शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

खेडेगावात डॉक्टर देता का डाॅक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:20 IST

हिंगोली : शासनाने कोरोना महामारीच्या काळात कोणत्याही रुग्णाला अडचण येऊ नये म्हणून कंत्राटी तत्त्वावर ‘एमबीबीएस’ डॉक्टरांची नियुक्ती केली होती. ...

हिंगोली : शासनाने कोरोना महामारीच्या काळात कोणत्याही रुग्णाला अडचण येऊ नये म्हणून कंत्राटी तत्त्वावर ‘एमबीबीएस’ डॉक्टरांची नियुक्ती केली होती. परंतु, खेडेगावात काम करण्याची इच्छा होत नसल्याने अनेकांनी हळूहळू नियोजित ठिकाणी जाण्याचे टाळल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. ज्यांचा नऊ महिन्यांचा करार संपला आहे, अशा ठिकाणी शासनाने आता एक वर्षाची ऑर्डर देऊन २७ जणांची नियुक्ती केली आहे.

२३ मार्च २०२० पासून कोरोना महामारीने सळो की पळो करून सोडले होते. कोरोनाकाळात कोणत्याही रुग्णांची गैरसोय होऊ नये, रुग्णांना सेवा वेळेच्यावेळी मिळावी म्हणून शासनाने मार्च महिन्यात जवळपास ३० कंत्राटी डॉक्टरांची नियुक्ती केली होती. कोरोनाकाळात ग्रामीण भागात १८ जणांची नियुक्ती केली होती. त्यापैकी त्यावेळी सर्व १८ जण हजर झाले. तर, शहरी भागात १२ जणांची नियुक्ती केली. त्यावेळी १२ जण हजर झाले होते. शहरी भागातील ९ जणांनी नोकरी सोडल्यामुळे आता ३ कंत्राटी डॉक्टर कार्यरत आहेत. त्यावेळी या सर्वांना ९ महिन्यांची ऑर्डर देण्यात आली होती. आजमितीस जिल्ह्यात बंधपत्रित २१, अस्थायी ५ आणि नियमित डॉक्टर हे ३५ आहेत. २७ डॉक्टरांना एक वर्षाची ऑर्डर देण्यात आलेली आहे. परंतु, आम्हाला कायमस्वरूपी सेवेत कायम करावे, अशी त्यांची मागणी आहे. खेडेगावात जाण्यास अनेक डॉक्टर हे टाळत आहेत. त्यामुळे खेडेगावात डॉक्टर देता का डॉक्टर? म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

प्रतिक्रिया

एक जागा रिक्त

जिल्ह्यातील कळमनुरी येथील तालुका आरोग्य रुग्णालयात आजमितीस एक जागा रिक्त आहे. सध्या तरी शासनाने या जागेबाबत काही सूचना केली नाही. आरोग्य विभागाने या जागेबाबत शासनाकडे पाठपुरावा केला आहे. शासनाची सूचना आल्यास कळमनुरीची जागा भरण्यात येईल, असे आरोग्य विभागाने सांगितले.

कारणे काय...

ग्रामीण भागात नोकरी करायची म्हटले की, अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ना राहण्याची सोय, ना जेवणाची सोय. सर्वच बाबतीत आबाळ होते, असे कंत्राटी डॉक्टरांचे म्हणणे आहे. शासन मानधन स्वरूपात पगार देत आहे. परंतु, दैनंदिन सोयीसुविधा या ग्रामीण भागात मिळत नाहीत. शहरापासून एखादे गाव जवळ असले की, आम्ही रात्रीला शहरात असलेल्या घरी येेतो आणि नंतर नोकरीवर जातो.

व्यवस्थापन आहे पण अडचण कोण जाणणार?

शासनाने कोरोनाकाळात ७५ हजार रुपयांच्या मानधनावर नोकरी दिली. या काळात आम्ही रुग्णांची चांगली सेवा केली. परंतु, नऊ महिन्यांची ऑर्डर दिल्यामुळे आम्ही नाराज आहोत. अडचणीच्या काळात आम्ही साथ दिली आहे. आता शासनाने आम्हाला कायमस्वरूपी सेवेत घ्यावे, असे वाटते. परंतु, शासनाने आमचा काहीही विचार केला नाही, असे एका डॉक्टरने सांगितले.

कोरोनाच्या काळात जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा केली. शासनाने आमचे काम पाहून आम्हाला कायमस्वरूपी ऑर्डर द्यायला पाहिजे होती. परंतु, काहींना कमी करून, काहींना बंधपत्रित (एक वर्षाची) ऑर्डर देऊन सेवेत घेतले आहे. ज्यांना सेवेत घेतले आहे, त्याबद्दल आम्हाला काही हेवा वाटत नाही. परंतु, काम पडले की, बोलवायचे अन्‌ नंतर हाकलून द्यायचे, हे मात्र शासनाने करायला नको होते.

कोरोनाच्या काळात जवळपास ३० कंत्राटी डॉक्टरांची नियुक्ती केली होती. शासन ज्याप्रमाणे सूचना देईल, त्याप्रमाणे आरोग्य विभागातील पदे ही भरली जातील. आजमितीस शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात २७ ‘एमबीबीएस’ डॉक्टरांची एक वर्षासाठी (बंधपत्रित) नियुक्ती केली.

- डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली

कोरोनाकाळात एकूण नियुक्त्या ३०

शहरी भागातील नियुक्त्या १२

हजर झाले किती १२

ग्रामीण भागातील नियुक्त्या- १८

हजर झाले किती १८