शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

रात्री बारानंतरही अग्निशमन कार्यालय अलर्ट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:34 IST

रिॲलिटी चेक अग्निशमन विभाग कार्यालय ...१२.२५ हिंगोली: रात्री बारा वाजल्यानंतर माणसाला डुलकी लागते. पण, शहरातील अग्निशमन कार्यालय हे रात्री ...

रिॲलिटी चेक

अग्निशमन विभाग कार्यालय ...१२.२५

हिंगोली: रात्री बारा वाजल्यानंतर माणसाला डुलकी लागते. पण, शहरातील अग्निशमन कार्यालय हे रात्री बारा वाजल्यानंतरही अलर्ट असते. रात्रपाळीला चालकासह दोन फायरमन कर्तव्यावर होते. यापैकी एक चालक, एक फायरमन जागा, तर एक झोपेत असल्याचे दिसले.

शहरातील अग्निशमन कार्यालयाला स्वत:चे कर्मचारी नाहीत. स्वच्छता विभागाचे कर्मचारीच काही वर्षापासून अग्निशमन कार्यालयाचा कारभार पाहतात. रात्री बारा वाजल्यानंतर कोणत्याही व्यक्तीस झोप लागणे साहजिक आहे. परंतु, आमच्यासाठी झोप ‘वैरी’ आहे म्हणून तर आम्ही डोळ्यात तेल घालून ड्युटी करतो, अशी प्रतिक्रिया येथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी दिली. शॉर्टसर्किट म्हणा, अचानक आग लागणे म्हणा, अशा घटना सांगून येत नसतात. कोणत्याही वेळी कॉल आला की, आम्हाला लगेच जावे लागते, असेही कर्मचाऱ्याने सांगितले. अग्निशमन विभागाकडे १८ कर्मचारी असून, यामध्ये चालक ५, तर १३ फायरमनचा समावेश आहे. आमच्या प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आठ - आठ तास ड्युटी करतो, असे उपस्थित चालकाने सांगितले.

तयार स्थितीत दोन बंब...

घटना कधी सांगून येत नाही. त्यामुळे अग्निशमनचे दोन्हीही बंब तयार ठेवावे लागतात. कोणत्याही वेळी नागरिकाचा फोन येऊ शकतो. त्यासाठी अलर्ट राहावे लागते. घटनास्थळी कोणतीही कमतरता पडू नये म्हणून सर्व तयारीने आम्ही मुख्यालयी जागेच असतो. अग्निशमन कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वारही उघडेच असते. प्रमुखाचा फोन आला की, आम्ही घटनास्थळी रवाना होतो.

दोन कर्मचारी जागे...

शहरातून जाणाऱ्या अकोला रोडवरील अग्निमशन कार्यालयात रात्रपाळीला तीन कर्मचारी असतात. यापैकी एक चालक, दोन फायरमन असतात. प्रत्येक कर्मचाऱ्याला आठ तासांची ड्युटी वाटून दिलेली आहे. सोमवारी रात्री १२.२५ वाजण्याच्या दरम्यान एक चालक, एक फायरमन जागेच होते. दुसरा फायरमन मात्र झोपी गेलेला दिसून आला.

आळसपणा भोवतो...

आम्ही स्वच्छता विभागाचे कर्मचारी असलो तरी कामाच्या बाबतीत आळसपणा मात्र अजिबात करीत नाहीत. जेवढे काम स्वच्छता विभागाचे करतो. त्यापेक्षा जास्तीची सेवा अग्निशमन विभाग करतो. आळसपणा काही कामाचा नसतो म्हणून नेहमी सतर्क राहतो.

- नियम काय सांगतो?

ड्युटीवर असताना कोणत्याही कर्मचाऱ्याने झोपी जाता कामा नये. कोणत्याही वेळी नागरिकांचा फोन येऊ शकतो. त्यामुळे फोनकडे लक्ष देत अलर्ट राहाणे तितकेच महत्त्वाचे आहे. कार्यालयात ठेवलेले वाहन चांगल्या स्थितीत आहे का? याची खातरजमा करणे चालकाचे, तर यंत्र बरोबर आहेत, हे पाहणे फायरमनचे काम आहे.

प्रतिक्रिया...

एका गाडीची आवश्यकता

हिंगोली शहराची लोकसंख्या एक लाखाच्यावर पोहोचली आहे. शहराच्या लोकसंख्येच्या मानाने दोन गाड्या (बंब) अपुऱ्या पडत आहेत. याचबरोबर शासनाने तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. सतर्क राहण्याच्या सूचना ड्युटीवरील कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत.

- बाळू बांगर, अग्निशमन विभाग प्रमुख, हिंगोली