शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

रेशनधान्य देत नाही, म्हणून दुकानदारच बदलून टाकला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:34 IST

हिंगोली : तालुक्यातील २५ रेशन लाभार्थ्यांनी रेशन दुकानदार वेळेवर धान्य देत नसल्याच्या वा इतर कारणावरून दुकानदारच बदलला आहे. हिंगोली ...

हिंगोली : तालुक्यातील २५ रेशन लाभार्थ्यांनी रेशन दुकानदार वेळेवर धान्य देत नसल्याच्या वा इतर कारणावरून दुकानदारच बदलला आहे. हिंगोली तालुक्यातील हे चित्र असले, तरी जिल्ह्यातही अशा तक्रारी असल्याचे समोर आले आहे. मात्र, दुकानदार बदलूनही लाभार्थ्यांना दुसऱ्या दुकानातून धान्य मिळण्यास दोन महिने वाट पाहावी लागत आहे.

जिल्ह्यात पुरवठा विभागाच्या वतीने गरजूंना स्वस्त दरात धान्य उपलब्ध व्हावे, यासाठी रेशन दुकानदारांमार्फत धान्य पुरविले जाते. यात दारिद्र्य रेषेखालील लाभार्थींसह, प्राधान्य कुटुंबातील सदस्य, शेतकरी कुटुंबातील सदस्यांसह पात्र लाभार्थ्यांना रेशन उपलब्ध करून दिले जाते. कोरोनामुळे तर शासनाने नोव्हेंबरपर्यंत मोफत अन्नधान्य पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. रेशनचे धान्य घेण्यासाठी इ-पॉस मशीनवर अंगठा लावला लागत असला, तरी अनेक दुकानदार धान्य वेळेवर देत नसल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. वेळेवर धान्य मिळत नसल्याने, तसेच इतर कारणांनी लाभार्थी रेशन दुकानच बदलत आहेत. हिंगोली तालुक्यात जवळपास २५ लाभार्थींनी असे अर्ज तहसीलच्या पुरवठा विभागाकडे सादर केले आहेत.

शहरात जास्त बदल

ग्रामीण भागात एक किंवा जास्तीतजास्त दोन रेशन दुकाने आहेत. या दुकानांमार्फत अन्नधान्य पुरविले जाते. त्यामुळे अशा ठिकाणी रेशनचे दुकान बदलण्याच्या भानगडीत लाभार्थी पडत नाहीत. मात्र, शहरातील लाभार्थी दुकान बदलून देण्यासाठी पुरवठा विभागाकडे तगादा लावत आहेत. सध्याच्या काळात रेशनदुकानदार बदलावयाचे झाल्यास पुर्ण प्रक्रीया होण्यासाठी किमान दोन महिने लागत असल्याचे सांगण्यात आले. यात लाभार्थ्यांना दोन महिने लाभापासून मुकावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दुकानदार बदलून घेण्यासाठी आलेले लाभार्थी पुन्हा परत जात आहेत.

नोव्हेंबरपर्यंत मिळणार मोफत धान्य

कोरोना काळात सर्वच क्षेत्राला फटका बसला आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग कमी होत असला, तरी परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी काही वेळ लागणार आहे. या काळात लाभार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गंत जुलै ते नोव्हेंबर, २०२१ पर्यंत पात्र लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्ह्यातील एकूण रेशन कार्डधारक - १,८८,८७३

अंत्योदय -२६,३५९

अन्नसुरक्षा - १,३१,८३८

शेतकरी - ३०,७७६

हिंगोली तालुक्यात दुकानदार बदलला - २५