शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
2
भारताची राष्ट्रभाषा कोणती? जगासमोर कनिमोळींनी दिलेल्या उत्तराने देशाची मान उंचावली
3
हाहाकार! मणिपूरमध्ये पावसाचं थैमान; १९,८०० लोकांना पुराचा फटका, ३,३६५ घरांचं नुकसान
4
आजचे राशीभविष्य : ०३ जून २०२५; हट्टीपणा सोडून द्या, कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घ्याल
5
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
6
सातव्या आयोगातील त्रुटी दूर, पण थकबाकी नाही; सुधारित वेतनश्रेणी १ जूनपासून लागू
7
पडघा, बोरीवलीत ATSचे छापे; १२ ताब्यात; पहाटे २ ते दुपारी ४ पर्यंत सुरु होते कोम्बिंग ऑपरेशन
8
१६ तास जनावरांसारखं 'काम' अन् ३००-४०० रुपये 'दाम'; दिवसभरात एक जोडपे तोडते तब्बल २ टन ऊस
9
सिक्कीममध्ये भूस्खलनात ३ जवानांचा मृत्यू, ६ बेपत्ता; लाचेनमध्ये १०० हून अधिक लोक अडकलेले
10
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश
11
रायगडात 'नॅपकिन'वरून राजकारण तीव्र; भरत गोगावलेंनी पुन्हा सुनील तटकरेंना डिवचले
12
बफर झोनमध्ये बेकायदा इमारती; हजार कोटींच्या घोटाळ्याचा संशय; वॉचडॉग फाउंडेशनकडून चौकशीची मागणी
13
अभिनेता एजाज खानच्या अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयात उन्हाळी सुट्टीनंतर होणार सुनावणी
14
CSMT स्थानकात आता 'दिव्यांग फ्रेंडली' सुविधा; तिकीट काउंटर, पार्किंग, शौचालयांमध्ये सोय
15
रणजित कासलेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयाबाहेर सरकारविरोधात घोषणा
16
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
17
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
18
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
19
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
20
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

By admin | Updated: July 30, 2014 00:02 IST

मारोती घ्यार, भांडेगाव उशिराने का होईना, पण शेतकऱ्यांनी पेरणी केली; परंतु पावसाचे आगमन झाले नसल्याने ते वाळून गेल्याने दुबार पेरणीवरही टांगती तलवार दिसत आहे.

मारोती घ्यार, भांडेगावउशिराने का होईना, पण शेतकऱ्यांनी पेरणी केली; परंतु पावसाचे आगमन झाले नसल्याने ते वाळून गेल्याने दुबार पेरणीवरही टांगती तलवार दिसत आहे. भांडेगाव परिसरात हे चित्र निर्माण झाले आहे.हिंगोली तालुक्यातील भांडेगाव, साटंबा, जामठी परिसरात पंधरा दिवसांपूर्वी हलक्या पावसावर खरिपाच्या पेरण्या पूर्ण केल्या होत्या. परंतु पावसाने उघडीप दिल्यामुळे काही शेतकऱ्यांची पिके वाळली आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे़ दोन वर्षांपासून शेतकरी निसर्गाच्या कचाट्यामध्ये सापडत आहे. शासनाकडून पीक नुकसानीची भरपाईही चांगल्या प्रकारे मिळाली नसल्याने शेतकऱ्यांना आपला व्यवहार कसा करावा? असा प्रश्न पडला आहे़ यंदा खरिप हंगामातील दोन महिने उलटल्यानंतर पावसाने हलक्या स्वरुपात हजेरी लावली़ भीज पावसावर भांडेगाव परिसरातील शेतकऱ्यांनी पंधरा दिवसांपूर्वीच खरिपाची पेरणी केली़; परंतु त्यानंतर पावसाने उघडीप दिली़ त्यामुळे सोयाबीन, कापूस आदी पिके पाण्याविना सुकू लागली आहेत़ उसनवारी करून महागडे बी-बियाणे, खत वाया जाते की काय? असा प्रश्न कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना पडला आहे. शेतकऱ्यांना आता मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे़ यावर्षी पावसाचे उशिरा आगमन झाले असून पहिल्याच पावसात काही शेतकऱ्यांनी पेरणी केली. बहुतांश ठिकाणी पेरलेले बियाणे निघालेच नाही तर काही पिके पावसाअभावी करपून गेली. जामठी, भांडेगाव, साटंबा शिवारात वैजनाथ डोरले, शंकर भवर, देविदास जगताप, आनंदा घ्यार, ज्ञानेश्वर भवर, रघुनाथ घ्यार, जयाजी घ्यार, राम घ्यार, प्रभू घ्यार यांच्या शेतात पेरलेले बियाणे पाण्याअभावी उगवलेले नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. आता झालेल्या पावसाने मोठ्या आशेपोटी शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली होती; परंतु या पेरणीवरही काही शेतातील पिके पुर्णत: वाळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.