शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; मध्य रेल्वेला फटका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2
१८ महिने राहु-केतु गोचर: ५ मूलांकांना दुपटीने लाभ, गुंतवणुकीत फायदा; सुख-समृद्धी-भरभराट!
3
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
4
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
5
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
6
"तुझा नंबर पाठव, फ्लर्ट करायची इच्छा झालीये", टीव्ही अभिनेत्रीला दिग्गज मराठी अभिनेत्याचा मेसेज, म्हणाली- "तुझ्या बायकोला..."
7
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
8
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
9
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
10
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
11
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
12
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
13
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
14
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
15
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
16
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
17
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
18
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
19
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
20
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी

हे तर पोलिसांचे अपयश; ६४ टक्के आरोपी सुटतात निर्दोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:32 IST

हिंगोली : एखादा गुन्हा घडल्यानंतर त्याचा सखोल तपास करणे, दोषारोपपत्र न्यायालयात सादर करणे तसेच सरकारी वकिलाच्या मदतीने गुन्हेगाराला अधिकाधिक ...

हिंगोली : एखादा गुन्हा घडल्यानंतर त्याचा सखोल तपास करणे, दोषारोपपत्र न्यायालयात सादर करणे तसेच सरकारी वकिलाच्या मदतीने गुन्हेगाराला अधिकाधिक शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न करण्याचे काम तपासी पोलीस अधिकाऱ्याचे असते. हिंगोली जिल्ह्यात आरोपीला शिक्षा होण्याचे प्रमाण गतवर्षीपेक्षा यावर्षी ४ टक्क्याने वाढले असले तरी गुन्ह्यातून निर्दोष सुटणाऱ्यांचे प्रमाणही खूप आहे.

जुलै २०२१ पयर्यंत २२ प्रकरणापैकी ४ प्रकरणात आरोपीला शिक्षा झाली आहे. तर तब्बल १८ प्रकरणात आरोपी निर्दोष सुटले आहेत. गुन्ह्याचा सखोल तपास केला नसल्यानेच आरोपीला गुन्ह्यातून निर्दोष सुटण्यास संधी मिळाल्याचा आरोप केला जात आहे. मागील दोन वर्षांपासून हिंगोली पोलिसांची कामगिरी सरस होत असली तरी गुन्हा घडल्यानंतर सखोल तपास करून जास्तीत जास्त गुन्हेगारांना शिक्षा होणे गरजेचे आहे.

गुन्हा सिद्धीचे

प्रमाण वाढले

जिल्ह्यातील गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण दोन वर्षात वाढले आहे. २०२० मध्ये ३२ टक्के तर २०२१ मध्ये ३६ टक्के प्रमाण झाले आहे. त्रुटीविरहीत दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न झाल्यास यात आखणी वाढ होईल, असे बोलले जात आहे.

अपयशाचे खापर साक्षीदारांवर

सत्र न्यायालयात चालणाऱ्या भादंविच्या गुन्ह्यातील स्थिती गंभीर मानली जाते. मात्र अनेक प्रकरणात आरोपी हे निर्दोष सुटत आहेत. पंच, साक्षीदार, फिर्यादी फितूर होणे आदीमुळे आरोपी निर्दोष सुटत असल्याची कारणे सांगितली जात आहेत.

पोक्सोअंतर्गंत गुन्ह्यात होतेय वाढ

जिल्ह्यात पोक्सोअंतर्गंत गुन्ह्याचे प्रमाण कमी होते. मात्र मागील काही दिवसांपासून गुन्हे घडण्याचे प्रमाण वाढत आहे. मागील चार महिन्यातच जिल्ह्यात चार ते पाच घटना घडल्या आहेत.