शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
3
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
4
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
5
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
6
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
7
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
8
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
9
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
10
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
11
Secret Santa : अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
12
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
13
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
14
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
15
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
16
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
17
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
18
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
19
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
20
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत १७९ पैकी ९0 योजनांचा मार्ग सुकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:37 IST

जिल्ह्यात विविध योजनांमध्ये घेतलेल्या मात्र कामे पूर्ण न झालेल्या नळयोजनांसाठी आता जि.प.ने नियोजन केले आहे. याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर पाणीपुरवठा विभाग कामाला लागला आहे. १७९ योजनांचे नियोजन यात केलेले आहे.

ठळक मुद्देवर्षानुवर्षे रखडल्या नळयोजना : जि.प.ने केले नियोजन, पुरेसा निधी नसल्याने प्रश्न गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात विविध योजनांमध्ये घेतलेल्या मात्र कामे पूर्ण न झालेल्या नळयोजनांसाठी आता जि.प.ने नियोजन केले आहे. याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर पाणीपुरवठा विभाग कामाला लागला आहे. १७९ योजनांचे नियोजन यात केलेले आहे.गतवर्षी जवळपास २६0 योजना प्रलंबित होत्या. मात्र त्यावेळी अशीच मोहीम राबविल्यानंतर ४५ योजनांचे कामे पूर्ण करण्यात आली होती. त्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समित्यांच्या बैठका घेवून गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला होता. मात्र त्यानंतरही न बधलेल्या समित्याच आता उरल्या आहेत. या अपूर्ण योजनांबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच त्याचे जि.प.ने नियोजन केले आहे. आता जर या समित्या काम पूर्ण करणार नसतील तर गुन्हे दाखल करण्यासह इतरही कारवाई करण्याचे संकेत दिसत आहेत.कोट्यवधीचा निधी खर्च झाल्यानंतरही योजना प्रलंबित असल्याने अनेक गावांत ग्रामस्थांना पाणीच मिळत नाही. काही ठिकाणी फक्त गावात पाणी आले तर दारात नळ आला नाही. काही ठिकाणी तर हेही झालेले नाही. मात्र आता काही ठिकाणच्या योजना भौतिकदृष्ट्या पूर्ण दाखवून या झंझटीतून मुक्त होण्याची घाई पाणीपुरवठा विभागाला झाल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात अशा योजना १२१ असल्याचे अहवालात म्हटले आहे. यापैकी ६0 योजना या आर्थिक वर्षाअखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. यात औंढ्यातील प्रलंबित २७ पैकी १0, वसमतला ३५ पैकी १२, कळमनुरीत ३५ पैकी १७, हिंगोलीत ११ पैकी १0, सेनगावात १३ पैकी ११ योजना भौतिकदृष्ट्या पूर्ण पण आर्थिकदृष्ट्या अपूर्ण असल्याचे सांगून अंतिम करण्याचे नियोजन आखलेले आहे. ही बाब केवळ कागदोपत्रीच करायची असल्याने याला गतीही येवू शकते. लोकप्रतिनिधींनी याची तपासणी करण्याची गरज आहे. योजना अंतिम करण्याच्या नादात ती अर्धवट राहता कामा नये.५८ गावे : नुसते पाणी पोहोचलेकेवळ गावात पाणीपुरवठा सुरू केलेल्या मात्र अपूर्ण असलेल्या योजना ५८ आहेत. त्यापैकी ३0 या आर्थिक वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. यात औंढ्यात ११ पैकी ५, वसमतला ११ पैकी ५, कळमनुरीत १४ पैकी ८, हिंगोलीत ८ पैकी ५, सेनगावात १४ पैकी ७ योजनांचा समावेश आहे. या योजना पूर्ण करण्याचे नियोजन आखले आहे. काही योजनांना पुरेल एवढाच निधी आहे. मात्र त्यावर मात करून ही कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार आहे. त्यादृष्टिनेच नियोजन केल्याचे अतिरिक्त मुकाअ ए.एम.देशमुख यांनी सांगितले.