शहरं
Join us  
Trending Stories
1
कतरने मोठी चूक केली...! तालिबानने युद्धविरामातील एका शब्दावर तीव्र आक्षेप घेतला, निवेदन बदलण्याची वेळ आली...
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्र्म्प आणि युक्रेनच्या झेलेन्स्कींचे पुन्हा जोरदार भांडण; नकाशा बाजुला फेकला... 
3
हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
4
दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर...
5
'त्या' तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कुणी कापला? अखेर उलगडा झाला! समोर आलं धक्कादायक सत्य
6
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
7
आजचे राशीभविष्य : सोमवार २० ऑक्टोबर २०२५; आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठीही अनुकूल
8
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
9
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
10
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा
11
नितीशकुमारच एनडीएचे सर्वसहमतीचे नेते असतील; अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जदयूचा दावा
12
काय सांगता! १८६ कार खरेदी, तब्बल २१ कोटींचा डिस्काऊंट दिला; ऑडी, BMW, मर्सिडिज घेतल्या
13
झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद
14
बिहार निवडणूक २०२५: निवडणूक आयोगाची ‘आर्थिक गुप्तचर समिती’ ६ वर्षांनी पुन्हा सक्रिय
15
आरोपीच्या वकिलाने ५०० पानी अर्ज केला, न्यायालयाने जामीन फेटाळला; नेमके प्रकरण काय?
16
चांदी स्थिरावणार, सोने भाव खाणार; चांदीचा प्रीमियम उतरला २५ हजारांवरून शून्यावर
17
पॅरिसच्या लूव्र म्युझियममध्ये ४ मिनिटांत नेपोलियन तिसरा याच्या ९ मौल्यवान वस्तू लांबवल्या
18
पाकिस्तान-अफगाण शस्त्रसंधीसाठी राजी; संघर्ष थांबणार, दोहा येथे वाटाघाटी
19
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
20
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर

ताप आला... कोरोना तर नाही झाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:28 IST

हिंगोली : जिल्ह्यात सध्या ग्रामीण भागात काेरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. सध्या ताप आला की, उन्हाळ्यामुळे तो अंगावर ...

हिंगोली : जिल्ह्यात सध्या ग्रामीण भागात काेरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. सध्या ताप आला की, उन्हाळ्यामुळे तो अंगावर काढला जात असून यामुळे नंतर अख्खे कुटुंबच कोरोनाच्या विळख्यात सापडत आहे. यात ज्येष्ठांना जीव गमवावा लागत आहे. गिरगाव, डोंगरकडा, आखाडा बाळापूर आदी दहा ते पंधरा गावे आता हॉटस्पॉट बनली आहेत. ग्रामीण भागात कोरोना पसरल्याने सामूहिक संसर्गाच्या टप्प्यावर जिल्हा आला आहे. ग्रामीण भागात कोणतेच नियम पाळले जात नाहीत. मास्क, सामाजिक अंतर व सॅनिटायझर या तिन्ही बाबींचे जणू वावडेच आहे. यात साधारणपणे तापापासूनच कोरोनाची लक्षणे दिसण्यास सुरुवात होते. मात्र तोच अंगावर काढला जातो. यात अनेक तरुण उपचाराविना बरेही होत असले तरीही घरातील व गावातील वृद्धांना मात्र हाच ताप अत्यवस्थ करीत आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांची संख्या साडेतीनशेवर गेली. अनेकांना आता बेडही मिळत नाही. श्वास घेताना दम लागू लागला, छातीच्या सीटीस्कॅनचा स्कोअर पंधराच्याही पुढे आल्यावर कोरोना झाल्याचे कळत आहे. अशा परिस्थितीत डॉक्टरांनाही सेवा देताना अडचणी येत आहेत. त्यामुळे कोणताही ताप आला तरीही कोरोना चाचणी करून घेणे आता गरजेचे बनले आहे. यासाठी पार आरोग्य उपकेंद्रातही कोरोनाची निदान अँटिजन चाचणी तरी झाली पाहिजे. शिवाय तापाचा रुग्ण घरात वेगळा राहील, याची काळजी घेणेही अनिवार्य बनले आहे.

ग्रामपातळीवरील समित्यांनो जागे व्हा

ज्या गावात अजूनही कोरोनाने शिरकाव केला नाही, अशा गावातील लोकांनी आता सजग राहणे गरजेचे आहे. आप्तेष्ट, बाहेर फिरणारी मंडळी यांच्यामुळे कधीही कोरोना गावात येऊ शकतो. जिल्ह्यात अजूनही २७० ते ३०० गावे कोरोनाचा प्रवेश गावात होऊ न देण्यात यशस्वी ठरली. या गावांना ग्रीन गावे समजून तेथे सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, तलाठ्यांनी आवश्यक प्रतिबंध केले तर पंधरा दिवसांच्या टाळेबंदीनंतर जिल्ह्याचे चित्र सकारात्मक बनू शकते.

रुग्ण बरे झालेले असल्यास...

ज्या गावात कोरोनाचे रुग्ण आढळले होते. मात्र मृत्यू नाही, कुणी अत्यवस्थ झाले नाही व आता रुग्ण नाहीत, अशीही जवळपास दोनशे गावे आहेत. अशा गावांनी या रुग्णांचा अनुभव इतरांना सांगून कोरोनामुळे होणारे आरोग्याचे नुकसान पटवून दिले तर ही गावे पुन्हा कोरोनाचा शिरकाव होणार नाही, याची काळजी घेऊ शकतील.

रेड झोनमधील गावांत जाणे टाळा

ग्रामीण भागातील लोकांना आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला की, एकमेकांना भेटण्यास जाणे अगत्याचे वाटते. मात्र ज्या गावात मोठ्या संख्येने रुग्ण आढळत आहेत. रुग्ण अत्यवस्थ होत आहेत, मृत्यू होत आहेत, अशा गावांत ग्रामस्थांनी तर सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझर ही काळजी घेणे गरजेचेच आहे. मात्र इतर गावांतील लोकांनी अशा गावांत साथ ओसरेपर्यंत जाणे टाळले पाहिजे. अन्यथा इतर गावेही रेड झोनमध्ये येण्यास विलंब लागणार नाही.

ताप आला की चाचणी कराच

ग्रामीण भागातील लोकांना आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर फार भरवसा असतो. त्यात ते ताप आला की अंगावर काढतात. मात्र पूर्वी जसे कोणताही ताप आला की हिवतापाची चाचणी व्हायची आता तशी कोरोनाची चाचणी करायची गरज आहे. कारण अपुऱ्या जागा, एकत्रित कुटुंब पद्धती, मनमोकळेपणे एकमेकांना भेटण्याची सवय असल्याने इतरांना संसर्ग लवकर होण्याची शक्यता आहे. यामुळेच ग्रामीण भागात एकदा रुग्ण आढळला की, संख्या वाढतच चालली आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतचे रुग्ण ८९६८

रुग्णांमध्ये ज्येष्ठांची संख्या १२३६

आतापर्यंतचे मृत्यू १२९

सध्या ऑक्सिजनवरील रुग्ण ३२९