शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

‘सौभाग्य’चा उडाला बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 01:20 IST

शासनाची महत्वाकांक्षी योजना असलेल्या सौभाग्य वीज जोडणीला गुत्तेदारांची हातचलाखी बोजवारा उडवण्यास कारणीभूत ठरत आहे. ग्रामस्थांकडून जोडणीसाठी पैसे उकळण्यासोबतच निकृष्ट दर्जाचे व अपुरे साहित्य माथी मारण्याचे काम होत आहे. जोडण्याच्या कामावर कोणाचे नियंत्रण नसल्याचेच चित्र आहे.

ठळक मुद्देवसमत प्रशासन ढिम्म; गुत्तेदाराकडून लूट

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : शासनाची महत्वाकांक्षी योजना असलेल्या सौभाग्य वीज जोडणीला गुत्तेदारांची हातचलाखी बोजवारा उडवण्यास कारणीभूत ठरत आहे. ग्रामस्थांकडून जोडणीसाठी पैसे उकळण्यासोबतच निकृष्ट दर्जाचे व अपुरे साहित्य माथी मारण्याचे काम होत आहे. जोडण्याच्या कामावर कोणाचे नियंत्रण नसल्याचेच चित्र आहे.घर तेथे वीजमीटर या दिशेने वाटचाल करत असलेल्या पंतप्रधान सौभाग्य योजनेतंर्गत सध्या वसमत तालुक्यात नवीन मीटर जोडण्या सुरू आहेत. गोरगरिबांना मोफत वीज जोडणी देणारी ही योजना आहे. वीज वितरणने या जोडण्या देण्यासाठी निविदा मागवून वसमत तालुक्यात गुत्तेदारांना काम दिले. लाभार्थ्यांकडून एक रुपयासुद्धा घेवू नये, दर्जेदार वायर, बोर्ड, एम.सी.बी. स्विच खांबापासून काही मीटरपर्यंत येणारा वायर, जी.आय, तार, रिल इन्शुलेटर आदी साहित्यासह मीटर फिट करून देण्याची योजना आहे. यासाठी ठेकेदाराला प्रतिमिटर ९४४ रुपये वीज वितरण कंपनीकडून मोबदला मिळतो.मात्र, फुकटात मीटर, साहित्य व जोडणी करून देण्याऐवजी अनेक भागात मीटर जोडणीसाठी पैसे मागितल्याच्या अनेक तक्रारी आहेत. महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी वाढल्याने अनेकांना तंबी मिळाली. त्यामुळे प्रमाण कमीसुद्धा झाले. मात्र तरीही काही मुजोर ठेकेदारांची माणसे फिटींग करणारे शंभर, दोनशे रुपये उकळतच आहेत. आता तर ठेकेदारांनी मीटरसोबत निकृष्ट साहित्य देवून कमाईचा फंडा सुरू केला आहे. वसमत तालुक्यात झालेल्या जोडण्यांमध्ये तर एम.सी.बी. स्विचऐवजी चक्क किटकॅट देवून बोळवण करण्यात आली आहे.‘सौभाग्य’ तर लाभार्थ्यांचे ‘दुदैव’योजनेतंर्गत मीटर बसवताना कंत्राटदार निकृष्ट दर्जाचे वायर सर्रास वापरतात. जी.आय. तार रिलइन्स्युलेटर बसवत नाहीत. ठेकेदारांवर महावितरण अधिका-यांचे नियंत्रण नसल्याने गुत्तेदारांचे ‘सौभाग्य’ अन् लाभार्थ्यांचे ‘दुर्दैव्य’ असा प्रकार घडण्यास वेळ लागणार नाही.सौभाग्य योजनेचा समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना लाभ व्हावा. कंत्राटदारांनी लाभार्थ्यांची चालवलेली लूट थांबवावी, यासाठी प्रशासनाचा अंकुश नसल्याने हा प्रकार घडत आहे. याला थांबवण्याची गरज आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीGovernmentसरकार