शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
2
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
3
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
4
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
5
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
6
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
7
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
8
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
9
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
10
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
11
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
12
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
13
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगेंसोबत उद्धव ठाकरेंनी फोनवरून साधला संवाद
14
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले
15
'ट्रम्प यांच्या टॅरिफ'ला धक्का बसणार ! जपानमधील मेगा डीलनंतर पंतप्रधान मोदी चीनला पोहोचले
16
रात्री गाढ झोपले, सकाळी मृतदेह बाहेर काढले; भूस्खलनात आई-वडिलांसह ५ मुलांचा मृत्यू
17
Nagpur Girl Stabbed: एका दिवसाची आईची साथ सुटली अन् एंजेल नेहमीसाठीच दुरावली!
18
फोनवरील 'तो' संवाद अन् ट्रम्प यांचा प्लॅन फसला; भारत-अमेरिका संबंध कसे बिघडले? सर्वात मोठा खुलासा
19
Gauri Pujan 2025: गौरी पूजेच्या वेळी माहेरवाशिणीचाही असतो मान; तिला का बोलवतात? वाचा
20
बदलीमुळे अभियंता संतापला, रागाच्या भरात पाणीपुरवठा खंडित केला; सत्य आले समोर

रात्री बारानंतरही अग्निशमन कार्यालय अलर्ट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:34 IST

रिॲलिटी चेक अग्निशमन विभाग कार्यालय ...१२.२५ हिंगोली: रात्री बारा वाजल्यानंतर माणसाला डुलकी लागते. पण, शहरातील अग्निशमन कार्यालय हे रात्री ...

रिॲलिटी चेक

अग्निशमन विभाग कार्यालय ...१२.२५

हिंगोली: रात्री बारा वाजल्यानंतर माणसाला डुलकी लागते. पण, शहरातील अग्निशमन कार्यालय हे रात्री बारा वाजल्यानंतरही अलर्ट असते. रात्रपाळीला चालकासह दोन फायरमन कर्तव्यावर होते. यापैकी एक चालक, एक फायरमन जागा, तर एक झोपेत असल्याचे दिसले.

शहरातील अग्निशमन कार्यालयाला स्वत:चे कर्मचारी नाहीत. स्वच्छता विभागाचे कर्मचारीच काही वर्षापासून अग्निशमन कार्यालयाचा कारभार पाहतात. रात्री बारा वाजल्यानंतर कोणत्याही व्यक्तीस झोप लागणे साहजिक आहे. परंतु, आमच्यासाठी झोप ‘वैरी’ आहे म्हणून तर आम्ही डोळ्यात तेल घालून ड्युटी करतो, अशी प्रतिक्रिया येथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी दिली. शॉर्टसर्किट म्हणा, अचानक आग लागणे म्हणा, अशा घटना सांगून येत नसतात. कोणत्याही वेळी कॉल आला की, आम्हाला लगेच जावे लागते, असेही कर्मचाऱ्याने सांगितले. अग्निशमन विभागाकडे १८ कर्मचारी असून, यामध्ये चालक ५, तर १३ फायरमनचा समावेश आहे. आमच्या प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आठ - आठ तास ड्युटी करतो, असे उपस्थित चालकाने सांगितले.

तयार स्थितीत दोन बंब...

घटना कधी सांगून येत नाही. त्यामुळे अग्निशमनचे दोन्हीही बंब तयार ठेवावे लागतात. कोणत्याही वेळी नागरिकाचा फोन येऊ शकतो. त्यासाठी अलर्ट राहावे लागते. घटनास्थळी कोणतीही कमतरता पडू नये म्हणून सर्व तयारीने आम्ही मुख्यालयी जागेच असतो. अग्निशमन कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वारही उघडेच असते. प्रमुखाचा फोन आला की, आम्ही घटनास्थळी रवाना होतो.

दोन कर्मचारी जागे...

शहरातून जाणाऱ्या अकोला रोडवरील अग्निमशन कार्यालयात रात्रपाळीला तीन कर्मचारी असतात. यापैकी एक चालक, दोन फायरमन असतात. प्रत्येक कर्मचाऱ्याला आठ तासांची ड्युटी वाटून दिलेली आहे. सोमवारी रात्री १२.२५ वाजण्याच्या दरम्यान एक चालक, एक फायरमन जागेच होते. दुसरा फायरमन मात्र झोपी गेलेला दिसून आला.

आळसपणा भोवतो...

आम्ही स्वच्छता विभागाचे कर्मचारी असलो तरी कामाच्या बाबतीत आळसपणा मात्र अजिबात करीत नाहीत. जेवढे काम स्वच्छता विभागाचे करतो. त्यापेक्षा जास्तीची सेवा अग्निशमन विभाग करतो. आळसपणा काही कामाचा नसतो म्हणून नेहमी सतर्क राहतो.

- नियम काय सांगतो?

ड्युटीवर असताना कोणत्याही कर्मचाऱ्याने झोपी जाता कामा नये. कोणत्याही वेळी नागरिकांचा फोन येऊ शकतो. त्यामुळे फोनकडे लक्ष देत अलर्ट राहाणे तितकेच महत्त्वाचे आहे. कार्यालयात ठेवलेले वाहन चांगल्या स्थितीत आहे का? याची खातरजमा करणे चालकाचे, तर यंत्र बरोबर आहेत, हे पाहणे फायरमनचे काम आहे.

प्रतिक्रिया...

एका गाडीची आवश्यकता

हिंगोली शहराची लोकसंख्या एक लाखाच्यावर पोहोचली आहे. शहराच्या लोकसंख्येच्या मानाने दोन गाड्या (बंब) अपुऱ्या पडत आहेत. याचबरोबर शासनाने तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. सतर्क राहण्याच्या सूचना ड्युटीवरील कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत.

- बाळू बांगर, अग्निशमन विभाग प्रमुख, हिंगोली