शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
2
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
3
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
4
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
5
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
6
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
7
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
9
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
10
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
11
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
12
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
13
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
14
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
15
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
16
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
17
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
18
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
19
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

ईटीआय मशीनचा बस वाहकांना वैताग; कारवाईच्या भीतीने वाढतोय ताप...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:57 IST

हिंगोली : प्रवाशांना तिकीट देण्यासाठी बस वाहकांना दिलेल्या ईटीआय मशीनमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने वाहक त्रस्त झाले आहेत. नवीन ...

हिंगोली : प्रवाशांना तिकीट देण्यासाठी बस वाहकांना दिलेल्या ईटीआय मशीनमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने वाहक त्रस्त झाले आहेत. नवीन मशीन दिल्या जात नसल्याने मशीनमधून न निघणाऱ्या तिकीटाचा नाहक आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. यासंदर्भात तक्रारी करूनही कार्यवाही होत नसल्याचे चित्र आहे.

एसटी महामंडळाच्या बसमधील प्रवाशांना तिकीट देण्यासाठी पाच ते सात वर्षापूर्वी वाहकांना अत्याधुनिक ईटीआय मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या. यामुळे वाहकांचा वेळ वाचण्यास मदत झाली. मात्र यातील बहुतांश मशीन आता जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे बॅटरी डिस्चार्ज होणे, मशीनमधील तिकीटाचा रोल अडकणे, मशीन हँग होणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. अनेकवेळा तर एखादा थांबा येईपर्यंतही मशीन सुरू होत नाही. यातूनच प्रवाशांना तिकीट दिले नसल्याप्रकरणी कारवाईला सामोरे जावे लागत आहे. याच प्रकारातून माहूर आगारात एका वाहकाने बसमध्येच गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली. ईटीआय मशीनच्या बिघाडाचा प्रकार हिंगोली जिल्ह्यातही घडत असून यामुळे वाहक वैतागले आहेत. यासंदर्भात तक्रारीही करण्यात आल्या. परंतु, किरकोळ दुरूस्ती करून मशीन पुन्हा सोपवली जात आहे. मशीन न स्विकारल्यास कारवाई केली जाईल, या भीतीने वाहकांना नाइलाजाने मशीन वापरावी लागत आहे.

दररोज ६ मशीन बिघडतात

जिल्ह्यात हिंगोली, वसमत व कळमनुरी येथे आगार आहे. या तिनही आगारात दररोज एक ते दोन मशीनविषयी तक्रारींचा पाढा वाहक वाचतात. जिल्ह्यात किमान सहा मशीनमध्ये तरी बिघाड होत असल्याची माहिती वाहकांनी दिली.

वर्षभरात ४०० तक्रारी

१) ईटीआय मशीनमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने आगारामध्ये याविषयी तक्रार करण्यासाठी नोंद रजिस्टर ठेवण्यात आले होते. सुरवातीला या रजिस्टरमध्ये ईटीआय मशीनविषयी तक्रारीची नोंद घेतली जात होती. त्यानंतर मात्र रजिस्टरच ठेवले जात नसल्याचा आरोप काही वाहकांनी केला आहे.

२) जिल्हाभरातील प्रत्येक आगारात दररोज किमान एक ते दोन तक्रारी येत आहेत. वर्षभरात किमान ४०० तक्रारी तरी आल्या असतील. यातील काही तक्रारींची नोंद झाली तर काहीं वाहकांना रजिस्टरअभावी तक्रार करता आली नाही. त्यामुळे तक्रारीचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

३) मशीन विषयी तक्रार केल्यास मशीन तात्पुरती दुरूस्त करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मोठी दुरूस्ती असल्यास मशीन कंपनीकडे पाठविली जात असल्याचे हिंगोली आगारातून सांगण्यात आले.

वाहक म्हणतात...

ईटीआय मशीनमधून अनेकवेळा तिकीट निघत नाही. बॅटऱ्या केवळ एक तासच चालत आहेत. अनेकवेळा तिकीट न निघताही तिकीट काढल्याची नोंद होत असल्याने अशा तिकीटाचे पैसे स्वत: भरावे लागत आहेत. यामुळे नाहक आर्थिक भूर्दंड बसत आहे. नवीन मशीन उपलब्ध करून द्याव्यात.

-टी.टी. बेंगाळ, वाहक

ईटीआय मशीन अनेकवेळा हँग होत आहे. मशीन हँग झाल्यास सुरू होण्यास अनेकवेळा दोन घंटे तरी वेळ लागत आहे. अशा वेळी लोकल थांबा जवळ असल्यास तिकीटही काढणे होत नाही. नवीन मशीन उपलब्ध करून द्याव्यात.

-जी.एस. घोरपडे, वाहक

हिंगोली आगाराकडे १४९ ईटीआय मशीन असून त्यापैकी दररोज किमान एक ते दोन मशीनमध्ये बिघाड होत असल्याच्या तक्रारी वाहकांतून येत आहेत. किरकोळ दुरूस्ती असल्यास कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून मशीन दुरूस्ती करण्याचा प्रयत्न केला जातो.

-संजयकुमार पुंडगे, स्थानक प्रमुख, हिंगोली

वाहकांना दिलेल्या ईटीआय मशीन अनेकवेळा हँग होत आहेत. मशीन ॲक्टीव्ह होण्यासाठी बंद करावी लागत आहे. अशा वेळी प्रवासी थांब्याच्या पुढे बस जाते. याचा फटका वाहकांना बसत आहे. बेस्टच्या धर्तीवर वाहकांना मशीन उपलब्ध करून द्याव्यात.

-एस.पी. काटकर, कार्यसमिती सदस्य, महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटना, परभणी विभाग