शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
3
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
4
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
5
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
6
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
7
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
8
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
9
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
10
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
11
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
12
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
13
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
14
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
15
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
16
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
17
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
18
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
19
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
20
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले

जातीचा उंबरठा ओलांडणाऱ्या आठ जोडप्यांना अर्थसाहाय्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:32 IST

हिंगोली : जाती-जातींतील अपृश्यतेचे निवारण व्हावे, यासाठी आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासनातर्फे ५० हजारांचे अर्थसाहाय्य दिले जाते. जिल्ह्यात दोन ...

हिंगोली : जाती-जातींतील अपृश्यतेचे निवारण व्हावे, यासाठी आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासनातर्फे ५० हजारांचे अर्थसाहाय्य दिले जाते. जिल्ह्यात दोन वर्षांत २४ जोडप्यांना अर्थसाहाय्य मिळाले असून, केवळ आठ जोडप्यांना अर्थसाहाय्य मिळण्याची प्रतीक्षा आहे. निधीप्राप्त झाल्यास मार्चअखेर या जोडप्यांनाही अर्थसाहाय्य दिले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

समाजातील अस्पृश्यतेचे निवारण व्हावे, तसेच आंतरजातीय विवाहास प्रोत्साहान मिळावे, यासाठी शासनाच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने प्रत्येक जोडप्यास ५० हजारांचे अर्थसाहाय्य दिले जाते. यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे अर्ज सादर करावा लागतो. वराचे वय २१ व वधूचे वय १८ वर्षे पूर्ण असणाऱ्या जोडप्यांना या योजनेसाठी प्रस्ताव सादर करता येतो. तसेच प्रस्तावासोबत विवाह नोंदणी, दाखला, वधू-वराचा एकत्रित फोटो जोडावा लागतो. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे दोन वर्षांत ३२ जोडप्यांनी अर्थसाहाय्यासाठी प्रस्ताव सादर केले होते. त्यापैकी २४ प्रस्तावांना मंजुरी दिली असून, या जोडप्यांच्या संयुक्त खात्यावर ५० हजार रुपयांचा धनाकर्ष जमा करण्यात आला आहे. आता केवळ आठ प्रस्ताव आहेत. हे प्रस्तावही आता आल्याने मार्चअखेर या जोडप्यांच्या संयुक्त खात्यावर ५० हजारांचे अर्थसाहाय्य जमा करण्यात येणार असल्याचे समाजकल्याण विभागातून सांगण्यात आले. आलेले प्रस्ताव समाजकल्याण अधिकारी तत्काळ मार्गी लावत असल्याने आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांतून समाधानाचे वातावरण पाहावयास मिळत आहे.

--------

अशी मिळते मदत

१ फेब्रुवारी २०१० पूर्वी आंतरजातीय विवाह झाला असल्यास १५ हजार रुपये आणि त्यानंतर विवाह झाला असल्यास ५० हजार रुपयांचे अनुदान मिळते.

----------

यांना मिळते मदत

राज्यातील रहिवासी असलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी ही योजना आहे. आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांपैकी या जातीतील एक व दुसरी व्यक्ती सवर्ण हिंदू, लिंगायत, जैन, शिख यांच्यातील असतील तर अशा जोडप्यांना अर्थसाहाय्य दिले जाते. तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती यामधील अंतरप्रवर्गात आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांनाही ५० हजारांचे अर्थसाहाय्य देण्यात येते.

३२

दोन वर्षांत झालेले आंतरजातीय विवाह

----------

२४

जोडप्यांना मिळाली मदत

-------------

जिल्ह्यात दोन वर्षांत २४ आंतरजातीय विवाह झाले आहेत. या २४ जोडप्यांना ५० हजारांचे अर्थसाहाय्य देण्यात आले आहे. आता आठ प्रस्ताव प्राप्त झाले असून, या जोडप्यांनाही मार्चअखेर ५० हजारांचे अर्थसाहाय्य मिळून जाईल.

-एस. जी. वागतकर, समाजकल्याण निरीक्षक

--------------