शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

ताप आला... कोरोना तर नाही झाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:28 IST

हिंगोली : जिल्ह्यात सध्या ग्रामीण भागात काेरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. सध्या ताप आला की, उन्हाळ्यामुळे तो अंगावर ...

हिंगोली : जिल्ह्यात सध्या ग्रामीण भागात काेरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. सध्या ताप आला की, उन्हाळ्यामुळे तो अंगावर काढला जात असून यामुळे नंतर अख्खे कुटुंबच कोरोनाच्या विळख्यात सापडत आहे. यात ज्येष्ठांना जीव गमवावा लागत आहे. गिरगाव, डोंगरकडा, आखाडा बाळापूर आदी दहा ते पंधरा गावे आता हॉटस्पॉट बनली आहेत. ग्रामीण भागात कोरोना पसरल्याने सामूहिक संसर्गाच्या टप्प्यावर जिल्हा आला आहे. ग्रामीण भागात कोणतेच नियम पाळले जात नाहीत. मास्क, सामाजिक अंतर व सॅनिटायझर या तिन्ही बाबींचे जणू वावडेच आहे. यात साधारणपणे तापापासूनच कोरोनाची लक्षणे दिसण्यास सुरुवात होते. मात्र तोच अंगावर काढला जातो. यात अनेक तरुण उपचाराविना बरेही होत असले तरीही घरातील व गावातील वृद्धांना मात्र हाच ताप अत्यवस्थ करीत आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांची संख्या साडेतीनशेवर गेली. अनेकांना आता बेडही मिळत नाही. श्वास घेताना दम लागू लागला, छातीच्या सीटीस्कॅनचा स्कोअर पंधराच्याही पुढे आल्यावर कोरोना झाल्याचे कळत आहे. अशा परिस्थितीत डॉक्टरांनाही सेवा देताना अडचणी येत आहेत. त्यामुळे कोणताही ताप आला तरीही कोरोना चाचणी करून घेणे आता गरजेचे बनले आहे. यासाठी पार आरोग्य उपकेंद्रातही कोरोनाची निदान अँटिजन चाचणी तरी झाली पाहिजे. शिवाय तापाचा रुग्ण घरात वेगळा राहील, याची काळजी घेणेही अनिवार्य बनले आहे.

ग्रामपातळीवरील समित्यांनो जागे व्हा

ज्या गावात अजूनही कोरोनाने शिरकाव केला नाही, अशा गावातील लोकांनी आता सजग राहणे गरजेचे आहे. आप्तेष्ट, बाहेर फिरणारी मंडळी यांच्यामुळे कधीही कोरोना गावात येऊ शकतो. जिल्ह्यात अजूनही २७० ते ३०० गावे कोरोनाचा प्रवेश गावात होऊ न देण्यात यशस्वी ठरली. या गावांना ग्रीन गावे समजून तेथे सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, तलाठ्यांनी आवश्यक प्रतिबंध केले तर पंधरा दिवसांच्या टाळेबंदीनंतर जिल्ह्याचे चित्र सकारात्मक बनू शकते.

रुग्ण बरे झालेले असल्यास...

ज्या गावात कोरोनाचे रुग्ण आढळले होते. मात्र मृत्यू नाही, कुणी अत्यवस्थ झाले नाही व आता रुग्ण नाहीत, अशीही जवळपास दोनशे गावे आहेत. अशा गावांनी या रुग्णांचा अनुभव इतरांना सांगून कोरोनामुळे होणारे आरोग्याचे नुकसान पटवून दिले तर ही गावे पुन्हा कोरोनाचा शिरकाव होणार नाही, याची काळजी घेऊ शकतील.

रेड झोनमधील गावांत जाणे टाळा

ग्रामीण भागातील लोकांना आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला की, एकमेकांना भेटण्यास जाणे अगत्याचे वाटते. मात्र ज्या गावात मोठ्या संख्येने रुग्ण आढळत आहेत. रुग्ण अत्यवस्थ होत आहेत, मृत्यू होत आहेत, अशा गावांत ग्रामस्थांनी तर सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझर ही काळजी घेणे गरजेचेच आहे. मात्र इतर गावांतील लोकांनी अशा गावांत साथ ओसरेपर्यंत जाणे टाळले पाहिजे. अन्यथा इतर गावेही रेड झोनमध्ये येण्यास विलंब लागणार नाही.

ताप आला की चाचणी कराच

ग्रामीण भागातील लोकांना आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर फार भरवसा असतो. त्यात ते ताप आला की अंगावर काढतात. मात्र पूर्वी जसे कोणताही ताप आला की हिवतापाची चाचणी व्हायची आता तशी कोरोनाची चाचणी करायची गरज आहे. कारण अपुऱ्या जागा, एकत्रित कुटुंब पद्धती, मनमोकळेपणे एकमेकांना भेटण्याची सवय असल्याने इतरांना संसर्ग लवकर होण्याची शक्यता आहे. यामुळेच ग्रामीण भागात एकदा रुग्ण आढळला की, संख्या वाढतच चालली आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतचे रुग्ण ८९६८

रुग्णांमध्ये ज्येष्ठांची संख्या १२३६

आतापर्यंतचे मृत्यू १२९

सध्या ऑक्सिजनवरील रुग्ण ३२९