शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

महावितरणचे राज्यातील पहिले जीआयएस उपकेंद्र हिंगोलीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 19:20 IST

महावितरण कार्यालयाच्या परिसरात एकात्मिक ऊर्जा विकास कार्यक्रम (आयपीडीएस) योजनेच्या माध्यमातून महावितरण कंपनीतर्फे राज्यातील पहिल्या जीआयएस प्रकारातील ३३, ११ केव्ही उपकेंद्राची उभारणी करुन कार्यान्वीत करण्यात आले आहे. 

ठळक मुद्देया उपकेंद्राचा लाभ हिंगोली शहरातील जवळपास चार हजार वीज ग्राहकांना होणार आहे.

हिंगोली : येथील महावितरण कार्यालयाच्या परिसरात एकात्मिक ऊर्जा विकास कार्यक्रम (आयपीडीएस) योजनेच्या माध्यमातून महावितरण कंपनीतर्फे राज्यातील पहिल्या जीआयएस प्रकारातील ३३, ११ केव्ही उपकेंद्राची उभारणी करुन कार्यान्वीत करण्यात आले आहे. 

राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी १७ मे २०१७ रोजी या उपकेंद्राचे भूमिपूजन केले होते.  खाकीबाबा मठ उपकेंद्र या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या उपकेंद्रातून नवीन आठ ११ केव्ही वीज वाहिन्यांची निर्मिती करण्यात आली आहे.   हिंगोली शहराची विजेची गरज लक्षात घेवून गॅस इन्सुलेटेड प्रणालीचा उपयोग करत (जीआयएस)  खाकीबाबा मठ उपकेंद्राची उभारणी केवळ बाराशे स्क्वेअर मीटर जागेमध्ये करण्यात आली आहे. पायाभूत आराखडा विभागामार्फत ३ कोटी ५ लाख रुपये खर्च करुन औरंगाबाद येथील आयडिया इंजिनिअर्स या कंपनीने या उपकेंद्राची उभारणी केली.

उपकेंद्रासाठी औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांचे मार्गदर्शन तर तत्कालीन मुख्य अभियंता अविनाश पाटोळे, प्रभारी मुख्य अभियंता आजिनाथ सोनवणे यांनी केलेला पाठपुराव्यामुळे काम गतीने झाले. तसेच अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव, के.एस. रामटेके, अति.कार्यकारी अभियंता कोथळे, सहायक अभियंता पवार, हिंगोली मंडळाचे कार्यकारी अभियंता (प्रशासन) एस.एस. चौधरी, कार्यकारी अभियंता आर.जी.लोंढे, अति.कार्यकारी अभियंता जी.टी. महाजन, उपकार्यकारी अभियंता डी.ई. पिसे, सहायक अभियंता वानखेडे, ए.आर.नळे, एन.व्ही. पिन्नेंटी, एस.डी.बेरसाळे, एन.डी. मांडोकार, स्थापत्य विभागाचे उपकार्यकारी अभियंता खंदारे आदींनी परिश्रम घेतले.

अखंडित व योग्य दाबाची वीज...या उपकेंद्राचा लाभ हिंगोली शहरातील जवळपास चार हजार वीज ग्राहकांना होणार आहे. अखंडित व योग्य दाबाचा वीजपुरवठा करण्यास उपकेंद्राची मदत होणार आहे.  लिंबाळा येथील २२० केव्ही  या अतिउच्चदाब विद्युत केंद्राद्वारे खाकीबाबा मठ उपकेंद्रास ३३ केव्ही दाबाचा वीजपुरवठा होणार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात वीज पोहोचवण्याचे उद्देशाने केंद्रशासनाच्या ऊर्जा विभागाच्या वतीने शहरी भागातील विद्युतीकरणासाठी अर्थसहाय्य केले जात असून एकात्मिक ऊर्जा विकास योजनेच्या माध्यमातून महावितरणच्या वतीने अनेक ठिकाणी नवीन उपकेंद्रे उभारली जात आहेत.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजHingoliहिंगोलीState Governmentराज्य सरकार