शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

जि.प.च्या शिक्षण सभापतींवर अविश्वास दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:31 IST

हिंगोली जिल्हा परिषदेत पहिल्या अडीच वर्षाच्या काळात पदाधिकारी निवड ही त्या-त्या पक्षाच्या सदस्यांना विश्वासात घेवून व नेतेमंडळीच्या संमतीने झाली ...

हिंगोली जिल्हा परिषदेत पहिल्या अडीच वर्षाच्या काळात पदाधिकारी निवड ही त्या-त्या पक्षाच्या सदस्यांना विश्वासात घेवून व नेतेमंडळीच्या संमतीने झाली होती. त्यावरून काही प्रमाणात धूसपूस असली तरीही ती कधी चव्हाट्यावर आली नाही. त्यावरुन अविश्वासाचे नाट्यही रंगले नाही. मात्र अडीच वर्षानंतर दुसऱ्या पदाधिकारी निवडीच्या वेळी बरेच रामायण घडले. जि.प.अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड बिनविरोध झाली. मात्र उपाध्यक्ष निवडीवरून थोडीबहुत कुरबूर होती. मात्र सभापती निवडीच्या वेळी सगळाच गोंधळ झाला. पक्षाने ठरविलेल्यांना बाजूला सारून इतरांनीच आपल्या पदरात पद पाडून घेतल्याचे राष्ट्रवादीकडून घडले. तर शिवसेनेने काँग्रेसचे एक पद बळकावले. यावरून काँग्रेसच्या दिवंगत राजीव सातव यांच्या गटाची नाराजीही झाली होती. मात्र स्थानिक राजकारणात उगीच मतभेद नको म्हणून सातव यांनी मोठ्या मनाने पुढे कधी या विषयावरून काही पाऊल उचलले नाही. त्यानंतर पुन्हा पदाधिकारी निवडीवरून नाराजी उफाळून आली होती. अनेकांनी शिवसेना व काँग्रेसच्या नेत्यांना भेटून प्रयत्न चालविले होते. तेही प्रकरण पुन्हा शमले. मात्र सात ते आठ महिन्यांपूर्वी शिक्षण सभापती रत्नमाला चव्हाण यांच्यावर अविश्वास आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यात पुन्हा वातावरण चांगलेच तापले होते. मात्र चव्हाण यांनी नेत्यांची मनधरणी केल्यानंतर पुन्हा हा विषय जागीच थांबला. त्यावेळी आधी कोणी स्वाक्षऱ्या करायच्या यावरूनही मतभेद होते.

मागील आठ दिवसांपासून पुन्हा एकदा चव्हाण यांच्याविरोधात रण पेटत असल्याचे दिसत होते. मात्र सदस्य उघडपणे काही बोलायला तयार नव्हते. आळीमिळी गुपचिळी या धोरणानुसार सर्व पक्षाच्या बहुतांश सदस्यांनी या ठरावावर स्वाक्षऱ्याही करून टाकल्या होत्या. त्यात मग पदाधिकारीही मागे नसल्याचे दिसत होते. खुद्द राष्ट्रवादीचेच सदस्यही यात आघाडीवर असल्याचे दिसून आले. त्याचा परिणाम म्हणून जवळपास ४२ सदस्यांच्या स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. काहींनी वैयक्तिक अडचणीमुळे केल्या नाहीत. तर काहींचा सभापतींना पाठिंबा असल्याने स्वाक्षरीस नकार दिला. मात्र एक तृतियांशपेक्षा जास्त सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्यामुळे अविश्वास दाखल करण्यात आला आहे.

आता प्रतीक्षा सभेकडे

मंगळवारी सायंकाळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याकडे अविश्वास दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी अनेकदा वादळ निर्माण झाले तरीही ते पेल्यातले ठरले होते. यावेळी थेट दाखल होण्यापर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे आता प्रशासन यासाठी सभा कधी लावणार? याकडे सदस्यांचे लक्ष लागले आहे.