शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

हिंगोली जिल्ह्यात फ्लोराईडग्रस्त गावे अद्याप दुर्लक्षितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 00:06 IST

जिल्ह्यात फ्लोराईडयुक्त पाण्याच्या पुरवठ्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेल्या गावांचे प्रकरण असिम सरोदे यांनी हरित लवादाकडे दाखल केले होते. दोन वर्षांपासून यावर जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाºयांना आदेशित करूनही अद्याप यात फारशी कारवाई झाली नाही.

ठळक मुद्दे१0४ गावांत १४५ स्त्रोत दूषित : हरित लवादाकडे प्रश्न जाऊनही प्रशासनाची गती मंद

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात फ्लोराईडयुक्त पाण्याच्या पुरवठ्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेल्या गावांचे प्रकरण असिम सरोदे यांनी हरित लवादाकडे दाखल केले होते. दोन वर्षांपासून यावर जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाºयांना आदेशित करूनही अद्याप यात फारशी कारवाई झाली नाही.हिंगोली जिल्ह्यात तब्बल १९८ गावांमध्ये फ्लोराईडची समस्या आढळून आली होती. यामध्ये औंढा-१, वसमत-१६, सेनगाव-४६, कळमनुरी-६८, हिंगोली- ६७ अशी तालुकानिहाय गावांची संख्या होती. त्यात फ्लोराईडयुक्त पाणीपुरवठा होत असलेल्या गावांतील लोकांना हाडांचे आजार जडत आहेत. तसेच दातेही पिवळी पडली. काहींचे दात एवढे झिजले की तारुण्यातच वार्धक्याचा अनुभव येत आहे. परंतु याबाबत हरित लवादाकडे प्रश्न गेल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने अनेक ठिकाणचे स्त्रोत सील केले होते.दरम्यान, दुष्काळी परिस्थिती आली अन् ग्रामस्थांनी त्यात पाण्यासाठी असे स्त्रोतही अनेक ठिकाणी उघडे केले. काही ठिकाणी तर ग्रामपंचायतींनी लोकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला. मात्र टंचाईपुढे काहीच चालले नाही. फ्लोराईडग्रस्त गावांपैकी जवळपास १३ गावांत त्यावेळी कोणतीच पाणीपुरवठा योजना नव्हती. त्यानंतर याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. आता नेमकी काय परिस्थिती आहे. याचा कोणालाच ताळमेळ नाही. आरोग्य विभाग अहवाल देवून मोकळा झाला. पाणीपुरवठा विभागाने ही गावे प्राधान्य यादीत तेवढी टाकली. त्यापुढील औपचिरकतांचे मात्र काहीच होत नाही.आता नव्याने या गावांसाठी जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतर कारवाई सुरू झाली. जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी बैठक घेतल्यानंतर १0४ गावांतील १४५ स्त्रोत फ्लोराईडचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले असे सांगितले जात आहे. तर या गावांमध्ये आरोग्य विभागाकडून तपासण्या झाल्याचेही सांगितले जाते. त्यात केवळ दातांचे आजार असलेले लोकच आढळले. इतर प्रकारचे आजार असलेले रुग्ण नव्हते, असा अहवाल आहे. मात्र या सर्व गावांत फेरतपासणी होणे गरजेचे आहे. शिवाय अनेक गावांनी पुन्हा सील उघडून स्त्रोत वापरणे सुरू केले होते. तेही बंद होणे गरजेचे आहे. खºया अर्थाने तपासणी झाली तर यात रुग्णांची संख्या जास्त आढळून येण्याची शक्यता आहे.जिल्हाधिकारी : कृती आराखडा सादर कराहिंगोली जिल्ह्यातील फ्लोराईडग्रस्त गावांची फेरतपासणी करण्यास सांगितले आहे. त्यानुसार आढळून आलेल्या सर्व गावांत पाणीपुरवठ्याच्या काही उपाययोजना आहेत की नाहीत. नसतील तर नवीन योजना अथवा प्रादेशिक योजना व इतर योजनांवरून अशा गावांना पाणी देण्यासाठी कृती आराखडा सादर करण्याचा आदेश दिल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिली आहे. फ्लोराईडग्रस्त गावांमध्ये शुद्ध पाणीपुरवठा होण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल. त्यामुळेच वस्तूनिष्ठ अहवाल मागविला आहे.