शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

तिसऱ्या लाटेत लहान मुलांसाठी डॉक्टर, औषधीसाठी नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:31 IST

कोरोनाच्या पहिल्या लाटेत केलेल्या योग्य नियोजनामुळे दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेकडे आवश्यक संख्येत बेड व मनुष्यबळ उपलब्ध असल्याने जिल्ह्याला ...

कोरोनाच्या पहिल्या लाटेत केलेल्या योग्य नियोजनामुळे दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेकडे आवश्यक संख्येत बेड व मनुष्यबळ उपलब्ध असल्याने जिल्ह्याला या संकटाचा सामना करता आला. तरीही अचानक मोठ्या प्रमाणात वाढलेल्या रुग्णसंख्येने नाकीनऊ आले होते. नव्याने व गतिमान पद्धतीने काही ठिकाणचे कोविड सेंटर उभारण्याची वेळ आली होती. आता दुसरी लाट कमी होत चालली आहे. सततच्या संचारबंदीमुळे व नागरिकांनी कोराेनाचे नियम पाळण्यास प्रारंभ केल्याने हे परिणाम दिसू लागले आहेत. मात्र तरीही धोका अजून टळला नाही. कोरोनाचा स्ट्रेन दिवसेंदिवस घातक बनत चालला आहे. नवी गुंतागुंत निर्माण करणारा ठरत आहे. या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेत ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशी परिस्थिती उद्भवल्यास जिल्ह्याची तयारी असावी, यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी नियोजनासाठी आढावा बैठक घेतली.

हिंगोली जिल्हा रुग्णालयात ५० खाटांचे स्वतंत्र बाल कोविड सेंटर उभारले आहे. मात्र इतर तालुक्यांतही अशाप्रकारचे नियोजन करण्यास त्यांनी सांगितले आहे. यासाठी लहान मुलांना लागणारे वेगळे व्हेंटिलेटर, ऑक्सिजन मास्क, औषधी आदींबाबत सूचना दिल्या. त्याचबरोबर लहान मुलांची काळजी घेण्यासाठी अधिक संवेदनशील व संख्येने स्टाफ, नर्सची आवश्यकता पडणार आहे. त्याचेही नियाेजन करण्यास सांगितले. जिल्ह्यात सध्या उपलब्ध असलेल्या बालरोग तज्ज्ञांशिवाय आणखी काही मिळविता आल्यास त्या दृष्टीने ही प्रयत्न करण्यास सांगण्यात आले.