शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
5
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
6
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
7
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
8
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
9
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
10
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
11
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
12
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
13
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
14
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
15
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
16
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
17
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
18
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
19
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
20
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या माहेराच्या वाटे जरी लागल्या रे ठेचा, वाटेवरच्या दगडा तुला फुटली रे वाचा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:19 IST

हिंगोली : आषाढ महिन्यात नवविवाहिता या आपल्या माहेरी जातात. आषाढ महिन्यात माहेरी गेल्यानंतर पंचमी सण साजरा करून सासरी येतात; ...

हिंगोली : आषाढ महिन्यात नवविवाहिता या आपल्या माहेरी जातात. आषाढ महिन्यात माहेरी गेल्यानंतर पंचमी सण साजरा करून सासरी येतात; परंतु, या वर्षी कोरोनामुळे नवविवाहितांना माहेरी जाता येईनासे झाले आहे.

आषाढ महिन्यात पावसाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे विवाहकार्य करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ग्रामीण भागात तर विवाह करण्यासाठी कोणतीच व्यवस्थाही नसते. त्यामुळे पूर्वीपासून आषाढ महिना हा विवाहकार्यासाठी वर्ज्यच मानला जातो; परंतु, गत दीड वर्षापासून कोरोनाने सळो की पळो करून सोडले असल्यामुळे या वर्षीही आषाढ महिन्यातसुद्धा विवाहकार्य आटोपून घेतले जात आहे. पंचांगकर्त्यांनी आषाढ महिन्यात दोन मुहूर्त काढले आहेत. यात मुख्यकाल व आपत्काल या मुहूर्तांचा समावेश आहे. आषाढात १३, १८, २२, २५, २६, २८ आणि २९ जुलै अशा तारखा आहेत.

नवविवाहित मुलींच्या आई म्हणतात...

गत दीड वर्षापासून सर्वकाही बदलून गेले आहे. आषाढ महिन्यात पूर्वी लग्न करीत नसत; परंतु, कोरोनामुळे आषाढ महिन्यातही ते करावे लागत आहे. विवाह झाल्यानंतर मुलीला माहेरी बोलावून घेतले जाते. ही पूर्वापर परंपरा आहे. आषाढ महिन्यात मुलगी घरी आल्यास तिला पंचमीपर्यंत ठेवून घेतले जाऊन गोडधोडही खाऊ घातले जाते, असे नवविवाहितेच्या आईने सांगितले.

आषाढ महिना विवाहकार्यासाठी वर्ज्य असला तरी कोरोनामुळे आषाढ महिन्यातही मुख्य काल व आपत्काल पाहून मुहूर्त काढले जात आहेत. गुरुपौर्णिमा, आषाढी एकादशी सोडले तर मोठे सण नाहीत. आषाढात मुलीला माहेरी आणले तर श्रावण महिन्यापर्यंत ठेवून घेऊन पंचमी सण साजरा करून सासरी पाठविले जाते, असे आईने सांगितले.

नवविवाहिता म्हणते...

नवविवाहितांसाठी आषाढ महिना हा महत्त्वाचा आहे. नवविवाहितेला आषाढ महिन्यापासून माहेरची ओढ लागते. लग्नानंतर नवविवाहिता प्रथमच माहेरी जाते. यानंतर पंचमीचा सणही ती मोठ्या उत्साहाने साजरा करते. पंचमीचा झोका घेऊन ती आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन पुन्हा साजरी नांदायला जाते, असे नवविवाहितेने सांगितले.

गत दीड वर्षापासून कोरोना महामारीमुळे नवविवाहितेला सणही साजरे करता येत नाहीत. नवविवाहिता आषाढीला माहेरी गेल्यानंतर साधारणत: पंधरा दिवसांपर्यंत म्हणजे पंचमीपर्यंत माहेरी थांबते. त्यानंतर सासरचे बोलावणे आले की, आनंदाने सासरी जाते. परंतु, कोरोनामुळे काही नवविवाहितांना आपल्या सासरीच सण साजरे करावे लागत आहेत, असे नवविवाहितेने सांगितले.

असे होते विवाह मुहूर्त...

एप्रिल महिन्यामध्ये ८, मे महिन्यामध्ये १६, जून महिन्यामध्ये ८ आणि जुलै महिन्यामध्ये म्हणजे आषाढ महिन्यामध्ये ७ मुहूर्त होते. धुमधडाक्यात साजरे होणारे विवाहकार्य कोरोना महामारीमुळे साध्या पद्धतीनेच साजरे करावे लागले. या दरम्यान, वधूपिता, वरपिता व वऱ्हाडी मंडळींना जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या कोरोना नियमांचे पालन करून विवाहकार्य करावे लागत आहे.