शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

हिंगोलीत अधांतरीच सुटले शेतकऱ्यांचे चुका-यांसाठीचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:07 IST

तालुक्यातील आडगाव येथील ८ शेतक-यांनी हमीभाव केंद्रावर विकलेल्या शेतामालाच्या चुका-यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण शासनाच्या नव्हे, तर गावातीलच एकाच्या हमीवर सोडवले. दोघांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर हे प्रकरण हातघाईवर आले होते.

ठळक मुद्देदोघांची प्रकृती बिघडली होतीचिंताग्रस्त ग्रामस्थांनीच घेतली चुका-यांची हमी

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : तालुक्यातील आडगाव येथील ८ शेतक-यांनी हमीभाव केंद्रावर विकलेल्या शेतामालाच्या चुका-यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण शासनाच्या नव्हे, तर गावातीलच एकाच्या हमीवर सोडवले. दोघांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर हे प्रकरण हातघाईवर आले होते.२५ जानेवारीपासून उपोषण सुरू असतानाही प्रशासनाने दखलही घेतली नाही. शेवटी सातव्या दिवशी विलास मुटकुळे व केशव मुटकुळे या दोघांची प्रकृती बिघडली. त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल केल्याची खबर आडगावात पोहोचली. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. नातेवाईक व ग्रामस्थ चिंतेत सापडले होते.दोघांना रूग्णालयात दाखल केले. प्रशासन उपोषणार्थींची दखल घेत नाहीत, म्हणून गावातील पांडुरंग सोनाजी मुटमुळे, सरपंच प्रशांत कंधारकर, सेवानिवृत्त मंडळ अधिकारी दत्तराव मुटकुळे यांनी आपसात चर्चा करून उपोषणापासून शेतकºयांना उपोषणापासून परावृत्त करण्याचा निर्णय घेतला. ग्रामस्थांसह हे सर्वजण जिल्हा कचेरीसमोर उपोषणस्थळी बुधवारी दुपारी पोहोचले. पांडुरंग मुटकुळे यांनी चुकाºयाची रक्कम स्वत: देण्याची हमी दिली. सरपंच प्रशांत कंधारकर व दत्तराव मुटकुळे यांनी जवाबदारी स्वीकारली. शेवटी शब्दांचा मान राखत उपोषण मागे घेण्याची तयारी दर्शविली. प्रशासन उपोषणाथीर्ची दखल घेत नसल्यामुळे ग्रामस्थांनीच पुढाकार घेऊन शेतक-यांचे उपोषण सोडविले.मुख्यमंत्रीमित्र म्हणतो, सोयाबीनच परत करा !सोयाबीनची नोंदणी केल्यानंतर ८ नोव्हेंबर रोजी आलेल्या संदेशाप्रमाणे हिंगोली येथील हमीभाव केंद्रावर ९ नोव्हेंबर रोजी ३४ डाग सोयाबीनची विक्री केल्यानंतर अजूनही त्याची रक्कम मिळाली नसल्याची तक्रार बाबाराव घुगे यांनी मार्केटिंग अधिकारी परभणी यांच्याकडे केली आहे. यासाठी अनेकदा पाठपुरावा केला. २२ जानेवारी रोजी हमी केंद्र चालविणारे पवार व मॅनेवार यांनी तुम्ही नियमापेक्षा जास्त माल दिल्याने कुठेही जाऊ शकता, असे सांगून धुडकावून लावले. त्यामुळे आता माझे सोयाबीनच परत करा, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. बाबाराव घुगे हे मुख्यमंत्रीमित्र असून इतरांची मदत करण्यास भाजपने ही सोय केली. मात्र त्यांनाच कोणी मदतीला धावत नाही.