शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा

By admin | Updated: August 9, 2014 22:04 IST

माहेरहून एक लाख रूपये आणण्याचा तगादा लावून विवाहीतेला शारीरीक व मानसिक त्रास देऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त केले.

वाशिम: ठेकेदारी करण्यासाठी माहेरहून एक लाख रूपये आणण्याचा तगादा लावून विवाहीतेला शारीरीक व मानसिक त्रास देऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त केले. याप्रकरणी वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये पती, जेठ, सासू व जाऊ या चौघांविरूध्द भादंविचे कलम ३0६, ४९८ अ, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. मृतक महिलेच्या पतीला अटक करून त्याला न्यायालयाने आज ९ ऑगस्ट रोजी १२ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. हिंगोली जिल्ह्यातील कनेरगाव नाका येथील धम्मकिरण रसाळ यांची बहिण अर्चना हीचा विवाह वाशिम येथील भिम नगर मध्ये राहणारे मनोज ग्यानूजी राऊत यांचेशी ५ मे २0१३ रोजी झाला होता. कालांतराणे पती मनोज राऊत याने ठेकेदारीसाठी माहेरहून एक लाख रूपये आणण्याचा तगादा लावला. मात्र, माहेरची परिस्थिती बेताची असल्याने अर्चना आपल्या पतीची मागणी पुर्ण करू शकत नव्हती. त्यामुळे अर्चनाला कुटूंबातील जेठ सतिष राऊत, सासू आशाबाई राऊत व जाऊ रूपाली राऊत यांनी संगनमत करून मानसिक व शारीरीक छळ केला. या छळाला कंटाळून अर्चना हीने ८ ऑगस्ट रोजी राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. या घटनेची फिर्याद मृतक अर्चना हीच्या भावाने वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये दिली. पोलिसांनी मनोज राऊत, सतिष राऊत, आशाबाई राऊत व रूपाली राऊत यांचेविरूध्द भादंविचे कलम ३0६, ४९८ अ, ३४ नुसार गुन्हा दाखल करून पती मनोज याला अटक केली. त्याला आज ९ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायाधिशांनी त्यालापोलिस कोठडी सुनावली. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक विजय काकडे करीत आहेत.