शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

कुंभार समाजाचे १५ कुटुंबे उपासमारीला जातात सामोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:30 IST

हिंगोली : उन्हाळ्याचे तीनच महिने कुंभार समाजाला उदरनिर्वाहासाठी महत्त्वाचे असतात. परंतु, कोरोनाचे रुग्ण वाढल्याने जिल्हा प्रशासनाने टाळेबंदी केली आहे. ...

हिंगोली : उन्हाळ्याचे तीनच महिने कुंभार समाजाला उदरनिर्वाहासाठी महत्त्वाचे असतात. परंतु, कोरोनाचे रुग्ण वाढल्याने जिल्हा प्रशासनाने टाळेबंदी केली आहे. याचा सर्वाधिक फटका कुंभार समाजाला बसल्याची व्यथा कुंभार व्यावसायिकांनी मांडली. सद्य:स्थितीत कुंभार समाजाचे १५ कुटुंबे उपासमारीला सामोरे जात आहेत.

जिल्ह्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. हे पाहून जिल्हा प्रशासनाने १ ते ७ मार्च आणि २६ मार्च ते ४ एप्रिल अशी दोनवेळा टाळेबंदी केली आहे. टाळेबंदीला कुंभार समाजाचा विरोध नाही. परंतु, माठांचा व्यवसाय फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल असा तीनच महिने चालत असल्याने तोही सद्य:स्थितीत बंदच आहे. गल्ली, वाॅर्डातही जावून माठ विकणे अवघड जाते. त्यामुळे दरवर्षी शहरातील गांधी चौक, इंदिरा चौक, बसस्थानक परिसर आदी ठिकाणी कुंभार समाज माठांची विक्री करतो. परंतु, गत दोन वर्षांपासून माठांची विक्री होत नाही. परिणामी उपासमारीला कुंभार समाज तोंड देत आहे. हिंगोली शहरातील गवळीपुरा येथे जवळपास १५ कुटुंबांकडे पिढीजात माठांचा व्यावसाय आहे. यावरच कुटुंबाचा गाडा चालतो. या कुटुंबात ३५ ते ४० लहान-लहान लेकरे आहेत. दिवसाकाठी माठ विक्रीतून चारशे रुपये पदरात पडायचे तेही आता पडेनासे झाले आहेत.

२३ मार्च २०२० मध्ये कोरोना महामारीने सर्वत्र शिरकाव केला. त्यावेळेसपासूनच कुंभार समाजाची उपासमार सुरू झाली आहे. जानेवारी महिन्यापासून माठांची बुकींग होत असते. परंतु, यावेळेस कोरोनामुळे बुकींगही झाली नाही. घर शोधत कोणताही ग्राहक आमच्याकडे येत नाही. त्यामुळे आम्हाला चौकामध्ये किंवा वर्दळीच्या रस्त्यावर माठ विकावे लागतात. परंतु, कोरोनाचा संसर्ग वाढल्याने रस्त्यावर बसणेही कठीण झाले आहे. मोठी माणसे उपाशी राहू शकतात. परंतु, लहान मुलांना ते शक्य नाही. लेकरे उपाशीपोटी झोपलेली पहावेसे वाटत नाही, अशीही प्रतिक्रिया कुंभार समाजाने व्यक्त केली.

माठांची केली उतरंड.....

माठ तयार करूनही काही उपयोग होत नाही. विक्रीच बंद असल्याने घरात, दारात उतरंड करावी लागत आहे. गवळीपुरा शहराचा जुना भाग आहे. या ठिकाणी कुंभार समाजाची पंधरा ते वीस घरे आहेत. पाच पिढ्यांपासून आम्ही हाच व्यवसाय करत आलो आहोत. हिंगोली शहरासह अकोला, परभणी, नांदेड, वाशिम, यवतमाळ आदी ठिकाणी कुंभारमंडळी दोन पैसे मिळावेत म्हणून माठ विक्रीसाठी घेऊन जातात. परंतु, कोरोना संसर्ग वाढल्याने परजिल्ह्यांत जाता येत नाही. तेव्हा शासनाने कुंभारांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ज्ञानेश्वर पेरीया, गोपाल पेरीया, राधेश्याम पेरीया, नंदू पेरीया, गणेश पेरीया, प्रकाश पेरीया, सचिन बनचरे यांनी शासनाकडे केली आहे.

फोटो नंबर ७