शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

जि.प.च्या शिक्षण सभापतींवर अविश्वास दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:31 IST

हिंगोली जिल्हा परिषदेत पहिल्या अडीच वर्षाच्या काळात पदाधिकारी निवड ही त्या-त्या पक्षाच्या सदस्यांना विश्वासात घेवून व नेतेमंडळीच्या संमतीने झाली ...

हिंगोली जिल्हा परिषदेत पहिल्या अडीच वर्षाच्या काळात पदाधिकारी निवड ही त्या-त्या पक्षाच्या सदस्यांना विश्वासात घेवून व नेतेमंडळीच्या संमतीने झाली होती. त्यावरून काही प्रमाणात धूसपूस असली तरीही ती कधी चव्हाट्यावर आली नाही. त्यावरुन अविश्वासाचे नाट्यही रंगले नाही. मात्र अडीच वर्षानंतर दुसऱ्या पदाधिकारी निवडीच्या वेळी बरेच रामायण घडले. जि.प.अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड बिनविरोध झाली. मात्र उपाध्यक्ष निवडीवरून थोडीबहुत कुरबूर होती. मात्र सभापती निवडीच्या वेळी सगळाच गोंधळ झाला. पक्षाने ठरविलेल्यांना बाजूला सारून इतरांनीच आपल्या पदरात पद पाडून घेतल्याचे राष्ट्रवादीकडून घडले. तर शिवसेनेने काँग्रेसचे एक पद बळकावले. यावरून काँग्रेसच्या दिवंगत राजीव सातव यांच्या गटाची नाराजीही झाली होती. मात्र स्थानिक राजकारणात उगीच मतभेद नको म्हणून सातव यांनी मोठ्या मनाने पुढे कधी या विषयावरून काही पाऊल उचलले नाही. त्यानंतर पुन्हा पदाधिकारी निवडीवरून नाराजी उफाळून आली होती. अनेकांनी शिवसेना व काँग्रेसच्या नेत्यांना भेटून प्रयत्न चालविले होते. तेही प्रकरण पुन्हा शमले. मात्र सात ते आठ महिन्यांपूर्वी शिक्षण सभापती रत्नमाला चव्हाण यांच्यावर अविश्वास आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यात पुन्हा वातावरण चांगलेच तापले होते. मात्र चव्हाण यांनी नेत्यांची मनधरणी केल्यानंतर पुन्हा हा विषय जागीच थांबला. त्यावेळी आधी कोणी स्वाक्षऱ्या करायच्या यावरूनही मतभेद होते.

मागील आठ दिवसांपासून पुन्हा एकदा चव्हाण यांच्याविरोधात रण पेटत असल्याचे दिसत होते. मात्र सदस्य उघडपणे काही बोलायला तयार नव्हते. आळीमिळी गुपचिळी या धोरणानुसार सर्व पक्षाच्या बहुतांश सदस्यांनी या ठरावावर स्वाक्षऱ्याही करून टाकल्या होत्या. त्यात मग पदाधिकारीही मागे नसल्याचे दिसत होते. खुद्द राष्ट्रवादीचेच सदस्यही यात आघाडीवर असल्याचे दिसून आले. त्याचा परिणाम म्हणून जवळपास ४२ सदस्यांच्या स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. काहींनी वैयक्तिक अडचणीमुळे केल्या नाहीत. तर काहींचा सभापतींना पाठिंबा असल्याने स्वाक्षरीस नकार दिला. मात्र एक तृतियांशपेक्षा जास्त सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्यामुळे अविश्वास दाखल करण्यात आला आहे.

आता प्रतीक्षा सभेकडे

मंगळवारी सायंकाळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याकडे अविश्वास दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी अनेकदा वादळ निर्माण झाले तरीही ते पेल्यातले ठरले होते. यावेळी थेट दाखल होण्यापर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे आता प्रशासन यासाठी सभा कधी लावणार? याकडे सदस्यांचे लक्ष लागले आहे.