शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
5
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
6
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
7
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
8
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
9
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
10
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
11
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
12
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
13
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
14
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
15
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
16
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
17
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
18
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
19
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
20
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू

रात्री बारानंतरही अग्निशमन कार्यालय अलर्ट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:34 IST

रिॲलिटी चेक अग्निशमन विभाग कार्यालय ...१२.२५ हिंगोली: रात्री बारा वाजल्यानंतर माणसाला डुलकी लागते. पण, शहरातील अग्निशमन कार्यालय हे रात्री ...

रिॲलिटी चेक

अग्निशमन विभाग कार्यालय ...१२.२५

हिंगोली: रात्री बारा वाजल्यानंतर माणसाला डुलकी लागते. पण, शहरातील अग्निशमन कार्यालय हे रात्री बारा वाजल्यानंतरही अलर्ट असते. रात्रपाळीला चालकासह दोन फायरमन कर्तव्यावर होते. यापैकी एक चालक, एक फायरमन जागा, तर एक झोपेत असल्याचे दिसले.

शहरातील अग्निशमन कार्यालयाला स्वत:चे कर्मचारी नाहीत. स्वच्छता विभागाचे कर्मचारीच काही वर्षापासून अग्निशमन कार्यालयाचा कारभार पाहतात. रात्री बारा वाजल्यानंतर कोणत्याही व्यक्तीस झोप लागणे साहजिक आहे. परंतु, आमच्यासाठी झोप ‘वैरी’ आहे म्हणून तर आम्ही डोळ्यात तेल घालून ड्युटी करतो, अशी प्रतिक्रिया येथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी दिली. शॉर्टसर्किट म्हणा, अचानक आग लागणे म्हणा, अशा घटना सांगून येत नसतात. कोणत्याही वेळी कॉल आला की, आम्हाला लगेच जावे लागते, असेही कर्मचाऱ्याने सांगितले. अग्निशमन विभागाकडे १८ कर्मचारी असून, यामध्ये चालक ५, तर १३ फायरमनचा समावेश आहे. आमच्या प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आठ - आठ तास ड्युटी करतो, असे उपस्थित चालकाने सांगितले.

तयार स्थितीत दोन बंब...

घटना कधी सांगून येत नाही. त्यामुळे अग्निशमनचे दोन्हीही बंब तयार ठेवावे लागतात. कोणत्याही वेळी नागरिकाचा फोन येऊ शकतो. त्यासाठी अलर्ट राहावे लागते. घटनास्थळी कोणतीही कमतरता पडू नये म्हणून सर्व तयारीने आम्ही मुख्यालयी जागेच असतो. अग्निशमन कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वारही उघडेच असते. प्रमुखाचा फोन आला की, आम्ही घटनास्थळी रवाना होतो.

दोन कर्मचारी जागे...

शहरातून जाणाऱ्या अकोला रोडवरील अग्निमशन कार्यालयात रात्रपाळीला तीन कर्मचारी असतात. यापैकी एक चालक, दोन फायरमन असतात. प्रत्येक कर्मचाऱ्याला आठ तासांची ड्युटी वाटून दिलेली आहे. सोमवारी रात्री १२.२५ वाजण्याच्या दरम्यान एक चालक, एक फायरमन जागेच होते. दुसरा फायरमन मात्र झोपी गेलेला दिसून आला.

आळसपणा भोवतो...

आम्ही स्वच्छता विभागाचे कर्मचारी असलो तरी कामाच्या बाबतीत आळसपणा मात्र अजिबात करीत नाहीत. जेवढे काम स्वच्छता विभागाचे करतो. त्यापेक्षा जास्तीची सेवा अग्निशमन विभाग करतो. आळसपणा काही कामाचा नसतो म्हणून नेहमी सतर्क राहतो.

- नियम काय सांगतो?

ड्युटीवर असताना कोणत्याही कर्मचाऱ्याने झोपी जाता कामा नये. कोणत्याही वेळी नागरिकांचा फोन येऊ शकतो. त्यामुळे फोनकडे लक्ष देत अलर्ट राहाणे तितकेच महत्त्वाचे आहे. कार्यालयात ठेवलेले वाहन चांगल्या स्थितीत आहे का? याची खातरजमा करणे चालकाचे, तर यंत्र बरोबर आहेत, हे पाहणे फायरमनचे काम आहे.

प्रतिक्रिया...

एका गाडीची आवश्यकता

हिंगोली शहराची लोकसंख्या एक लाखाच्यावर पोहोचली आहे. शहराच्या लोकसंख्येच्या मानाने दोन गाड्या (बंब) अपुऱ्या पडत आहेत. याचबरोबर शासनाने तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. सतर्क राहण्याच्या सूचना ड्युटीवरील कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत.

- बाळू बांगर, अग्निशमन विभाग प्रमुख, हिंगोली