शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कयाधू पूल ते शेतकरी भवन रस्त्यावरील अतिक्रमण हटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:20 IST

३० जूनपासून कयाधू नदी पूल व गोपीनाथ मुंडे शेतकरी भवनापर्यंतच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. रस्त्याच्या बाजूला असलेले ...

३० जूनपासून कयाधू नदी पूल व गोपीनाथ मुंडे शेतकरी भवनापर्यंतच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. रस्त्याच्या बाजूला असलेले अतिक्रमण नागरिकांनी स्वत:हून काढून घेतले. यामध्ये काही जणांचे अंतर्गत वादही झाले. मात्र, हे वाद पालिकेच्या पथ्यावरच पडले. या वाद करणाऱ्यांनी एकमेकांना आव्हान देत तुमचे काढले तरच आमचे अतिक्रमण काढू देऊ, अशी भूमिका घेतली. त्यात दोन्हीही गट राजी झाल्याने पालिकेचा मार्ग सुकर झाला. कयाधू नदी ते शेतकरी भवन, भगवान बाबा चौक ते निरंजन बाबा चौक, शेतकरी भवनानजीकचा रस्ता अशा तीन रस्त्यांवरचे अतिक्रमण हटविले. यानंतर वंजारवाडा भागात दोन रस्त्यांची कामे होणार आहेत. मंगळवारा बाजार भागात आप्पाची खारी ते देवी मंदिर, मंगळवारा बाजार ते महादेववाडी हेही रस्ते होणार आहेत.

यावेळी मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे, शहर अभियंता रत्नाकर अडसिरे, उपमुख्याधिकारी उमेश हेंबाडे, अभियंता रविराज दरक, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, प्रशासकीय अधिकारी श्याम माळवटकर, अभियंता प्रिया कोकाटे आदींची उपस्थिती होती. मुख्याधिकारी दोन दिवसांपासून या भागात ठाण मांडून असून या रस्त्याच्या कामांत अडसर येणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.

रस्ता ४० फुटांचा की ३०

या भागातील अतिक्रमणे हटवून ३० फुटांच्या रस्त्याची जागा मोकळी झाली आहे. मात्र, हा रस्ता १२ मीटरचा असल्याचे सांगून अनेकजण उरलेले अतिक्रमणही काढण्याची मागणी करीत आहेत. मात्र, हा रस्ता डीपीला ९ मीटरचाच असून मंजुरीत १२ मीटर असल्याने नागरिकांचा गोंधळ उडत असल्याचे नगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.