शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

रेशीम शेतीसाठी शेतकऱ्यांनी लागवड करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:19 IST

हिंगोली : सन २०२१-२२ मध्ये रेशीम शेती करण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालयात नावनोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी लागवड करून घ्यावी, असे आवाहन ...

हिंगोली : सन २०२१-२२ मध्ये रेशीम शेती करण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालयात नावनोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी लागवड करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा रेशीम विकास अधिकारी स्वप्निल तायडे यांनी केले आहे.

जिल्ह्यात सर्वत्र पुरेशा प्रमाणात पाऊस झाला असून, वातावरण रेशीम तुती लागवडीसाठी अनुकूल असे झाले आहे. त्यामुळे पुढील आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांनी लागवडी केल्यास त्या यशस्वी होऊ शकतात. शासनाच्या धोरणानुसार, १०० टक्के लागवडी या रोपवाटिकेतील रोपांद्वारे करणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रोपांद्वारेच लागवड करून घ्यावी.

लागवडीसंदर्भात कुठलीही तांत्रिक अडचण असल्यास किंवा रोपे मिळण्यास अडचण होत असल्यास, संबंधित शेतकऱ्याने जिल्हा रेशीम विकास कार्यालयाशी संपर्क साधावा, म्हणजे शेतकऱ्यांना संपूर्ण तांत्रिक मार्गदर्शन करणे सोपे होईल.

शेतकऱ्यांनी त्रुटीची पूर्तता करावी...

ज्या शेतकऱ्यांनी ‘मनरेगा’ योजनेमधून नावनोंदणी केली आहे. त्या शेतकऱ्यांनी संबंधित तहसील कार्यालयाकडून कार्यारंभ आदेश प्राप्त झाल्याशिवाय काम सुरू करू नये. प्रशासकीय मान्यता, कार्यारंभ आदेश प्राप्त होण्यासंदर्भात काही प्रकरणे त्रुटीत निघाले असल्यास, त्या त्रुटींची पूर्तता करावी.

‘मनरेगा’ योजनेतील शेतकऱ्यांनी संबंधित १ एकरमध्ये कुठलेही अंतरपीक घेऊ नये, तसेच शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच लागवड करावी, जेणेकरून त्यांना अनुदान मिळण्यासंदर्भात अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.