शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
3
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
4
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
5
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
6
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
7
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
8
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
9
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
10
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
11
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
12
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
13
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
14
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
15
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
16
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
17
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
18
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
19
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
20
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

By admin | Updated: July 30, 2014 00:02 IST

मारोती घ्यार, भांडेगाव उशिराने का होईना, पण शेतकऱ्यांनी पेरणी केली; परंतु पावसाचे आगमन झाले नसल्याने ते वाळून गेल्याने दुबार पेरणीवरही टांगती तलवार दिसत आहे.

मारोती घ्यार, भांडेगावउशिराने का होईना, पण शेतकऱ्यांनी पेरणी केली; परंतु पावसाचे आगमन झाले नसल्याने ते वाळून गेल्याने दुबार पेरणीवरही टांगती तलवार दिसत आहे. भांडेगाव परिसरात हे चित्र निर्माण झाले आहे.हिंगोली तालुक्यातील भांडेगाव, साटंबा, जामठी परिसरात पंधरा दिवसांपूर्वी हलक्या पावसावर खरिपाच्या पेरण्या पूर्ण केल्या होत्या. परंतु पावसाने उघडीप दिल्यामुळे काही शेतकऱ्यांची पिके वाळली आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे़ दोन वर्षांपासून शेतकरी निसर्गाच्या कचाट्यामध्ये सापडत आहे. शासनाकडून पीक नुकसानीची भरपाईही चांगल्या प्रकारे मिळाली नसल्याने शेतकऱ्यांना आपला व्यवहार कसा करावा? असा प्रश्न पडला आहे़ यंदा खरिप हंगामातील दोन महिने उलटल्यानंतर पावसाने हलक्या स्वरुपात हजेरी लावली़ भीज पावसावर भांडेगाव परिसरातील शेतकऱ्यांनी पंधरा दिवसांपूर्वीच खरिपाची पेरणी केली़; परंतु त्यानंतर पावसाने उघडीप दिली़ त्यामुळे सोयाबीन, कापूस आदी पिके पाण्याविना सुकू लागली आहेत़ उसनवारी करून महागडे बी-बियाणे, खत वाया जाते की काय? असा प्रश्न कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना पडला आहे. शेतकऱ्यांना आता मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे़ यावर्षी पावसाचे उशिरा आगमन झाले असून पहिल्याच पावसात काही शेतकऱ्यांनी पेरणी केली. बहुतांश ठिकाणी पेरलेले बियाणे निघालेच नाही तर काही पिके पावसाअभावी करपून गेली. जामठी, भांडेगाव, साटंबा शिवारात वैजनाथ डोरले, शंकर भवर, देविदास जगताप, आनंदा घ्यार, ज्ञानेश्वर भवर, रघुनाथ घ्यार, जयाजी घ्यार, राम घ्यार, प्रभू घ्यार यांच्या शेतात पेरलेले बियाणे पाण्याअभावी उगवलेले नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. आता झालेल्या पावसाने मोठ्या आशेपोटी शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली होती; परंतु या पेरणीवरही काही शेतातील पिके पुर्णत: वाळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.