शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

जि.प.च्या शिक्षण सभापतींवर अविश्वास दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:31 IST

हिंगोली जिल्हा परिषदेत पहिल्या अडीच वर्षाच्या काळात पदाधिकारी निवड ही त्या-त्या पक्षाच्या सदस्यांना विश्वासात घेवून व नेतेमंडळीच्या संमतीने झाली ...

हिंगोली जिल्हा परिषदेत पहिल्या अडीच वर्षाच्या काळात पदाधिकारी निवड ही त्या-त्या पक्षाच्या सदस्यांना विश्वासात घेवून व नेतेमंडळीच्या संमतीने झाली होती. त्यावरून काही प्रमाणात धूसपूस असली तरीही ती कधी चव्हाट्यावर आली नाही. त्यावरुन अविश्वासाचे नाट्यही रंगले नाही. मात्र अडीच वर्षानंतर दुसऱ्या पदाधिकारी निवडीच्या वेळी बरेच रामायण घडले. जि.प.अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड बिनविरोध झाली. मात्र उपाध्यक्ष निवडीवरून थोडीबहुत कुरबूर होती. मात्र सभापती निवडीच्या वेळी सगळाच गोंधळ झाला. पक्षाने ठरविलेल्यांना बाजूला सारून इतरांनीच आपल्या पदरात पद पाडून घेतल्याचे राष्ट्रवादीकडून घडले. तर शिवसेनेने काँग्रेसचे एक पद बळकावले. यावरून काँग्रेसच्या दिवंगत राजीव सातव यांच्या गटाची नाराजीही झाली होती. मात्र स्थानिक राजकारणात उगीच मतभेद नको म्हणून सातव यांनी मोठ्या मनाने पुढे कधी या विषयावरून काही पाऊल उचलले नाही. त्यानंतर पुन्हा पदाधिकारी निवडीवरून नाराजी उफाळून आली होती. अनेकांनी शिवसेना व काँग्रेसच्या नेत्यांना भेटून प्रयत्न चालविले होते. तेही प्रकरण पुन्हा शमले. मात्र सात ते आठ महिन्यांपूर्वी शिक्षण सभापती रत्नमाला चव्हाण यांच्यावर अविश्वास आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यात पुन्हा वातावरण चांगलेच तापले होते. मात्र चव्हाण यांनी नेत्यांची मनधरणी केल्यानंतर पुन्हा हा विषय जागीच थांबला. त्यावेळी आधी कोणी स्वाक्षऱ्या करायच्या यावरूनही मतभेद होते.

मागील आठ दिवसांपासून पुन्हा एकदा चव्हाण यांच्याविरोधात रण पेटत असल्याचे दिसत होते. मात्र सदस्य उघडपणे काही बोलायला तयार नव्हते. आळीमिळी गुपचिळी या धोरणानुसार सर्व पक्षाच्या बहुतांश सदस्यांनी या ठरावावर स्वाक्षऱ्याही करून टाकल्या होत्या. त्यात मग पदाधिकारीही मागे नसल्याचे दिसत होते. खुद्द राष्ट्रवादीचेच सदस्यही यात आघाडीवर असल्याचे दिसून आले. त्याचा परिणाम म्हणून जवळपास ४२ सदस्यांच्या स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. काहींनी वैयक्तिक अडचणीमुळे केल्या नाहीत. तर काहींचा सभापतींना पाठिंबा असल्याने स्वाक्षरीस नकार दिला. मात्र एक तृतियांशपेक्षा जास्त सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्यामुळे अविश्वास दाखल करण्यात आला आहे.

आता प्रतीक्षा सभेकडे

मंगळवारी सायंकाळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याकडे अविश्वास दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी अनेकदा वादळ निर्माण झाले तरीही ते पेल्यातले ठरले होते. यावेळी थेट दाखल होण्यापर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे आता प्रशासन यासाठी सभा कधी लावणार? याकडे सदस्यांचे लक्ष लागले आहे.