शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय?
3
'भारताने माझ्या आईचे प्राण वाचवले, त्यांना बांगलादेशच्या स्वाधीन करणार नाहीत'; शेख हसीना यांच्या मुलाने व्यक्त केला विश्वास
4
ICC ODI Batting Ranking : 'नवा गडी नव राज्य!' रोहित शर्माला मागे टाकत डॅरिल मिचेलनं रचला इतिहास
5
"मदरसे-मशिदीतून दहशतवादी बाहेर पडतात..."; योगी सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान, AMU वरही उपस्थित केला सवाल
6
Jalgaon Crime: 'चोर पऱ्या' बोलला अन्...; रेल्वे रुळावर मृतदेह सापडलेल्या हर्षलची हत्याच; सगळा घटनाक्रम आला समोर
7
महागड्या क्रिम्सना बाय-बाय, Skinimalism सोपा उपाय; ३ स्टेपमध्ये मेकअपशिवाय ग्लोइंग स्किन
8
'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया
9
जगातील टॉप हाय-स्ट्रीट रँकिंगमध्ये भारताचा दबदबा! ही बाजारपेठ सर्वात महागडी, तर सर्वाधिक भाडे कुठे?
10
आता बँक FD विसरा! पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय ८.२०% पर्यंत व्याज; गॅरंटीड रिटर्नवाले प्लान्स पाहा
11
सिद्धू मूसेवाला ते बाबा सिद्दीकी हत्या अन् सलमान खान..; अनमोल बिश्नोईची संपूर्ण क्राइम कुंडली
12
Jara Hatke: सिम कार्डचे एक टोक तिरपे का असते? ९९ % लोकांना माहीत नाही कारण!
13
किमान ५ इमारतीच्या गटाचे ‘मिनी क्लस्टर’ लवकरच; मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश
14
"मला शिव्या दिल्या तर फरक नाही, पण संघावर आल्यावर मी..."; पिट्या भाईने सांगितले मनसे सोडण्याचे कारण
15
घरमालक-भाडेकरू वादावर अखेर ब्रेक! 'नवीन भाडे करार २०२५' लागू; 'हा' नियम मोडल्यास ५ हजार दंड!
16
Vastu Tips: घड्याळ दोन-तीन मिनिटं पुढे लावणे शुभ? पाहा वास्तू शास्त्र काय सांगते... 
17
धर्म आणि जातीवर ऐश्वर्या राय बच्चनचं वक्तव्य, पंतप्रधान मोदींच्या पाया पडत घेतले आशीर्वाद
18
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
19
छत्तीसगडमध्ये दोन अल्पवयीन मुलांना ATSकडून अटक; 'ब्रेनवॉश' करून ISISमध्ये सुरू होती भरती
20
स्लीपर वंदे भारत अन् बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणार? अश्विनी वैष्णव यांनी तारखाच सांगितल्या
Daily Top 2Weekly Top 5

हे तर पोलिसांचे अपयश; ६४ टक्के आरोपी सुटतात निर्दोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:32 IST

हिंगोली : एखादा गुन्हा घडल्यानंतर त्याचा सखोल तपास करणे, दोषारोपपत्र न्यायालयात सादर करणे तसेच सरकारी वकिलाच्या मदतीने गुन्हेगाराला अधिकाधिक ...

हिंगोली : एखादा गुन्हा घडल्यानंतर त्याचा सखोल तपास करणे, दोषारोपपत्र न्यायालयात सादर करणे तसेच सरकारी वकिलाच्या मदतीने गुन्हेगाराला अधिकाधिक शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न करण्याचे काम तपासी पोलीस अधिकाऱ्याचे असते. हिंगोली जिल्ह्यात आरोपीला शिक्षा होण्याचे प्रमाण गतवर्षीपेक्षा यावर्षी ४ टक्क्याने वाढले असले तरी गुन्ह्यातून निर्दोष सुटणाऱ्यांचे प्रमाणही खूप आहे.

जुलै २०२१ पयर्यंत २२ प्रकरणापैकी ४ प्रकरणात आरोपीला शिक्षा झाली आहे. तर तब्बल १८ प्रकरणात आरोपी निर्दोष सुटले आहेत. गुन्ह्याचा सखोल तपास केला नसल्यानेच आरोपीला गुन्ह्यातून निर्दोष सुटण्यास संधी मिळाल्याचा आरोप केला जात आहे. मागील दोन वर्षांपासून हिंगोली पोलिसांची कामगिरी सरस होत असली तरी गुन्हा घडल्यानंतर सखोल तपास करून जास्तीत जास्त गुन्हेगारांना शिक्षा होणे गरजेचे आहे.

गुन्हा सिद्धीचे

प्रमाण वाढले

जिल्ह्यातील गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण दोन वर्षात वाढले आहे. २०२० मध्ये ३२ टक्के तर २०२१ मध्ये ३६ टक्के प्रमाण झाले आहे. त्रुटीविरहीत दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न झाल्यास यात आखणी वाढ होईल, असे बोलले जात आहे.

अपयशाचे खापर साक्षीदारांवर

सत्र न्यायालयात चालणाऱ्या भादंविच्या गुन्ह्यातील स्थिती गंभीर मानली जाते. मात्र अनेक प्रकरणात आरोपी हे निर्दोष सुटत आहेत. पंच, साक्षीदार, फिर्यादी फितूर होणे आदीमुळे आरोपी निर्दोष सुटत असल्याची कारणे सांगितली जात आहेत.

पोक्सोअंतर्गंत गुन्ह्यात होतेय वाढ

जिल्ह्यात पोक्सोअंतर्गंत गुन्ह्याचे प्रमाण कमी होते. मात्र मागील काही दिवसांपासून गुन्हे घडण्याचे प्रमाण वाढत आहे. मागील चार महिन्यातच जिल्ह्यात चार ते पाच घटना घडल्या आहेत.