शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

पाच जणांचे रक्त नमुने प्रयोगशाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 23:35 IST

औंढा तालुक्यातील वगरवाडी येथे डेंग्यू साथरोगावर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य विभागामार्फत उपाययोजना केल्या जात आहेत. शिवाय येथील पाच जणांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गीते यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

ठळक मुद्देहिंगोली : आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : औंढा तालुक्यातील वगरवाडी येथे डेंग्यू साथरोगावर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य विभागामार्फत उपाययोजना केल्या जात आहेत. शिवाय येथील पाच जणांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गीते यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.औंढा तालुक्यात डेंग्यूच्या साथीने डोके वर काढले अन् आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले. शिरड शहापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत वगरवाडी गाव येते. डेंग्यूच्या आजाराने थैमान घातले. तिघांचा बळी गेला. हा प्रकार समोर आल्यानंतरच आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली व साथरोग नियंत्रणासाठी उपाय-योजना सुरू केल्या, हे विशेष. परंतु वगरवाडी येथील तीन व्यक्तींच्या मृत्यूनंतरही गावात साथच पसरली नाही, असे आरोग्य विभागाकडून ठणकावून सांगितले जात आहे. गावात डेंग्यूची साथ आहे, हे पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या पाच जणांच्या रक्त नमुन्यांवरूनच सिद्ध होणार, असा पवित्रा मात्र आरोग्य विभागाने घेतला आहे. पुणे येथे पाठविलेल्या रक्त नमुन्यांचा अहवाल येणास सहा ते सात दिवस लागणार असल्याचे विभागातर्फे सांगितले. तर गावातील बळी डेंग्यूच्या साथीमुळेच झाला, असे येथील ग्रामस्थांतून सांगितले जात आहे. दुसरीकडे आरोग्य यंत्रणेला तपासणी नमुन्यांची प्रतीक्षा आहे.तपासणी : ...तरच डेंग्यूची साथएकाच आजाराची चार ते पाच किंवा त्यापेक्षा जास्त जणांना लागण झाल्यास साथरोग म्हणता येईल. त्यामुळे गावात डेंग्यूचीच साथ आहे, असे म्हणता येणार नाही. गावात खरेच साथ पसरली आहे का, हे रुग्णांचा रक्त तपासणी अहवाल आल्यावरच समजणार आहे. तसेच खाजगी रुग्णालयातील अहवाल ग्राह्य धरले जात नाहीत. त्यामुळे वगरवाडी येथील पाच जणांचे रक्तजल नमुने पुणे येथे पाठविण्यात आले असून ते अहवाल प्राप्त होताच साथरोग आहे किंवा नाही. हे निष्पन्न होईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते यांनी सांगितले.