शहरं
Join us  
Trending Stories
1
अरवलीच्या व्याख्येचा वाद तज्ज्ञ समितीकडे; आपल्याच निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; आता २१ जानेवारीला सुनावणी 
2
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 
3
भांडुपमध्ये बेस्ट इलेक्ट्रिक बसने घेतला चौघांचा बळी; दहा जखमी
4
चांदीची किंमत का वाढतेय? कुठे-कुठे होतोय वापर? बनली जागतिक तंत्रज्ञान क्रांतीचा कणा
5
अपेक्षित गॅस गेला कुठे? सरकारने मागितली २.७९ लाख कोटींची भरपाई
6
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
7
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
8
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
9
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
10
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
11
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
12
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
13
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
14
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
15
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
16
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
17
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
18
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
19
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
20
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
Daily Top 2Weekly Top 5

वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:51 IST

कनेरगाव नाका: कनेरगाव नाका व परिसरात यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले राहिले. त्यामुळे विहीर व तलावांना भरपूर प्रमाणात पाणी आहे. ...

कनेरगाव नाका: कनेरगाव नाका व परिसरात यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले राहिले. त्यामुळे विहीर व तलावांना भरपूर प्रमाणात पाणी आहे. पाण्याच्या मुबलकतेमुळे शेतकऱ्यांनी यावर्षी दुहेरी उत्पन्न देणाऱ्या हरभरा पिकांचा पेरा मोठ्या प्रमाणात घेतला. सध्या रबी हंगामातील पिके चांगली आहेत. परंतु, वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी त्रस्त आहेत.

सद्य:स्थितीत रबी हंगामातील पिकांची उगवण चांगली झाली आहे. परंतु, गत काही दिवसांपासून वन्य प्राणी शेतात उगवलेल्या पिकांची नासाडी करीत आहेत. यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. आधीच शेतकरी सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने आर्थिक संकटात सापडला आहे. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने रब्बी हंगामावरच शेतकऱ्यांची आशा आहे. पिकांबरोबरच पालेभाज्यांची नासाडीही वन्यप्राणी करीत आहेत. वन विभागाला वेळोवेळी सांगूनही वन विभाग वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करीत नाहीत, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. वन विभागाच्या वरिष्ठांनी दखल घेऊन वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.