रस्त्यावरील चुरी ठरतेय धोकादायक हिंगोली : शहरातील नांदेड नाका ते जिल्हा परिषदेकडे जणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी त्यावर पुन्हा डांबराचा थर देण्यात आला आहे. यासाठी दगडाच्या चुरीचा वापर करण्यात आला आहे. नांदेड नाका परिसरात डांबरीकरणानंतर दगडाची चुरी टाकण्यात आली आहे. मात्र जास्त प्रमाणात चुरी टाकल्याने ही चुरी रस्त्यावर पडून राहत आहे. यावरून दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. याकडे लक्ष देवून रस्त्यावरील दगडाची चुरी काढून टाकावी, अशी मागणी होत आहे.
शेतकऱ्यांनी जनावरे काढली विक्रीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:28 IST