलेल्या ५ किलो प्रति सदस्य अन्नधान्य वितरित केल्यानंतर प्रति सदस्य ५ किलो अन्नधान्याचे मोफत वितरण केले जाणार आहे. रेशन दुकानदारांना मात्र ई-पॉस मशीनद्वारे धान्य वितरित करावे लागणार असल्याचे शासनाचे सहसचिव सुधीर तुंगार यांनी २९ जून रोजी जिल्हा प्रशासनाला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.