शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

फसवणूक प्रकरणात ठाणे येथील तिघांनी दिली कागदपत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:20 IST

हिंगोली : नोकरीचे अमिष दाखवून तरुणांना फसविणाऱ्या टोळीला देशातील विविध भागांतून ताब्यात घेतल्यानंतर त्यांना पोलीस कोठडी मिळाली आहे. या ...

हिंगोली : नोकरीचे अमिष दाखवून तरुणांना फसविणाऱ्या टोळीला देशातील विविध भागांतून ताब्यात घेतल्यानंतर त्यांना पोलीस कोठडी मिळाली आहे. या प्रकरणाची व्याप्ती वाढत असून आखणी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, ठाणे, मुंबई येथील फसवणूक झालेल्या दहा जणांनी वसमत शहर पोलिसांशी संपर्क साधला आहे. त्यातील ३ मुली व एका मुलाने सोमवारी पोलिसांकडे विविध कागदपत्रे सुपूर्द केली आहेत.

रेल्वे विभागात नोकरी लावतो, असे अमिष दाखवून दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संतोष सरोज (रा. बोडेपूर, उत्तर प्रदेश) याच्या विरुद्ध वसमत शहर पोलीस ठाण्यात १३ मे रोजी गुन्हा नोंद झाला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व वसमत शहर पोलिसांनी देशभरातील विविध ठिकाणावरून मुख्य सूत्रधारासह आठजण जणांना ताब्यात घेतले. सध्या आरोपी पोलीस कोठडीत आहेत. पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे, उपनिरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड तपास करत आहेत. आरोपींकडून तपासात नवनवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणात आखणी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, फसवणूक झालेले तरुण वसमत शहर पोलिसांशी संपर्क साधत असून आतापर्यंत १५ जणांनी फसवणूक झाल्याचे पोलिसांना सांगितले. त्यातील ठाणे येथील २ मुली व १ मुलाने सोमवारी वसमत शहर पोलीस ठाणे गाठून विविध कागदपत्रे सादर केली तसेच मंगळवारी आणखी १० जण मुंबई येथून येणार आहेत. फसवणूक झालेल्या तरूणांच्या कागदपत्रांमुळेही तपासात काही बाबी स्पष्ट होणार असल्याचे सूत्राने सांगितले.