शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अखेर मुख्यमंत्र्यांनी स्थगिती उठविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 00:38 IST

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दलित वस्ती सुधार योजनेच्या कामांमध्ये अनियमितता असल्याच्या तक्रारीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली स्थगिती आ.तान्हाजी मुटकुळे यांनी तक्रार मागे घेतल्याने अखेर आज उठली. तसे पत्र प्राप्त होताच जि.प.सदस्य व सरपंचांच्या चेहºयावर आनंद पसरला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दलित वस्ती सुधार योजनेच्या कामांमध्ये अनियमितता असल्याच्या तक्रारीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली स्थगिती आ.तान्हाजी मुटकुळे यांनी तक्रार मागे घेतल्याने अखेर आज उठली. तसे पत्र प्राप्त होताच जि.प.सदस्य व सरपंचांच्या चेहºयावर आनंद पसरला आहे.हिंगोलीचे आ.तान्हाजी मुटकुळे यांनी काही महिन्यांपूर्वी दलितवस्ती सुधार योजनेतील कामे आराखड्याप्रमाणे होत नसल्याचा आरोप केला होता. तर यात प्राधान्यक्रम पाळला नाही. ठरावीक वस्त्यांनाच निधी दिला. कामांच्या दर्जावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यामध्ये अनेक गावे या निधीपासून वंचित राहात असल्याने अशा वस्त्यांवर अन्याय होत आहे. या अनियमिततेची चौकशी करण्याची मागणी केली होती. यावर मुख्यमंत्र्यांनी सदर कामांना स्थगिती देवून यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले होते. जिल्हा परिषद प्रशासनाने त्यानुसार कामांना स्थगिती देत चौकशी केली. ही प्रक्रिया बरीच लांबलचक चालली.याबाबत अनेकांनी पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्याकडे गाºहाणे मांडले. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. जि.प.च्या पदाधिकाºयांसह सदस्यही आ.मुटकुळे यांना भेटले होते. मात्र ते काही मानायला तयार नव्हते. अखेर यामध्ये जि.प.त बैठक घेवून आगामी निवडणुकांमध्ये याचा वचपा काढण्यावर चर्चा झाली. त्यानंतर ही बाब आ.मुटकुळे यांच्यापर्यंत पोहोचली. पुन्हा काही सदस्य त्यांना भेटले. तेव्हा मुटकुळे यांनीही यात माघार घेण्याची तयारी दर्शविली. अनेक गावांमध्ये ही कामे सुरू झाली होती. कामे थांबवायला सांगूनही काहींनी ही कामे सुरूच ठेवली होती. त्यामुळे अशांची मोठी गोची झाली होती. स्थगिती न उठल्यास यावर्षी हा निधी परत जाण्याची भीती होती. त्यामुळे केलेल्या कामांचे काय? हा प्रश्न होता. मात्र काहींनी सावध भूमिका घेत ही कामेच केली नव्हती. अशांना आता पुढील महिनाभरात ही कामे पूर्ण करण्याची कवायत करावी लागणार आहे.गेल्यावर्षीच्या २६ कोटींच्या या कामांना आता प्रारंभ होणार असला तरीही वाळूचा प्रश्न मात्र सगळीकडेच निर्माण झालेला आहे. त्यातच गतवर्षीचीच कामे नसल्याने यंदाच्या २0 कोटी रुपयांचा प्रश्न भिजत पडला होता. त्याचे नियोजन करणेही शक्य होत नव्हते. आता जुनी कामे मार्गी लागणार असल्याने नव्या नियोजनाकडे वळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. समाजकल्याण समितीकडून तशा हालचाली मागील बैठकीतच सुरू झाल्या होत्या. येत्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत. त्यावरच आज चर्चा झडताना दिसत होती.निधीच्या खर्चावरील स्थगिती उठविण्यासाठी पुन्हाही आ.तान्हाजी मुटकुळे यांनाच जोरदार प्रयत्न करावे लागले. मार्च एण्ड व निवडणूक आचारसंहितेच्या तोंडावर यासाठी गडबड दिसत होती.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदgovernment schemeसरकारी योजना