शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

हिंगोलीत १७९ पैकी ९0 योजनांचा मार्ग सुकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:37 IST

जिल्ह्यात विविध योजनांमध्ये घेतलेल्या मात्र कामे पूर्ण न झालेल्या नळयोजनांसाठी आता जि.प.ने नियोजन केले आहे. याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर पाणीपुरवठा विभाग कामाला लागला आहे. १७९ योजनांचे नियोजन यात केलेले आहे.

ठळक मुद्देवर्षानुवर्षे रखडल्या नळयोजना : जि.प.ने केले नियोजन, पुरेसा निधी नसल्याने प्रश्न गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात विविध योजनांमध्ये घेतलेल्या मात्र कामे पूर्ण न झालेल्या नळयोजनांसाठी आता जि.प.ने नियोजन केले आहे. याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर पाणीपुरवठा विभाग कामाला लागला आहे. १७९ योजनांचे नियोजन यात केलेले आहे.गतवर्षी जवळपास २६0 योजना प्रलंबित होत्या. मात्र त्यावेळी अशीच मोहीम राबविल्यानंतर ४५ योजनांचे कामे पूर्ण करण्यात आली होती. त्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समित्यांच्या बैठका घेवून गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला होता. मात्र त्यानंतरही न बधलेल्या समित्याच आता उरल्या आहेत. या अपूर्ण योजनांबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच त्याचे जि.प.ने नियोजन केले आहे. आता जर या समित्या काम पूर्ण करणार नसतील तर गुन्हे दाखल करण्यासह इतरही कारवाई करण्याचे संकेत दिसत आहेत.कोट्यवधीचा निधी खर्च झाल्यानंतरही योजना प्रलंबित असल्याने अनेक गावांत ग्रामस्थांना पाणीच मिळत नाही. काही ठिकाणी फक्त गावात पाणी आले तर दारात नळ आला नाही. काही ठिकाणी तर हेही झालेले नाही. मात्र आता काही ठिकाणच्या योजना भौतिकदृष्ट्या पूर्ण दाखवून या झंझटीतून मुक्त होण्याची घाई पाणीपुरवठा विभागाला झाल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात अशा योजना १२१ असल्याचे अहवालात म्हटले आहे. यापैकी ६0 योजना या आर्थिक वर्षाअखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. यात औंढ्यातील प्रलंबित २७ पैकी १0, वसमतला ३५ पैकी १२, कळमनुरीत ३५ पैकी १७, हिंगोलीत ११ पैकी १0, सेनगावात १३ पैकी ११ योजना भौतिकदृष्ट्या पूर्ण पण आर्थिकदृष्ट्या अपूर्ण असल्याचे सांगून अंतिम करण्याचे नियोजन आखलेले आहे. ही बाब केवळ कागदोपत्रीच करायची असल्याने याला गतीही येवू शकते. लोकप्रतिनिधींनी याची तपासणी करण्याची गरज आहे. योजना अंतिम करण्याच्या नादात ती अर्धवट राहता कामा नये.५८ गावे : नुसते पाणी पोहोचलेकेवळ गावात पाणीपुरवठा सुरू केलेल्या मात्र अपूर्ण असलेल्या योजना ५८ आहेत. त्यापैकी ३0 या आर्थिक वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. यात औंढ्यात ११ पैकी ५, वसमतला ११ पैकी ५, कळमनुरीत १४ पैकी ८, हिंगोलीत ८ पैकी ५, सेनगावात १४ पैकी ७ योजनांचा समावेश आहे. या योजना पूर्ण करण्याचे नियोजन आखले आहे. काही योजनांना पुरेल एवढाच निधी आहे. मात्र त्यावर मात करून ही कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार आहे. त्यादृष्टिनेच नियोजन केल्याचे अतिरिक्त मुकाअ ए.एम.देशमुख यांनी सांगितले.