शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

आचारसंहितेमुळे न.प.ची सभा स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:38 IST

: येथील नगर पालिकेमध्ये शनिवारी होणारी सभा विधान परिषदेच्या आदर्श आचार संहितेमुळे तहकूब झाली. त्यामुळे तब्बल २४ कोटी रुपयांच्या निधीतून शहराच्या विकासात भर टाकणारी कामे आता एक महिना लांबणीवर गेली आहेत. तर शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेले फलकही पालिकेच्यावतीने हटविले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील नगर पालिकेमध्ये शनिवारी होणारी सभा विधान परिषदेच्या आदर्श आचार संहितेमुळे तहकूब झाली. त्यामुळे तब्बल २४ कोटी रुपयांच्या निधीतून शहराच्या विकासात भर टाकणारी कामे आता एक महिना लांबणीवर गेली आहेत. तर शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेले फलकही पालिकेच्यावतीने हटविले आहेत.परभणी - हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामध्ये हिंगोलीसह राज्यातील ६ विधान परिषदेच्या सदस्यांची निवडणूक जाहीर केली. त्यामुळे या निवडणुकीची आचार संहिता २१ एप्रिल पासूल लागू करण्यात आली आहे. या निवडणूक प्रक्रियेमुळे शनिवारी होणारी पालिकेची सभा तहकूब करण्यात आल्याचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी सांगितले. सभेस नगराध्यक्ष व सन्माननीय नगरसेवकांची उपस्थिती होती. सभेमध्ये २५ कोटी रुपयाच्या निधीतून शहरात करण्यात येणाऱ्या कामांचे ठराव मान्य केले जाणार होते. शिवाय, शहरातील विविध विकास कामावरही नगरसेवक चर्चा करणार होते. यासाठी सर्वच नगरसेवक तयारीत असताना अचानक आचारसंहिता लागू झाल्याचे माहित होताच सर्वच प्रश्न अनुत्तरित राहिले. आता आचारसंहिता संपेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. आदर्श आचार संहिता लागू झाल्यामुळे शहरातील काना कोपºयातील विविध पक्षांचे झेंडे, पोस्टर बॅनर हटविण्यात आले. तर शहरातील सिद्धार्थ नगर येथे बॅनर हटविण्यावरुन काही काळ वाद झाला होता. मात्र घटनास्थळी पोलीस कर्मचारी दाखल झाल्याने पुढील वाद टळला. शहरातील बॅनर काढण्यासाठी आता पालिका सज्ज झाली असून, आचारसंहितेच्या काळात एकही बॅनर दिसणार नाही. तर या कालावधीत कोणी बॅनर लावण्याचा प्रयत्न केला तर संबंधितांविरुद्ध आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे सीओ पाटील यांनी सांगितले.पालिकेच्या सभेची नागरिकांसह नगरसेवकांना प्रतीक्षा लागली होती. ती वेळ आलीही होती मात्र अचानक लागलेल्या आचार संहितेमुळे अनेक विषय जसेच्या तसेच राहिले. विशेष करुन कोट्यवधी रुपयाचा निधीचे जराही नियोजन लागले नसल्याने आता नियोजनासाठी नगरसेवकांसह नागरिका-चे पुढील सभेकडे लक्ष लागले आहे. मतमोजणी झाल्यानंतरच पालिकेच्या सभेचे नियोजन लागणार आहे. तर जिल्हा दौºयावर भूमिपूजनासाठी येणारे पालकमंत्री दिलीप कांबळे यांचाही दौरा आचारसंहितेमुळे रद्द होण्याची चिन्हे आहेत.शनिवारी होणाºया पालिकेच्या सभेमध्ये अनेक मुद्दे गाजणार असल्याचा गाजावाजा झाला होता. त्यामुळे अनेक जण या सभेसाठी आवर्जून उपस्थित होते. मात्र त्यांचीही निराशा झाली.

टॅग्स :Hingoliहिंगोली