शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
3
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
4
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
5
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
6
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
7
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
8
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
9
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
10
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
11
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
12
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
13
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
14
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
15
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
16
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."
17
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
18
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
19
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
20
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त

हिंगोली जिल्ह्यात फ्लोराईडग्रस्त गावे अद्याप दुर्लक्षितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 00:06 IST

जिल्ह्यात फ्लोराईडयुक्त पाण्याच्या पुरवठ्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेल्या गावांचे प्रकरण असिम सरोदे यांनी हरित लवादाकडे दाखल केले होते. दोन वर्षांपासून यावर जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाºयांना आदेशित करूनही अद्याप यात फारशी कारवाई झाली नाही.

ठळक मुद्दे१0४ गावांत १४५ स्त्रोत दूषित : हरित लवादाकडे प्रश्न जाऊनही प्रशासनाची गती मंद

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात फ्लोराईडयुक्त पाण्याच्या पुरवठ्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेल्या गावांचे प्रकरण असिम सरोदे यांनी हरित लवादाकडे दाखल केले होते. दोन वर्षांपासून यावर जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाºयांना आदेशित करूनही अद्याप यात फारशी कारवाई झाली नाही.हिंगोली जिल्ह्यात तब्बल १९८ गावांमध्ये फ्लोराईडची समस्या आढळून आली होती. यामध्ये औंढा-१, वसमत-१६, सेनगाव-४६, कळमनुरी-६८, हिंगोली- ६७ अशी तालुकानिहाय गावांची संख्या होती. त्यात फ्लोराईडयुक्त पाणीपुरवठा होत असलेल्या गावांतील लोकांना हाडांचे आजार जडत आहेत. तसेच दातेही पिवळी पडली. काहींचे दात एवढे झिजले की तारुण्यातच वार्धक्याचा अनुभव येत आहे. परंतु याबाबत हरित लवादाकडे प्रश्न गेल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने अनेक ठिकाणचे स्त्रोत सील केले होते.दरम्यान, दुष्काळी परिस्थिती आली अन् ग्रामस्थांनी त्यात पाण्यासाठी असे स्त्रोतही अनेक ठिकाणी उघडे केले. काही ठिकाणी तर ग्रामपंचायतींनी लोकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला. मात्र टंचाईपुढे काहीच चालले नाही. फ्लोराईडग्रस्त गावांपैकी जवळपास १३ गावांत त्यावेळी कोणतीच पाणीपुरवठा योजना नव्हती. त्यानंतर याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. आता नेमकी काय परिस्थिती आहे. याचा कोणालाच ताळमेळ नाही. आरोग्य विभाग अहवाल देवून मोकळा झाला. पाणीपुरवठा विभागाने ही गावे प्राधान्य यादीत तेवढी टाकली. त्यापुढील औपचिरकतांचे मात्र काहीच होत नाही.आता नव्याने या गावांसाठी जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतर कारवाई सुरू झाली. जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी बैठक घेतल्यानंतर १0४ गावांतील १४५ स्त्रोत फ्लोराईडचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले असे सांगितले जात आहे. तर या गावांमध्ये आरोग्य विभागाकडून तपासण्या झाल्याचेही सांगितले जाते. त्यात केवळ दातांचे आजार असलेले लोकच आढळले. इतर प्रकारचे आजार असलेले रुग्ण नव्हते, असा अहवाल आहे. मात्र या सर्व गावांत फेरतपासणी होणे गरजेचे आहे. शिवाय अनेक गावांनी पुन्हा सील उघडून स्त्रोत वापरणे सुरू केले होते. तेही बंद होणे गरजेचे आहे. खºया अर्थाने तपासणी झाली तर यात रुग्णांची संख्या जास्त आढळून येण्याची शक्यता आहे.जिल्हाधिकारी : कृती आराखडा सादर कराहिंगोली जिल्ह्यातील फ्लोराईडग्रस्त गावांची फेरतपासणी करण्यास सांगितले आहे. त्यानुसार आढळून आलेल्या सर्व गावांत पाणीपुरवठ्याच्या काही उपाययोजना आहेत की नाहीत. नसतील तर नवीन योजना अथवा प्रादेशिक योजना व इतर योजनांवरून अशा गावांना पाणी देण्यासाठी कृती आराखडा सादर करण्याचा आदेश दिल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिली आहे. फ्लोराईडग्रस्त गावांमध्ये शुद्ध पाणीपुरवठा होण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल. त्यामुळेच वस्तूनिष्ठ अहवाल मागविला आहे.