शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
5
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
6
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
7
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
8
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
9
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
10
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
11
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
12
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
13
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
14
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
15
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
16
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
17
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
18
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
19
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
20
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध

बाजार समितीच्या सभापतींवरील अविश्वास ठरावामुळे वसमतमध्ये राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 18:00 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व उपसभापतींवर दाखल झालेल्या अविश्वास ठरावाने शनिवारी हिंसक वळण घेतले. अविश्वासावर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीपूर्वी शनिवारी सकाळी प्रचंड राडा झाला.

वसमत, दि. 5 - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व उपसभापतींवर दाखल झालेल्या अविश्वास ठरावाने शनिवारी हिंसक वळण घेतले. अविश्वासावर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीपूर्वी शनिवारी सकाळी प्रचंड राडा झाला. नवघरेच्या समर्थनार्थ हजारो तरूण व शेतकरी रस्त्यावर उतरले होते. या जमावाने सभेसाठी येणा-या संचालकांच्या वाहनांच्या ताफ्यावर प्रचंड दगडफेक केली. यात आठ जण जखमी झाले असून, अनेक वाहनांचे नुकसान झाले. तणावाच्या वातावरणात अविश्वास ठराव पारित झाला. वसमत बाजार समितीचे सभापती राजू पाटील नवघरे व उपसभापती तानाजी पाटील बेंडे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल झाला होता. त्यावर चर्चेसाठी आज सभा झाली. ठराव दाखल झाल्यापासून राजू नवघरे यांचे समर्थक नाराज होते. सामान्य कुटुंबातील नेत्यावरील प्रस्थापितांकडून आलेल्या अविश्वासाच्या विरोधात प्रचंड सहानुभूतीची लाट तयार झाली होती. शनिवारी सहलीवर गेलेले संचालक सभेसाठी परत आले. तालुक्यातील सर्वच रस्त्यांवर प्रचंड संख्येने जमाव जमला होता. संचालकांना बैठकीला जावू द्यायचे नाही, असा निर्धार नवघरे समर्थकांचा होता. त्यानुसार नांदेडमार्गे वसमतकडे येणाºया संचालकांच्या वाहनांना माळवटा परिसरात नवघरे समर्थक तरूणांच्या जमावाने आडवले. प्रचंड दगडफेक केली. काही संचालकांना जबर मारहाणही झाली. जीव वाचवण्यासाठी अनेकजण शेतात लपून बसले. संचालकांच्या सोबत असलेल्या वाहनांवरही हल्ला झाला. यात आठ जण जबर जखमी झाले आहेत. वाहनांवर तुफान दगडफेक झाल्याने वाहनांच्या काचांचा चुराडा झाला. सहा गाड्यांचे नुकसान झाले. एक जीप तर दगडफेकीतून वाचवण्याच्या नादात रस्त्याच्या खाली घसरली. सुदैवाने मातीत फसल्याने उलटली नाही, नसता मोठी दुर्घटना झाली असती. बैठकीच्या पार्श्चभूमीवर राडा होणार असल्याची शक्यता गृहीत धरून तगडा पोलीस बंदोबस्त लावला होता. दगडफेकीच्या स्थळावर तातडीने पोलीस पोहोचल्याने संचालकांना सहीसलामत जमावाच्या तावडीतून सोडवून सभेस्थळी आणण्यात आले. जमलेल्या तरूण व शेतकºयांचा संताप पाहता काही संचालकांनी तर पोलिसांच्या गाडीतच बसून सभेसाठी येण्यात धन्यता मानली. यावरून जमावाच्या दहशतीची व तणावाची तीव्रता लक्षात येते. शून्य विरुद्ध १३ मतांनी अविश्वास पारितअविश्वास दाखल केलेले १३ पैकी १३ संचालक सभागृहात हजर झाले. सभापती, उपसभापती व अन्य तिघे गरैहजर राहीले. त्यामुळे १३ विरूद्ध शून्य मताने अविश्वास ठराव पास झाला. पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी ज्ञानोबा बानापुरे, तहसीलदार उमाकांत पारधी यांची उपस्थिती होती.सहा जण जखमीजखमी होणाºयांमध्ये प्रभाकर इंगोले, अक्षय दळवी, विनोद इंगोले, नितीन दळवी, नारायण लोकेवार, रामू धूत आदींचा समावेश आहे. जखमींवर उपजिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले. राड्यात जखमी होणाºयात रामू धूत या व्यापाºयांचा समावेश आहे. त्यांचा राजकारणाशी संबंध नसतानाही त्यांच्यावर हल्ला झाल्याची चर्चा आहे. दवाखान्यात उपचार घेणाºया तरूणांनीही आम्ही केळीची पट्टी आणण्यासाठी जात असताना हल्ला झाल्याचे सांगितले.वादळ अजूनही शांत नाहीया प्रकाराने वसमत तालुका ढवळून निघाला आहे. अविश्वास ठराव पास झाला असला तरी राजू पाटील नवघरे हा तालुक्यातील सर्व सामान्यांचा कार्यकर्ता असल्याच्या घटनेवरही आज शिक्कामोर्तब झाले. कार्यकर्ताविरूद्ध सर्व प्रस्थापित लढाई असे स्वरूप या अविश्वास ठरावाला आले होते. अविश्वास ठराव पास झाला असला तरी या निमित्ताने उठलेले वादळी अद्यापही शांत झालेले नाही. भविष्यात प्रचंड उलथापालथ घडवून आणण्यास हा अविश्वास कारणीभूत ठरणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटाउद्भवलेली परिस्थिती पोलिसांनी कुशलतेने हाताळली. सभापती राजू पाटील नवघरे यांनी संतप्त तरूणांना शांत केल्यानेच जास्त उद्रेक झाला नाही. डीवायएसपी शशिकिराण काशीद, पोलीस निरीक्षक उदयसिंह चंदेल यांच्यासह हट्टा, कुरूंदा, बाळापूर, वसमत, वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी एसआरपीची तुकडी असा मोठा फौजफाटा तैनात होता.  अविश्वास प्रस्ताव पास झाला असला तरी सामान्य शेतकरी व तरूणांच्या मनातील विश्वास मी जिंकला आहे. मला सभापती पदावरून हटले तरी सामान्यांच्या मनातून मला कोणी हटवू शकणार नाही. शेतकºयांच्या मालाला भाव मिळवून देण्यासाठी बाहेरचे खरेदीदार मी वसमतला आणले. त्यातून काही जणांचे आर्थिक नुकसान झाले. त्यांनीच हा प्रकार घडवला असल्याची प्रतिक्रिया राजू पाटील नवघरे यांनी दिली. 

बाजार समितीमध्ये शेतक-यांना सुविधा मिळाव्यात शेतीमालाला भाव मिळावा, अशी आमची मागणी होती. संचालकांना विश्वासात न घेता सभापती कारभार करत होते. त्यातून सर्व संचालकांनी एकत्र येवून हा निर्णय घेतला आहे. बाजार समितीच विकास झाला पाहिजे व सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे, यासाठी सर्व संचालकांनी अविश्वास ठराव दाखल केला व एकजुटीने पास केल्याची प्रतिक्रिया सभापतीपदाचे प्रमुख दावेदार राजेश पाटील इंगोले यांनी दिली.