शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
2
भारतीय नौदलाची INS सुकन्या अन् पाकिस्तानचं PNS सैफ युद्धनौका समोरासमोर, त्यानंतर...
3
कोलकाताला भूकंपाचे हादरे, ५.२ रिश्टर स्केलची तीव्रता, लोक घाबरून घराबाहेर पडले...
4
दिल्ली ब्लास्ट: जहाल भाषणे, बाँब बनवण्याचे धडे... अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या फोनमध्ये काय काय सापडले?
5
Anil Ambani Stocks: अनिल अंबानींच्या कंपन्यांच्या शेअर्सची बिकट स्थिती, ६०% पेक्षा अधिक आपटले; तुमच्याकडे आहेत का?
6
'माफियांचा खरा चेहरा...', दिव्या खोसला कुमारने मुकेश भट यांच्यासोबतचं कॉल रेकॉर्डिंग केलं लीक
7
मुंबई महानगरपालिकेत भाजपा मुसंडी मारणार? १००हून अधिक जागा जिंकणार, अंतर्गत सर्व्हेतून दावा
8
IND vs SA 2nd Test : MS धोनीच्या एलिट क्लबमध्ये सामील होणार रिषभ पंत! जाणून घ्या त्याचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड!
9
पगार मिळताच अकाउंट होते खाली? '५०-३०-२०' नियमाचा वापर करून ६ महिन्यांत फरक पाहा
10
"मनसे महाविकास आघाडीचा भाग नाही, आमचा निर्णय..."; नेते संदीप देशपांडेंनी मांडली स्पष्ट भूमिका
11
नोटांचे बंडल, सोन्याचे दागिने...; बंगाल, झारखंडमध्ये कोळसा व्यापाऱ्यांच्या घरांवर ईडीचे छापे
12
"सुनील तटकरे लवकरच भाजपमध्ये जातील, हे त्रिवार सत्य आहे", एकनाथ शिंदेंच्या नेत्याचा खळबळजनक दावा
13
खेडमध्ये वैभव खेडेकरांच्या पदरी निराशा; पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आली वेळ, काय घडलं?
14
"देवाच्या कृपेने वाचलो...", बिग बॉस विजेत्या शिव ठाकरेच्या घरी लागलेल्या आगीत ट्रॉफीही जळाल्या
15
वाद चिघळणार! ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपाच्या माजी नगरसेवकावर आरोप
16
Spiritual: आयुष्याच्या अखेरीस प्रत्येकाची पडते शनी महाराजांशी गाठ; मार्गशीर्षात करा 'हे' बदल!
17
अल फलाह विद्यापीठाचे पुढे काय होणार? डॉक्टरकीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला!
18
जपानवर मोठे आर्थिक संकट? ३० वर्षांचा 'येन कॅरी ट्रेड' मोडीत; जागतिक बाजारात मोठा उलटाफेर होण्याची भीती!
19
TATA ची 'ही' कंपनी ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार, यापूर्वी TCS मधून १२ हजार कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ
20
मतविभाजनाची भीती! ठाकरे गटाकडून काँग्रेसची मनधरणी, बड्या नेत्याची वर्षा गायकवाडांशी चर्चा 
Daily Top 2Weekly Top 5

जातीचा उंबरठा ओलांडणाऱ्या आठ जोडप्यांना अर्थसाहाय्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:32 IST

हिंगोली : जाती-जातींतील अपृश्यतेचे निवारण व्हावे, यासाठी आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासनातर्फे ५० हजारांचे अर्थसाहाय्य दिले जाते. जिल्ह्यात दोन ...

हिंगोली : जाती-जातींतील अपृश्यतेचे निवारण व्हावे, यासाठी आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासनातर्फे ५० हजारांचे अर्थसाहाय्य दिले जाते. जिल्ह्यात दोन वर्षांत २४ जोडप्यांना अर्थसाहाय्य मिळाले असून, केवळ आठ जोडप्यांना अर्थसाहाय्य मिळण्याची प्रतीक्षा आहे. निधीप्राप्त झाल्यास मार्चअखेर या जोडप्यांनाही अर्थसाहाय्य दिले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

समाजातील अस्पृश्यतेचे निवारण व्हावे, तसेच आंतरजातीय विवाहास प्रोत्साहान मिळावे, यासाठी शासनाच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने प्रत्येक जोडप्यास ५० हजारांचे अर्थसाहाय्य दिले जाते. यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे अर्ज सादर करावा लागतो. वराचे वय २१ व वधूचे वय १८ वर्षे पूर्ण असणाऱ्या जोडप्यांना या योजनेसाठी प्रस्ताव सादर करता येतो. तसेच प्रस्तावासोबत विवाह नोंदणी, दाखला, वधू-वराचा एकत्रित फोटो जोडावा लागतो. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे दोन वर्षांत ३२ जोडप्यांनी अर्थसाहाय्यासाठी प्रस्ताव सादर केले होते. त्यापैकी २४ प्रस्तावांना मंजुरी दिली असून, या जोडप्यांच्या संयुक्त खात्यावर ५० हजार रुपयांचा धनाकर्ष जमा करण्यात आला आहे. आता केवळ आठ प्रस्ताव आहेत. हे प्रस्तावही आता आल्याने मार्चअखेर या जोडप्यांच्या संयुक्त खात्यावर ५० हजारांचे अर्थसाहाय्य जमा करण्यात येणार असल्याचे समाजकल्याण विभागातून सांगण्यात आले. आलेले प्रस्ताव समाजकल्याण अधिकारी तत्काळ मार्गी लावत असल्याने आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांतून समाधानाचे वातावरण पाहावयास मिळत आहे.

--------

अशी मिळते मदत

१ फेब्रुवारी २०१० पूर्वी आंतरजातीय विवाह झाला असल्यास १५ हजार रुपये आणि त्यानंतर विवाह झाला असल्यास ५० हजार रुपयांचे अनुदान मिळते.

----------

यांना मिळते मदत

राज्यातील रहिवासी असलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी ही योजना आहे. आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांपैकी या जातीतील एक व दुसरी व्यक्ती सवर्ण हिंदू, लिंगायत, जैन, शिख यांच्यातील असतील तर अशा जोडप्यांना अर्थसाहाय्य दिले जाते. तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती यामधील अंतरप्रवर्गात आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांनाही ५० हजारांचे अर्थसाहाय्य देण्यात येते.

३२

दोन वर्षांत झालेले आंतरजातीय विवाह

----------

२४

जोडप्यांना मिळाली मदत

-------------

जिल्ह्यात दोन वर्षांत २४ आंतरजातीय विवाह झाले आहेत. या २४ जोडप्यांना ५० हजारांचे अर्थसाहाय्य देण्यात आले आहे. आता आठ प्रस्ताव प्राप्त झाले असून, या जोडप्यांनाही मार्चअखेर ५० हजारांचे अर्थसाहाय्य मिळून जाईल.

-एस. जी. वागतकर, समाजकल्याण निरीक्षक

--------------