शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

पाच जणांचे रक्त नमुने प्रयोगशाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 23:35 IST

औंढा तालुक्यातील वगरवाडी येथे डेंग्यू साथरोगावर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य विभागामार्फत उपाययोजना केल्या जात आहेत. शिवाय येथील पाच जणांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गीते यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

ठळक मुद्देहिंगोली : आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : औंढा तालुक्यातील वगरवाडी येथे डेंग्यू साथरोगावर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य विभागामार्फत उपाययोजना केल्या जात आहेत. शिवाय येथील पाच जणांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गीते यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.औंढा तालुक्यात डेंग्यूच्या साथीने डोके वर काढले अन् आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले. शिरड शहापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत वगरवाडी गाव येते. डेंग्यूच्या आजाराने थैमान घातले. तिघांचा बळी गेला. हा प्रकार समोर आल्यानंतरच आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली व साथरोग नियंत्रणासाठी उपाय-योजना सुरू केल्या, हे विशेष. परंतु वगरवाडी येथील तीन व्यक्तींच्या मृत्यूनंतरही गावात साथच पसरली नाही, असे आरोग्य विभागाकडून ठणकावून सांगितले जात आहे. गावात डेंग्यूची साथ आहे, हे पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या पाच जणांच्या रक्त नमुन्यांवरूनच सिद्ध होणार, असा पवित्रा मात्र आरोग्य विभागाने घेतला आहे. पुणे येथे पाठविलेल्या रक्त नमुन्यांचा अहवाल येणास सहा ते सात दिवस लागणार असल्याचे विभागातर्फे सांगितले. तर गावातील बळी डेंग्यूच्या साथीमुळेच झाला, असे येथील ग्रामस्थांतून सांगितले जात आहे. दुसरीकडे आरोग्य यंत्रणेला तपासणी नमुन्यांची प्रतीक्षा आहे.तपासणी : ...तरच डेंग्यूची साथएकाच आजाराची चार ते पाच किंवा त्यापेक्षा जास्त जणांना लागण झाल्यास साथरोग म्हणता येईल. त्यामुळे गावात डेंग्यूचीच साथ आहे, असे म्हणता येणार नाही. गावात खरेच साथ पसरली आहे का, हे रुग्णांचा रक्त तपासणी अहवाल आल्यावरच समजणार आहे. तसेच खाजगी रुग्णालयातील अहवाल ग्राह्य धरले जात नाहीत. त्यामुळे वगरवाडी येथील पाच जणांचे रक्तजल नमुने पुणे येथे पाठविण्यात आले असून ते अहवाल प्राप्त होताच साथरोग आहे किंवा नाही. हे निष्पन्न होईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते यांनी सांगितले.