शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
3
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
4
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
5
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
6
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
7
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
8
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
9
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
10
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
11
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
12
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
13
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
14
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
15
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
16
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
17
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
18
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
19
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
20
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

ताप आला... कोरोना तर नाही झाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:28 IST

हिंगोली : जिल्ह्यात सध्या ग्रामीण भागात काेरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. सध्या ताप आला की, उन्हाळ्यामुळे तो अंगावर ...

हिंगोली : जिल्ह्यात सध्या ग्रामीण भागात काेरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. सध्या ताप आला की, उन्हाळ्यामुळे तो अंगावर काढला जात असून यामुळे नंतर अख्खे कुटुंबच कोरोनाच्या विळख्यात सापडत आहे. यात ज्येष्ठांना जीव गमवावा लागत आहे. गिरगाव, डोंगरकडा, आखाडा बाळापूर आदी दहा ते पंधरा गावे आता हॉटस्पॉट बनली आहेत. ग्रामीण भागात कोरोना पसरल्याने सामूहिक संसर्गाच्या टप्प्यावर जिल्हा आला आहे. ग्रामीण भागात कोणतेच नियम पाळले जात नाहीत. मास्क, सामाजिक अंतर व सॅनिटायझर या तिन्ही बाबींचे जणू वावडेच आहे. यात साधारणपणे तापापासूनच कोरोनाची लक्षणे दिसण्यास सुरुवात होते. मात्र तोच अंगावर काढला जातो. यात अनेक तरुण उपचाराविना बरेही होत असले तरीही घरातील व गावातील वृद्धांना मात्र हाच ताप अत्यवस्थ करीत आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांची संख्या साडेतीनशेवर गेली. अनेकांना आता बेडही मिळत नाही. श्वास घेताना दम लागू लागला, छातीच्या सीटीस्कॅनचा स्कोअर पंधराच्याही पुढे आल्यावर कोरोना झाल्याचे कळत आहे. अशा परिस्थितीत डॉक्टरांनाही सेवा देताना अडचणी येत आहेत. त्यामुळे कोणताही ताप आला तरीही कोरोना चाचणी करून घेणे आता गरजेचे बनले आहे. यासाठी पार आरोग्य उपकेंद्रातही कोरोनाची निदान अँटिजन चाचणी तरी झाली पाहिजे. शिवाय तापाचा रुग्ण घरात वेगळा राहील, याची काळजी घेणेही अनिवार्य बनले आहे.

ग्रामपातळीवरील समित्यांनो जागे व्हा

ज्या गावात अजूनही कोरोनाने शिरकाव केला नाही, अशा गावातील लोकांनी आता सजग राहणे गरजेचे आहे. आप्तेष्ट, बाहेर फिरणारी मंडळी यांच्यामुळे कधीही कोरोना गावात येऊ शकतो. जिल्ह्यात अजूनही २७० ते ३०० गावे कोरोनाचा प्रवेश गावात होऊ न देण्यात यशस्वी ठरली. या गावांना ग्रीन गावे समजून तेथे सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, तलाठ्यांनी आवश्यक प्रतिबंध केले तर पंधरा दिवसांच्या टाळेबंदीनंतर जिल्ह्याचे चित्र सकारात्मक बनू शकते.

रुग्ण बरे झालेले असल्यास...

ज्या गावात कोरोनाचे रुग्ण आढळले होते. मात्र मृत्यू नाही, कुणी अत्यवस्थ झाले नाही व आता रुग्ण नाहीत, अशीही जवळपास दोनशे गावे आहेत. अशा गावांनी या रुग्णांचा अनुभव इतरांना सांगून कोरोनामुळे होणारे आरोग्याचे नुकसान पटवून दिले तर ही गावे पुन्हा कोरोनाचा शिरकाव होणार नाही, याची काळजी घेऊ शकतील.

रेड झोनमधील गावांत जाणे टाळा

ग्रामीण भागातील लोकांना आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला की, एकमेकांना भेटण्यास जाणे अगत्याचे वाटते. मात्र ज्या गावात मोठ्या संख्येने रुग्ण आढळत आहेत. रुग्ण अत्यवस्थ होत आहेत, मृत्यू होत आहेत, अशा गावांत ग्रामस्थांनी तर सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझर ही काळजी घेणे गरजेचेच आहे. मात्र इतर गावांतील लोकांनी अशा गावांत साथ ओसरेपर्यंत जाणे टाळले पाहिजे. अन्यथा इतर गावेही रेड झोनमध्ये येण्यास विलंब लागणार नाही.

ताप आला की चाचणी कराच

ग्रामीण भागातील लोकांना आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर फार भरवसा असतो. त्यात ते ताप आला की अंगावर काढतात. मात्र पूर्वी जसे कोणताही ताप आला की हिवतापाची चाचणी व्हायची आता तशी कोरोनाची चाचणी करायची गरज आहे. कारण अपुऱ्या जागा, एकत्रित कुटुंब पद्धती, मनमोकळेपणे एकमेकांना भेटण्याची सवय असल्याने इतरांना संसर्ग लवकर होण्याची शक्यता आहे. यामुळेच ग्रामीण भागात एकदा रुग्ण आढळला की, संख्या वाढतच चालली आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतचे रुग्ण ८९६८

रुग्णांमध्ये ज्येष्ठांची संख्या १२३६

आतापर्यंतचे मृत्यू १२९

सध्या ऑक्सिजनवरील रुग्ण ३२९