शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाकाळात जिल्ह्यात ७ मुले तर १७ मुली हरवल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:37 IST

२०२० मध्ये जानेवारी महिन्यात १ मुलगा तर ३ मुली हरवल्या. फेब्रुवारी महिन्यात २ मुले, १ मुलगी, तर मार्च महिन्यात ...

२०२० मध्ये जानेवारी महिन्यात १ मुलगा तर ३ मुली हरवल्या. फेब्रुवारी महिन्यात २ मुले, १ मुलगी, तर मार्च महिन्यात २ मुले, मे महिन्यात १ मुलगी, जून महिन्यात १ मुलगी, जुलै महिन्यात १ मुलगा, सप्टेंबर महिन्यात ३ मुली, ऑक्टोबर महिन्यात ४ मुली, नोव्हेंबर महिन्यात ३ मुली, डिसेंबर महिन्यात १ मुलगा, १ मुलगी हरवली आहे. एप्रिल आणि ऑगस्ट महिन्यांत एकही मुलगा हरवला नाही.

ही सर्व मुले १८ वर्षे वयोगटातील आहेत. मुले-मुली हरवल्यानंतर जिल्हा पालक हे पोलीस अधीक्षक कार्यालयातील ‘भरोसा’ केंद्रात रीतसर अर्ज देतात. पोलीस अधीक्षक राकेश कलासागर व अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हरवलेली मुले, मुली शोधण्यासाठी पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

जिल्ह्यात २०१८ मध्ये २० मुले तर १५ मुली हरवल्या होत्या. यामध्ये मुले सापडली असून ३ मुलींचा शोध सुरू आहे. २०१९ मध्ये १८ मुले तर २६ मुली हरवल्या होत्या. यापैकी मुले सापडली असून ३ मुलींचा शोध बाकी आहे. २०२० मध्ये ७ मुले तर १७ मुली हरवल्या होत्या. यापैकी ६ मुले सापडली असून ३ मुलींचा शोध घेणे सुरू आहे.

सहायक पोलीस निरीक्षक विशाखा धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शोधमोहीम राबविण्यात आली. याकामी पोहेकाॅ शेख इस्माईल शेख फरीद, मपोना सुनीता शिंदे, मपोशि स्वाती डोल्हारे, मपोशि वर्षा शिंदे, मपोशि शिल्पा फटाले यांनी मदत केली.

आपल्या मुलामुलींची काळजी घेणे हे पालकांचे प्रथम कर्तव्य आहे. जुजबी कारण पुढे करून मुला-मुलींना रागवू नये. रागावल्यास लगेच मुलामुलींचा राग शांत करून प्रेमाने त्यांच्याशी बोलावे. गर्दीच्या ठिकाणी किंवा यात्रेत मुले जास्तकरून हरवले जातात. अशावेळेस आपल्या पाल्ल्यांचा हात सोडू नये. एवढ्यावर मुलगा-मुलगी हरवल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. पोलीस सदैव आपल्या पाठीशी आहेत.

-विशाखा धुळे, सहायक पोलीस निरीक्षक, ‘भरोसा’ हिंगोली