शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

पाच जणांचे रक्त नमुने प्रयोगशाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 23:35 IST

औंढा तालुक्यातील वगरवाडी येथे डेंग्यू साथरोगावर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य विभागामार्फत उपाययोजना केल्या जात आहेत. शिवाय येथील पाच जणांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गीते यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

ठळक मुद्देहिंगोली : आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : औंढा तालुक्यातील वगरवाडी येथे डेंग्यू साथरोगावर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य विभागामार्फत उपाययोजना केल्या जात आहेत. शिवाय येथील पाच जणांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गीते यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.औंढा तालुक्यात डेंग्यूच्या साथीने डोके वर काढले अन् आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले. शिरड शहापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत वगरवाडी गाव येते. डेंग्यूच्या आजाराने थैमान घातले. तिघांचा बळी गेला. हा प्रकार समोर आल्यानंतरच आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली व साथरोग नियंत्रणासाठी उपाय-योजना सुरू केल्या, हे विशेष. परंतु वगरवाडी येथील तीन व्यक्तींच्या मृत्यूनंतरही गावात साथच पसरली नाही, असे आरोग्य विभागाकडून ठणकावून सांगितले जात आहे. गावात डेंग्यूची साथ आहे, हे पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या पाच जणांच्या रक्त नमुन्यांवरूनच सिद्ध होणार, असा पवित्रा मात्र आरोग्य विभागाने घेतला आहे. पुणे येथे पाठविलेल्या रक्त नमुन्यांचा अहवाल येणास सहा ते सात दिवस लागणार असल्याचे विभागातर्फे सांगितले. तर गावातील बळी डेंग्यूच्या साथीमुळेच झाला, असे येथील ग्रामस्थांतून सांगितले जात आहे. दुसरीकडे आरोग्य यंत्रणेला तपासणी नमुन्यांची प्रतीक्षा आहे.तपासणी : ...तरच डेंग्यूची साथएकाच आजाराची चार ते पाच किंवा त्यापेक्षा जास्त जणांना लागण झाल्यास साथरोग म्हणता येईल. त्यामुळे गावात डेंग्यूचीच साथ आहे, असे म्हणता येणार नाही. गावात खरेच साथ पसरली आहे का, हे रुग्णांचा रक्त तपासणी अहवाल आल्यावरच समजणार आहे. तसेच खाजगी रुग्णालयातील अहवाल ग्राह्य धरले जात नाहीत. त्यामुळे वगरवाडी येथील पाच जणांचे रक्तजल नमुने पुणे येथे पाठविण्यात आले असून ते अहवाल प्राप्त होताच साथरोग आहे किंवा नाही. हे निष्पन्न होईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते यांनी सांगितले.