शहरं
Join us  
Trending Stories
1
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
2
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
3
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
4
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
5
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
6
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
7
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
8
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
9
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
10
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
11
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
12
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
13
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
14
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
15
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू
16
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
18
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
19
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
20
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक

हिंगोलीत १७९ पैकी ९0 योजनांचा मार्ग सुकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:37 IST

जिल्ह्यात विविध योजनांमध्ये घेतलेल्या मात्र कामे पूर्ण न झालेल्या नळयोजनांसाठी आता जि.प.ने नियोजन केले आहे. याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर पाणीपुरवठा विभाग कामाला लागला आहे. १७९ योजनांचे नियोजन यात केलेले आहे.

ठळक मुद्देवर्षानुवर्षे रखडल्या नळयोजना : जि.प.ने केले नियोजन, पुरेसा निधी नसल्याने प्रश्न गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात विविध योजनांमध्ये घेतलेल्या मात्र कामे पूर्ण न झालेल्या नळयोजनांसाठी आता जि.प.ने नियोजन केले आहे. याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर पाणीपुरवठा विभाग कामाला लागला आहे. १७९ योजनांचे नियोजन यात केलेले आहे.गतवर्षी जवळपास २६0 योजना प्रलंबित होत्या. मात्र त्यावेळी अशीच मोहीम राबविल्यानंतर ४५ योजनांचे कामे पूर्ण करण्यात आली होती. त्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समित्यांच्या बैठका घेवून गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला होता. मात्र त्यानंतरही न बधलेल्या समित्याच आता उरल्या आहेत. या अपूर्ण योजनांबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच त्याचे जि.प.ने नियोजन केले आहे. आता जर या समित्या काम पूर्ण करणार नसतील तर गुन्हे दाखल करण्यासह इतरही कारवाई करण्याचे संकेत दिसत आहेत.कोट्यवधीचा निधी खर्च झाल्यानंतरही योजना प्रलंबित असल्याने अनेक गावांत ग्रामस्थांना पाणीच मिळत नाही. काही ठिकाणी फक्त गावात पाणी आले तर दारात नळ आला नाही. काही ठिकाणी तर हेही झालेले नाही. मात्र आता काही ठिकाणच्या योजना भौतिकदृष्ट्या पूर्ण दाखवून या झंझटीतून मुक्त होण्याची घाई पाणीपुरवठा विभागाला झाल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात अशा योजना १२१ असल्याचे अहवालात म्हटले आहे. यापैकी ६0 योजना या आर्थिक वर्षाअखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. यात औंढ्यातील प्रलंबित २७ पैकी १0, वसमतला ३५ पैकी १२, कळमनुरीत ३५ पैकी १७, हिंगोलीत ११ पैकी १0, सेनगावात १३ पैकी ११ योजना भौतिकदृष्ट्या पूर्ण पण आर्थिकदृष्ट्या अपूर्ण असल्याचे सांगून अंतिम करण्याचे नियोजन आखलेले आहे. ही बाब केवळ कागदोपत्रीच करायची असल्याने याला गतीही येवू शकते. लोकप्रतिनिधींनी याची तपासणी करण्याची गरज आहे. योजना अंतिम करण्याच्या नादात ती अर्धवट राहता कामा नये.५८ गावे : नुसते पाणी पोहोचलेकेवळ गावात पाणीपुरवठा सुरू केलेल्या मात्र अपूर्ण असलेल्या योजना ५८ आहेत. त्यापैकी ३0 या आर्थिक वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. यात औंढ्यात ११ पैकी ५, वसमतला ११ पैकी ५, कळमनुरीत १४ पैकी ८, हिंगोलीत ८ पैकी ५, सेनगावात १४ पैकी ७ योजनांचा समावेश आहे. या योजना पूर्ण करण्याचे नियोजन आखले आहे. काही योजनांना पुरेल एवढाच निधी आहे. मात्र त्यावर मात करून ही कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार आहे. त्यादृष्टिनेच नियोजन केल्याचे अतिरिक्त मुकाअ ए.एम.देशमुख यांनी सांगितले.