वाशिम: ठेकेदारी करण्यासाठी माहेरहून एक लाख रूपये आणण्याचा तगादा लावून विवाहीतेला शारीरीक व मानसिक त्रास देऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त केले. याप्रकरणी वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये पती, जेठ, सासू व जाऊ या चौघांविरूध्द भादंविचे कलम ३0६, ४९८ अ, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. मृतक महिलेच्या पतीला अटक करून त्याला न्यायालयाने आज ९ ऑगस्ट रोजी १२ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. हिंगोली जिल्ह्यातील कनेरगाव नाका येथील धम्मकिरण रसाळ यांची बहिण अर्चना हीचा विवाह वाशिम येथील भिम नगर मध्ये राहणारे मनोज ग्यानूजी राऊत यांचेशी ५ मे २0१३ रोजी झाला होता. कालांतराणे पती मनोज राऊत याने ठेकेदारीसाठी माहेरहून एक लाख रूपये आणण्याचा तगादा लावला. मात्र, माहेरची परिस्थिती बेताची असल्याने अर्चना आपल्या पतीची मागणी पुर्ण करू शकत नव्हती. त्यामुळे अर्चनाला कुटूंबातील जेठ सतिष राऊत, सासू आशाबाई राऊत व जाऊ रूपाली राऊत यांनी संगनमत करून मानसिक व शारीरीक छळ केला. या छळाला कंटाळून अर्चना हीने ८ ऑगस्ट रोजी राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. या घटनेची फिर्याद मृतक अर्चना हीच्या भावाने वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये दिली. पोलिसांनी मनोज राऊत, सतिष राऊत, आशाबाई राऊत व रूपाली राऊत यांचेविरूध्द भादंविचे कलम ३0६, ४९८ अ, ३४ नुसार गुन्हा दाखल करून पती मनोज याला अटक केली. त्याला आज ९ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायाधिशांनी त्यालापोलिस कोठडी सुनावली. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक विजय काकडे करीत आहेत.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा
By admin | Updated: August 9, 2014 22:04 IST