शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

हिंगोलीत अधांतरीच सुटले शेतकऱ्यांचे चुका-यांसाठीचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:07 IST

तालुक्यातील आडगाव येथील ८ शेतक-यांनी हमीभाव केंद्रावर विकलेल्या शेतामालाच्या चुका-यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण शासनाच्या नव्हे, तर गावातीलच एकाच्या हमीवर सोडवले. दोघांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर हे प्रकरण हातघाईवर आले होते.

ठळक मुद्देदोघांची प्रकृती बिघडली होतीचिंताग्रस्त ग्रामस्थांनीच घेतली चुका-यांची हमी

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : तालुक्यातील आडगाव येथील ८ शेतक-यांनी हमीभाव केंद्रावर विकलेल्या शेतामालाच्या चुका-यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण शासनाच्या नव्हे, तर गावातीलच एकाच्या हमीवर सोडवले. दोघांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर हे प्रकरण हातघाईवर आले होते.२५ जानेवारीपासून उपोषण सुरू असतानाही प्रशासनाने दखलही घेतली नाही. शेवटी सातव्या दिवशी विलास मुटकुळे व केशव मुटकुळे या दोघांची प्रकृती बिघडली. त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल केल्याची खबर आडगावात पोहोचली. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. नातेवाईक व ग्रामस्थ चिंतेत सापडले होते.दोघांना रूग्णालयात दाखल केले. प्रशासन उपोषणार्थींची दखल घेत नाहीत, म्हणून गावातील पांडुरंग सोनाजी मुटमुळे, सरपंच प्रशांत कंधारकर, सेवानिवृत्त मंडळ अधिकारी दत्तराव मुटकुळे यांनी आपसात चर्चा करून उपोषणापासून शेतकºयांना उपोषणापासून परावृत्त करण्याचा निर्णय घेतला. ग्रामस्थांसह हे सर्वजण जिल्हा कचेरीसमोर उपोषणस्थळी बुधवारी दुपारी पोहोचले. पांडुरंग मुटकुळे यांनी चुकाºयाची रक्कम स्वत: देण्याची हमी दिली. सरपंच प्रशांत कंधारकर व दत्तराव मुटकुळे यांनी जवाबदारी स्वीकारली. शेवटी शब्दांचा मान राखत उपोषण मागे घेण्याची तयारी दर्शविली. प्रशासन उपोषणाथीर्ची दखल घेत नसल्यामुळे ग्रामस्थांनीच पुढाकार घेऊन शेतक-यांचे उपोषण सोडविले.मुख्यमंत्रीमित्र म्हणतो, सोयाबीनच परत करा !सोयाबीनची नोंदणी केल्यानंतर ८ नोव्हेंबर रोजी आलेल्या संदेशाप्रमाणे हिंगोली येथील हमीभाव केंद्रावर ९ नोव्हेंबर रोजी ३४ डाग सोयाबीनची विक्री केल्यानंतर अजूनही त्याची रक्कम मिळाली नसल्याची तक्रार बाबाराव घुगे यांनी मार्केटिंग अधिकारी परभणी यांच्याकडे केली आहे. यासाठी अनेकदा पाठपुरावा केला. २२ जानेवारी रोजी हमी केंद्र चालविणारे पवार व मॅनेवार यांनी तुम्ही नियमापेक्षा जास्त माल दिल्याने कुठेही जाऊ शकता, असे सांगून धुडकावून लावले. त्यामुळे आता माझे सोयाबीनच परत करा, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. बाबाराव घुगे हे मुख्यमंत्रीमित्र असून इतरांची मदत करण्यास भाजपने ही सोय केली. मात्र त्यांनाच कोणी मदतीला धावत नाही.