शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

‘सौभाग्य’चा उडाला बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 01:20 IST

शासनाची महत्वाकांक्षी योजना असलेल्या सौभाग्य वीज जोडणीला गुत्तेदारांची हातचलाखी बोजवारा उडवण्यास कारणीभूत ठरत आहे. ग्रामस्थांकडून जोडणीसाठी पैसे उकळण्यासोबतच निकृष्ट दर्जाचे व अपुरे साहित्य माथी मारण्याचे काम होत आहे. जोडण्याच्या कामावर कोणाचे नियंत्रण नसल्याचेच चित्र आहे.

ठळक मुद्देवसमत प्रशासन ढिम्म; गुत्तेदाराकडून लूट

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : शासनाची महत्वाकांक्षी योजना असलेल्या सौभाग्य वीज जोडणीला गुत्तेदारांची हातचलाखी बोजवारा उडवण्यास कारणीभूत ठरत आहे. ग्रामस्थांकडून जोडणीसाठी पैसे उकळण्यासोबतच निकृष्ट दर्जाचे व अपुरे साहित्य माथी मारण्याचे काम होत आहे. जोडण्याच्या कामावर कोणाचे नियंत्रण नसल्याचेच चित्र आहे.घर तेथे वीजमीटर या दिशेने वाटचाल करत असलेल्या पंतप्रधान सौभाग्य योजनेतंर्गत सध्या वसमत तालुक्यात नवीन मीटर जोडण्या सुरू आहेत. गोरगरिबांना मोफत वीज जोडणी देणारी ही योजना आहे. वीज वितरणने या जोडण्या देण्यासाठी निविदा मागवून वसमत तालुक्यात गुत्तेदारांना काम दिले. लाभार्थ्यांकडून एक रुपयासुद्धा घेवू नये, दर्जेदार वायर, बोर्ड, एम.सी.बी. स्विच खांबापासून काही मीटरपर्यंत येणारा वायर, जी.आय, तार, रिल इन्शुलेटर आदी साहित्यासह मीटर फिट करून देण्याची योजना आहे. यासाठी ठेकेदाराला प्रतिमिटर ९४४ रुपये वीज वितरण कंपनीकडून मोबदला मिळतो.मात्र, फुकटात मीटर, साहित्य व जोडणी करून देण्याऐवजी अनेक भागात मीटर जोडणीसाठी पैसे मागितल्याच्या अनेक तक्रारी आहेत. महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी वाढल्याने अनेकांना तंबी मिळाली. त्यामुळे प्रमाण कमीसुद्धा झाले. मात्र तरीही काही मुजोर ठेकेदारांची माणसे फिटींग करणारे शंभर, दोनशे रुपये उकळतच आहेत. आता तर ठेकेदारांनी मीटरसोबत निकृष्ट साहित्य देवून कमाईचा फंडा सुरू केला आहे. वसमत तालुक्यात झालेल्या जोडण्यांमध्ये तर एम.सी.बी. स्विचऐवजी चक्क किटकॅट देवून बोळवण करण्यात आली आहे.‘सौभाग्य’ तर लाभार्थ्यांचे ‘दुदैव’योजनेतंर्गत मीटर बसवताना कंत्राटदार निकृष्ट दर्जाचे वायर सर्रास वापरतात. जी.आय. तार रिलइन्स्युलेटर बसवत नाहीत. ठेकेदारांवर महावितरण अधिका-यांचे नियंत्रण नसल्याने गुत्तेदारांचे ‘सौभाग्य’ अन् लाभार्थ्यांचे ‘दुर्दैव्य’ असा प्रकार घडण्यास वेळ लागणार नाही.सौभाग्य योजनेचा समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना लाभ व्हावा. कंत्राटदारांनी लाभार्थ्यांची चालवलेली लूट थांबवावी, यासाठी प्रशासनाचा अंकुश नसल्याने हा प्रकार घडत आहे. याला थांबवण्याची गरज आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीGovernmentसरकार