शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

कयाधू पूल ते शेतकरी भवन रस्त्यावरील अतिक्रमण हटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:20 IST

३० जूनपासून कयाधू नदी पूल व गोपीनाथ मुंडे शेतकरी भवनापर्यंतच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. रस्त्याच्या बाजूला असलेले ...

३० जूनपासून कयाधू नदी पूल व गोपीनाथ मुंडे शेतकरी भवनापर्यंतच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. रस्त्याच्या बाजूला असलेले अतिक्रमण नागरिकांनी स्वत:हून काढून घेतले. यामध्ये काही जणांचे अंतर्गत वादही झाले. मात्र, हे वाद पालिकेच्या पथ्यावरच पडले. या वाद करणाऱ्यांनी एकमेकांना आव्हान देत तुमचे काढले तरच आमचे अतिक्रमण काढू देऊ, अशी भूमिका घेतली. त्यात दोन्हीही गट राजी झाल्याने पालिकेचा मार्ग सुकर झाला. कयाधू नदी ते शेतकरी भवन, भगवान बाबा चौक ते निरंजन बाबा चौक, शेतकरी भवनानजीकचा रस्ता अशा तीन रस्त्यांवरचे अतिक्रमण हटविले. यानंतर वंजारवाडा भागात दोन रस्त्यांची कामे होणार आहेत. मंगळवारा बाजार भागात आप्पाची खारी ते देवी मंदिर, मंगळवारा बाजार ते महादेववाडी हेही रस्ते होणार आहेत.

यावेळी मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे, शहर अभियंता रत्नाकर अडसिरे, उपमुख्याधिकारी उमेश हेंबाडे, अभियंता रविराज दरक, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, प्रशासकीय अधिकारी श्याम माळवटकर, अभियंता प्रिया कोकाटे आदींची उपस्थिती होती. मुख्याधिकारी दोन दिवसांपासून या भागात ठाण मांडून असून या रस्त्याच्या कामांत अडसर येणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.

रस्ता ४० फुटांचा की ३०

या भागातील अतिक्रमणे हटवून ३० फुटांच्या रस्त्याची जागा मोकळी झाली आहे. मात्र, हा रस्ता १२ मीटरचा असल्याचे सांगून अनेकजण उरलेले अतिक्रमणही काढण्याची मागणी करीत आहेत. मात्र, हा रस्ता डीपीला ९ मीटरचाच असून मंजुरीत १२ मीटर असल्याने नागरिकांचा गोंधळ उडत असल्याचे नगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.