शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
3
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
4
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
5
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
6
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
7
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
8
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
9
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
10
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
11
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
12
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
13
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
14
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
15
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
16
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
17
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
18
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
19
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
20
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल

माझ्या माहेराच्या वाटे जरी लागल्या रे ठेचा, वाटेवरच्या दगडा तुला फुटली रे वाचा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:19 IST

हिंगोली : आषाढ महिन्यात नवविवाहिता या आपल्या माहेरी जातात. आषाढ महिन्यात माहेरी गेल्यानंतर पंचमी सण साजरा करून सासरी येतात; ...

हिंगोली : आषाढ महिन्यात नवविवाहिता या आपल्या माहेरी जातात. आषाढ महिन्यात माहेरी गेल्यानंतर पंचमी सण साजरा करून सासरी येतात; परंतु, या वर्षी कोरोनामुळे नवविवाहितांना माहेरी जाता येईनासे झाले आहे.

आषाढ महिन्यात पावसाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे विवाहकार्य करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ग्रामीण भागात तर विवाह करण्यासाठी कोणतीच व्यवस्थाही नसते. त्यामुळे पूर्वीपासून आषाढ महिना हा विवाहकार्यासाठी वर्ज्यच मानला जातो; परंतु, गत दीड वर्षापासून कोरोनाने सळो की पळो करून सोडले असल्यामुळे या वर्षीही आषाढ महिन्यातसुद्धा विवाहकार्य आटोपून घेतले जात आहे. पंचांगकर्त्यांनी आषाढ महिन्यात दोन मुहूर्त काढले आहेत. यात मुख्यकाल व आपत्काल या मुहूर्तांचा समावेश आहे. आषाढात १३, १८, २२, २५, २६, २८ आणि २९ जुलै अशा तारखा आहेत.

नवविवाहित मुलींच्या आई म्हणतात...

गत दीड वर्षापासून सर्वकाही बदलून गेले आहे. आषाढ महिन्यात पूर्वी लग्न करीत नसत; परंतु, कोरोनामुळे आषाढ महिन्यातही ते करावे लागत आहे. विवाह झाल्यानंतर मुलीला माहेरी बोलावून घेतले जाते. ही पूर्वापर परंपरा आहे. आषाढ महिन्यात मुलगी घरी आल्यास तिला पंचमीपर्यंत ठेवून घेतले जाऊन गोडधोडही खाऊ घातले जाते, असे नवविवाहितेच्या आईने सांगितले.

आषाढ महिना विवाहकार्यासाठी वर्ज्य असला तरी कोरोनामुळे आषाढ महिन्यातही मुख्य काल व आपत्काल पाहून मुहूर्त काढले जात आहेत. गुरुपौर्णिमा, आषाढी एकादशी सोडले तर मोठे सण नाहीत. आषाढात मुलीला माहेरी आणले तर श्रावण महिन्यापर्यंत ठेवून घेऊन पंचमी सण साजरा करून सासरी पाठविले जाते, असे आईने सांगितले.

नवविवाहिता म्हणते...

नवविवाहितांसाठी आषाढ महिना हा महत्त्वाचा आहे. नवविवाहितेला आषाढ महिन्यापासून माहेरची ओढ लागते. लग्नानंतर नवविवाहिता प्रथमच माहेरी जाते. यानंतर पंचमीचा सणही ती मोठ्या उत्साहाने साजरा करते. पंचमीचा झोका घेऊन ती आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन पुन्हा साजरी नांदायला जाते, असे नवविवाहितेने सांगितले.

गत दीड वर्षापासून कोरोना महामारीमुळे नवविवाहितेला सणही साजरे करता येत नाहीत. नवविवाहिता आषाढीला माहेरी गेल्यानंतर साधारणत: पंधरा दिवसांपर्यंत म्हणजे पंचमीपर्यंत माहेरी थांबते. त्यानंतर सासरचे बोलावणे आले की, आनंदाने सासरी जाते. परंतु, कोरोनामुळे काही नवविवाहितांना आपल्या सासरीच सण साजरे करावे लागत आहेत, असे नवविवाहितेने सांगितले.

असे होते विवाह मुहूर्त...

एप्रिल महिन्यामध्ये ८, मे महिन्यामध्ये १६, जून महिन्यामध्ये ८ आणि जुलै महिन्यामध्ये म्हणजे आषाढ महिन्यामध्ये ७ मुहूर्त होते. धुमधडाक्यात साजरे होणारे विवाहकार्य कोरोना महामारीमुळे साध्या पद्धतीनेच साजरे करावे लागले. या दरम्यान, वधूपिता, वरपिता व वऱ्हाडी मंडळींना जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या कोरोना नियमांचे पालन करून विवाहकार्य करावे लागत आहे.