शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीच्या सभापतींवरील अविश्वास ठरावामुळे वसमतमध्ये राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 18:00 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व उपसभापतींवर दाखल झालेल्या अविश्वास ठरावाने शनिवारी हिंसक वळण घेतले. अविश्वासावर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीपूर्वी शनिवारी सकाळी प्रचंड राडा झाला.

वसमत, दि. 5 - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व उपसभापतींवर दाखल झालेल्या अविश्वास ठरावाने शनिवारी हिंसक वळण घेतले. अविश्वासावर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीपूर्वी शनिवारी सकाळी प्रचंड राडा झाला. नवघरेच्या समर्थनार्थ हजारो तरूण व शेतकरी रस्त्यावर उतरले होते. या जमावाने सभेसाठी येणा-या संचालकांच्या वाहनांच्या ताफ्यावर प्रचंड दगडफेक केली. यात आठ जण जखमी झाले असून, अनेक वाहनांचे नुकसान झाले. तणावाच्या वातावरणात अविश्वास ठराव पारित झाला. वसमत बाजार समितीचे सभापती राजू पाटील नवघरे व उपसभापती तानाजी पाटील बेंडे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल झाला होता. त्यावर चर्चेसाठी आज सभा झाली. ठराव दाखल झाल्यापासून राजू नवघरे यांचे समर्थक नाराज होते. सामान्य कुटुंबातील नेत्यावरील प्रस्थापितांकडून आलेल्या अविश्वासाच्या विरोधात प्रचंड सहानुभूतीची लाट तयार झाली होती. शनिवारी सहलीवर गेलेले संचालक सभेसाठी परत आले. तालुक्यातील सर्वच रस्त्यांवर प्रचंड संख्येने जमाव जमला होता. संचालकांना बैठकीला जावू द्यायचे नाही, असा निर्धार नवघरे समर्थकांचा होता. त्यानुसार नांदेडमार्गे वसमतकडे येणाºया संचालकांच्या वाहनांना माळवटा परिसरात नवघरे समर्थक तरूणांच्या जमावाने आडवले. प्रचंड दगडफेक केली. काही संचालकांना जबर मारहाणही झाली. जीव वाचवण्यासाठी अनेकजण शेतात लपून बसले. संचालकांच्या सोबत असलेल्या वाहनांवरही हल्ला झाला. यात आठ जण जबर जखमी झाले आहेत. वाहनांवर तुफान दगडफेक झाल्याने वाहनांच्या काचांचा चुराडा झाला. सहा गाड्यांचे नुकसान झाले. एक जीप तर दगडफेकीतून वाचवण्याच्या नादात रस्त्याच्या खाली घसरली. सुदैवाने मातीत फसल्याने उलटली नाही, नसता मोठी दुर्घटना झाली असती. बैठकीच्या पार्श्चभूमीवर राडा होणार असल्याची शक्यता गृहीत धरून तगडा पोलीस बंदोबस्त लावला होता. दगडफेकीच्या स्थळावर तातडीने पोलीस पोहोचल्याने संचालकांना सहीसलामत जमावाच्या तावडीतून सोडवून सभेस्थळी आणण्यात आले. जमलेल्या तरूण व शेतकºयांचा संताप पाहता काही संचालकांनी तर पोलिसांच्या गाडीतच बसून सभेसाठी येण्यात धन्यता मानली. यावरून जमावाच्या दहशतीची व तणावाची तीव्रता लक्षात येते. शून्य विरुद्ध १३ मतांनी अविश्वास पारितअविश्वास दाखल केलेले १३ पैकी १३ संचालक सभागृहात हजर झाले. सभापती, उपसभापती व अन्य तिघे गरैहजर राहीले. त्यामुळे १३ विरूद्ध शून्य मताने अविश्वास ठराव पास झाला. पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी ज्ञानोबा बानापुरे, तहसीलदार उमाकांत पारधी यांची उपस्थिती होती.सहा जण जखमीजखमी होणाºयांमध्ये प्रभाकर इंगोले, अक्षय दळवी, विनोद इंगोले, नितीन दळवी, नारायण लोकेवार, रामू धूत आदींचा समावेश आहे. जखमींवर उपजिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले. राड्यात जखमी होणाºयात रामू धूत या व्यापाºयांचा समावेश आहे. त्यांचा राजकारणाशी संबंध नसतानाही त्यांच्यावर हल्ला झाल्याची चर्चा आहे. दवाखान्यात उपचार घेणाºया तरूणांनीही आम्ही केळीची पट्टी आणण्यासाठी जात असताना हल्ला झाल्याचे सांगितले.वादळ अजूनही शांत नाहीया प्रकाराने वसमत तालुका ढवळून निघाला आहे. अविश्वास ठराव पास झाला असला तरी राजू पाटील नवघरे हा तालुक्यातील सर्व सामान्यांचा कार्यकर्ता असल्याच्या घटनेवरही आज शिक्कामोर्तब झाले. कार्यकर्ताविरूद्ध सर्व प्रस्थापित लढाई असे स्वरूप या अविश्वास ठरावाला आले होते. अविश्वास ठराव पास झाला असला तरी या निमित्ताने उठलेले वादळी अद्यापही शांत झालेले नाही. भविष्यात प्रचंड उलथापालथ घडवून आणण्यास हा अविश्वास कारणीभूत ठरणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटाउद्भवलेली परिस्थिती पोलिसांनी कुशलतेने हाताळली. सभापती राजू पाटील नवघरे यांनी संतप्त तरूणांना शांत केल्यानेच जास्त उद्रेक झाला नाही. डीवायएसपी शशिकिराण काशीद, पोलीस निरीक्षक उदयसिंह चंदेल यांच्यासह हट्टा, कुरूंदा, बाळापूर, वसमत, वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी एसआरपीची तुकडी असा मोठा फौजफाटा तैनात होता.  अविश्वास प्रस्ताव पास झाला असला तरी सामान्य शेतकरी व तरूणांच्या मनातील विश्वास मी जिंकला आहे. मला सभापती पदावरून हटले तरी सामान्यांच्या मनातून मला कोणी हटवू शकणार नाही. शेतकºयांच्या मालाला भाव मिळवून देण्यासाठी बाहेरचे खरेदीदार मी वसमतला आणले. त्यातून काही जणांचे आर्थिक नुकसान झाले. त्यांनीच हा प्रकार घडवला असल्याची प्रतिक्रिया राजू पाटील नवघरे यांनी दिली. 

बाजार समितीमध्ये शेतक-यांना सुविधा मिळाव्यात शेतीमालाला भाव मिळावा, अशी आमची मागणी होती. संचालकांना विश्वासात न घेता सभापती कारभार करत होते. त्यातून सर्व संचालकांनी एकत्र येवून हा निर्णय घेतला आहे. बाजार समितीच विकास झाला पाहिजे व सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे, यासाठी सर्व संचालकांनी अविश्वास ठराव दाखल केला व एकजुटीने पास केल्याची प्रतिक्रिया सभापतीपदाचे प्रमुख दावेदार राजेश पाटील इंगोले यांनी दिली.