शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
2
टीम इंडियाने 'बुटका' म्हणून हिणवलं, विजयानंतर बवुमा म्हणाला- आता आत्मविश्वास आणखी वाढलाय...
3
मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस नेत्याला गाडीत कोंबून मारहाण; आरोपीचा व्हिडीओ समोर आल्याने नवा ट्विस्ट
4
थार मालकाची सटकली...! हरियाणाच्या DGP ना कायदेशीर नोटीस पाठविली, म्हणाला, मी ३० लाख मोजून...
5
आज अर्ध्या किमतीत मिळतोय HDFC AMC चा शेअर; का चर्चेत आहे हा स्टॉक?
6
“आमच्या उमेदवाराला विजयी करा अन् १० लाख मिळवा”; भाजपा नेत्याची अख्ख्या गावाला खुली ऑफर
7
Satara Accident Video: रस्ता ओलांडण्यापूर्वीच मृत्यूची झडप! फलटणमध्ये मिनी बसने डिव्हायडर तोडत चिरडले
8
लिव्ह-इन पार्टनरला संपवलं? तरुणीचा मृतदेह रुग्णालयात सोडून प्रियकर पसार; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
9
SMAT: सीएसकेच्या उर्विल पटेलचं वादळी शतक; १८३ धावांचे लक्ष्य अवघ्या १२.३ षटकांत गाठले!
10
Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
11
कमला पसंद, राजश्री पान मसाला कंपनीच्या मालकाच्या सुनेने आयुष्य संपवले; दोन लग्न, एक पत्नी अभिनेत्री... चिठ्ठीत काय?
12
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: ७ राशींना 'धनलक्ष्मी'चा विशेष लाभ, ५ राशींना संयमाचा सल्ला!
13
एकाच गावातील ३ तरुणी एकत्र गायब, पण तिघींची कहाणी वेगवेगळी; २४ तासांत पोलिसांनी काढले शोधून!
14
धक्कादायक! बास्केटबॉलचा सराव करताना छातीवर पोल पडला; खेळाडूचा जागीच मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
15
स्मृती मानधना की पलाश मुच्छल दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत? कमाईत कोण आघाडीवर जाणून घ्या
16
भाकरी खाता की नोटा? नांदेडचं लंडन झालेलं दिसलं नाही म्हणत शिरसाटांचा अशोक चव्हाणांवर थेट हल्ला
17
"माझी काय चूक?, उलट मी तिला वाचवलंय...", आधी पलाश मुच्छलसोबतचे 'ते' चॅट्स अन् आता कोरिओग्राफरचं नवं स्टेटस
18
STचा शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
19
IND vs SA: "भारतानं अक्षरशः आमच्यासमोर लोटांगण..." द. आफ्रिकेच्या प्रशिक्षकाची जीभ घसरली!
20
पाकिस्तानने पुन्हा गरळ ओकली; श्रीराम मंदिराच्या धार्मिक ध्वजावरुन संयुक्त राष्ट्रांना केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शेवटी गुरांच्या सांभाळासाठी धावला बळीराजाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 00:00 IST

अकोल्यावरुन हैदराबादकडे कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या ४० गुरांची हिंगोली शहर पोलिसांनी सुटका केली होती. मात्र गुरांच्या सांभाळासाठी गोशाळेसह अनेक विभागांची दारे ठोठावूनही कुणीच दाद न दिल्याने पोलिसांनाच गुरांचे चारापाणी करावे लागले. मात्र पोलीस व गुरांचे शेतकºयाला हाल पहावेनासे झाल्याने त्यांनी संपूर्ण गुरे सांभाळण्याचीच जबाबदारी स्वीकारली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : अकोल्यावरुन हैदराबादकडे कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या ४० गुरांची हिंगोली शहर पोलिसांनी सुटका केली होती. मात्र गुरांच्या सांभाळासाठी गोशाळेसह अनेक विभागांची दारे ठोठावूनही कुणीच दाद न दिल्याने पोलिसांनाच गुरांचे चारापाणी करावे लागले. मात्र पोलीस व गुरांचे शेतकºयाला हाल पहावेनासे झाल्याने त्यांनी संपूर्ण गुरे सांभाळण्याचीच जबाबदारी स्वीकारली.२३ मार्च रोजी अकोल्यावरुन हैदराबाद मार्गे कत्तलीसाठी घेऊन जाणाºया ४० गुरांची हिंगोली शहर पोलिसांनी सुटका केली होती. या प्रकरणी २४ मार्च रोजी गुरांची वाहतूक करणाºयाविरुद्ध गुन्हाही दाखल केला. हे प्रकरण न्यायालयात गेल्याने गुरांच्या संभाळासाठी शहर पोलिसांनी अनेक विभागांना लेखी पत्र दिले. मात्र प्रत्येक विभागाकडून वेगवेगळी उत्तरे देत गोशाळेनेही नकार दर्शविला. त्यामुळे गुरांचे चारा पाणी पोलीस कर्मचाºयांनाच करावे लागत होते. गुरांना चारा देण्यासाठी अनेक सामाजिक संस्थासह नागरिकांनी मदत केली. मात्र त्यांना सांभाळण्यासाठी कोणीच पुढे येत नसल्याचे चित्र होते. एका- एका गुरांची अनेक जण तोंडी मागणी करीत होते. मात्र सर्व गुरे एकाच शेतकºयांनी घेऊन जावीत, असे पोलीस कर्मचाºयांकडून सांगितले जात होते. त्यामुळे सर्व गुरांची जबाबदारी स्वीकारणाºयांच्या पोलीस प्रतीक्षेत होते. शेवटी हिंगोलीतीलच शेतकरी शेख चांद शेख अकबर यांने सर्व गुरे संभाळण्याची जबाबदारी स्वीकारत ठाण्यात रीतसर अर्ज केला. त्यानुसार त्यांच्या अर्जाचा विचार करुन सदरील शेतकºयांकडून हमी घेण्यात आली व सर्व गुरे पोलीस कर्मचाºयांनी शेतकºयाच्या शेतापर्यंत गुरे नेऊन घातली. पोलीस ठाण्याच्या आवारात १४ दिवसांपासून घुटमळत असलेल्या बैलांनी आज मोकळा श्वास घेतला. रस्त्यावरुन घेऊन जाणाºया बैलांकडे सर्वाच्याच नजरा एकवटल्या होत्या. जो- तो गुरांचा सांभाळ करणाºयाचे नाव विचारत होता.कोथळर परिसरात शेख चाँद शेख अकबर यांची जवळपास ३० एकर शेती आहे. त्यामुळे त्यांना गुरांची व पोलिसांची दया आली. त्यानुसार त्यांनी मागणी केली. मात्र जेव्हा मूळ मालक गुरे सोडविण्यासाठी येईल तेव्हा त्यांना गुरे वाहनातून ताब्यात घेतली तेव्हापासून प्रतिबैल १५० रुपयांप्रमाणे मजुरी द्यावी लागणार असल्याने पोउपनि तान्हाजी चेरले यांनी सांगितले. पोलीस गुरांचे चारापाणी करीत असल्याचे पाहावत नसल्यानेच आपण हा धाडसी निर्णय घेतल्याचे शेतकरी शेख चाँद यांनी सांगितले. गुरांचे प्रकरण न्यायालयात सुरु आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीHingoli policeहिंगोली पोलीस