शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

रात्री बारानंतरही अग्निशमन कार्यालय अलर्ट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:34 IST

रिॲलिटी चेक अग्निशमन विभाग कार्यालय ...१२.२५ हिंगोली: रात्री बारा वाजल्यानंतर माणसाला डुलकी लागते. पण, शहरातील अग्निशमन कार्यालय हे रात्री ...

रिॲलिटी चेक

अग्निशमन विभाग कार्यालय ...१२.२५

हिंगोली: रात्री बारा वाजल्यानंतर माणसाला डुलकी लागते. पण, शहरातील अग्निशमन कार्यालय हे रात्री बारा वाजल्यानंतरही अलर्ट असते. रात्रपाळीला चालकासह दोन फायरमन कर्तव्यावर होते. यापैकी एक चालक, एक फायरमन जागा, तर एक झोपेत असल्याचे दिसले.

शहरातील अग्निशमन कार्यालयाला स्वत:चे कर्मचारी नाहीत. स्वच्छता विभागाचे कर्मचारीच काही वर्षापासून अग्निशमन कार्यालयाचा कारभार पाहतात. रात्री बारा वाजल्यानंतर कोणत्याही व्यक्तीस झोप लागणे साहजिक आहे. परंतु, आमच्यासाठी झोप ‘वैरी’ आहे म्हणून तर आम्ही डोळ्यात तेल घालून ड्युटी करतो, अशी प्रतिक्रिया येथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी दिली. शॉर्टसर्किट म्हणा, अचानक आग लागणे म्हणा, अशा घटना सांगून येत नसतात. कोणत्याही वेळी कॉल आला की, आम्हाला लगेच जावे लागते, असेही कर्मचाऱ्याने सांगितले. अग्निशमन विभागाकडे १८ कर्मचारी असून, यामध्ये चालक ५, तर १३ फायरमनचा समावेश आहे. आमच्या प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आठ - आठ तास ड्युटी करतो, असे उपस्थित चालकाने सांगितले.

तयार स्थितीत दोन बंब...

घटना कधी सांगून येत नाही. त्यामुळे अग्निशमनचे दोन्हीही बंब तयार ठेवावे लागतात. कोणत्याही वेळी नागरिकाचा फोन येऊ शकतो. त्यासाठी अलर्ट राहावे लागते. घटनास्थळी कोणतीही कमतरता पडू नये म्हणून सर्व तयारीने आम्ही मुख्यालयी जागेच असतो. अग्निशमन कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वारही उघडेच असते. प्रमुखाचा फोन आला की, आम्ही घटनास्थळी रवाना होतो.

दोन कर्मचारी जागे...

शहरातून जाणाऱ्या अकोला रोडवरील अग्निमशन कार्यालयात रात्रपाळीला तीन कर्मचारी असतात. यापैकी एक चालक, दोन फायरमन असतात. प्रत्येक कर्मचाऱ्याला आठ तासांची ड्युटी वाटून दिलेली आहे. सोमवारी रात्री १२.२५ वाजण्याच्या दरम्यान एक चालक, एक फायरमन जागेच होते. दुसरा फायरमन मात्र झोपी गेलेला दिसून आला.

आळसपणा भोवतो...

आम्ही स्वच्छता विभागाचे कर्मचारी असलो तरी कामाच्या बाबतीत आळसपणा मात्र अजिबात करीत नाहीत. जेवढे काम स्वच्छता विभागाचे करतो. त्यापेक्षा जास्तीची सेवा अग्निशमन विभाग करतो. आळसपणा काही कामाचा नसतो म्हणून नेहमी सतर्क राहतो.

- नियम काय सांगतो?

ड्युटीवर असताना कोणत्याही कर्मचाऱ्याने झोपी जाता कामा नये. कोणत्याही वेळी नागरिकांचा फोन येऊ शकतो. त्यामुळे फोनकडे लक्ष देत अलर्ट राहाणे तितकेच महत्त्वाचे आहे. कार्यालयात ठेवलेले वाहन चांगल्या स्थितीत आहे का? याची खातरजमा करणे चालकाचे, तर यंत्र बरोबर आहेत, हे पाहणे फायरमनचे काम आहे.

प्रतिक्रिया...

एका गाडीची आवश्यकता

हिंगोली शहराची लोकसंख्या एक लाखाच्यावर पोहोचली आहे. शहराच्या लोकसंख्येच्या मानाने दोन गाड्या (बंब) अपुऱ्या पडत आहेत. याचबरोबर शासनाने तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. सतर्क राहण्याच्या सूचना ड्युटीवरील कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत.

- बाळू बांगर, अग्निशमन विभाग प्रमुख, हिंगोली