शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

शेवटी गुरांच्या सांभाळासाठी धावला बळीराजाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 00:00 IST

अकोल्यावरुन हैदराबादकडे कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या ४० गुरांची हिंगोली शहर पोलिसांनी सुटका केली होती. मात्र गुरांच्या सांभाळासाठी गोशाळेसह अनेक विभागांची दारे ठोठावूनही कुणीच दाद न दिल्याने पोलिसांनाच गुरांचे चारापाणी करावे लागले. मात्र पोलीस व गुरांचे शेतकºयाला हाल पहावेनासे झाल्याने त्यांनी संपूर्ण गुरे सांभाळण्याचीच जबाबदारी स्वीकारली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : अकोल्यावरुन हैदराबादकडे कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या ४० गुरांची हिंगोली शहर पोलिसांनी सुटका केली होती. मात्र गुरांच्या सांभाळासाठी गोशाळेसह अनेक विभागांची दारे ठोठावूनही कुणीच दाद न दिल्याने पोलिसांनाच गुरांचे चारापाणी करावे लागले. मात्र पोलीस व गुरांचे शेतकºयाला हाल पहावेनासे झाल्याने त्यांनी संपूर्ण गुरे सांभाळण्याचीच जबाबदारी स्वीकारली.२३ मार्च रोजी अकोल्यावरुन हैदराबाद मार्गे कत्तलीसाठी घेऊन जाणाºया ४० गुरांची हिंगोली शहर पोलिसांनी सुटका केली होती. या प्रकरणी २४ मार्च रोजी गुरांची वाहतूक करणाºयाविरुद्ध गुन्हाही दाखल केला. हे प्रकरण न्यायालयात गेल्याने गुरांच्या संभाळासाठी शहर पोलिसांनी अनेक विभागांना लेखी पत्र दिले. मात्र प्रत्येक विभागाकडून वेगवेगळी उत्तरे देत गोशाळेनेही नकार दर्शविला. त्यामुळे गुरांचे चारा पाणी पोलीस कर्मचाºयांनाच करावे लागत होते. गुरांना चारा देण्यासाठी अनेक सामाजिक संस्थासह नागरिकांनी मदत केली. मात्र त्यांना सांभाळण्यासाठी कोणीच पुढे येत नसल्याचे चित्र होते. एका- एका गुरांची अनेक जण तोंडी मागणी करीत होते. मात्र सर्व गुरे एकाच शेतकºयांनी घेऊन जावीत, असे पोलीस कर्मचाºयांकडून सांगितले जात होते. त्यामुळे सर्व गुरांची जबाबदारी स्वीकारणाºयांच्या पोलीस प्रतीक्षेत होते. शेवटी हिंगोलीतीलच शेतकरी शेख चांद शेख अकबर यांने सर्व गुरे संभाळण्याची जबाबदारी स्वीकारत ठाण्यात रीतसर अर्ज केला. त्यानुसार त्यांच्या अर्जाचा विचार करुन सदरील शेतकºयांकडून हमी घेण्यात आली व सर्व गुरे पोलीस कर्मचाºयांनी शेतकºयाच्या शेतापर्यंत गुरे नेऊन घातली. पोलीस ठाण्याच्या आवारात १४ दिवसांपासून घुटमळत असलेल्या बैलांनी आज मोकळा श्वास घेतला. रस्त्यावरुन घेऊन जाणाºया बैलांकडे सर्वाच्याच नजरा एकवटल्या होत्या. जो- तो गुरांचा सांभाळ करणाºयाचे नाव विचारत होता.कोथळर परिसरात शेख चाँद शेख अकबर यांची जवळपास ३० एकर शेती आहे. त्यामुळे त्यांना गुरांची व पोलिसांची दया आली. त्यानुसार त्यांनी मागणी केली. मात्र जेव्हा मूळ मालक गुरे सोडविण्यासाठी येईल तेव्हा त्यांना गुरे वाहनातून ताब्यात घेतली तेव्हापासून प्रतिबैल १५० रुपयांप्रमाणे मजुरी द्यावी लागणार असल्याने पोउपनि तान्हाजी चेरले यांनी सांगितले. पोलीस गुरांचे चारापाणी करीत असल्याचे पाहावत नसल्यानेच आपण हा धाडसी निर्णय घेतल्याचे शेतकरी शेख चाँद यांनी सांगितले. गुरांचे प्रकरण न्यायालयात सुरु आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीHingoli policeहिंगोली पोलीस