शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
2
ब्रिटिशांचे एफ-35बी लढाऊ विमान केरळमध्ये अडकलेले; भारतावरही २१ वर्षांपूर्वी अशीच वेळ आलेली...
3
चीनच्या 'मच्छर'नंतर आता 'झुरळ' बनणार युद्धभूमीतलं नवं शस्त्र; 'या' देशानं बनवला खतरनाक प्लॅन
4
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
5
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
6
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
7
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
8
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
9
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
10
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
11
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
12
उंच गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बांधणे शक्य आहे का? हायकोर्टाने सरकारकडे मागितली माहिती
13
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
14
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
15
संपादकीय : विरोधकांशी बोलणार कोण? विरोधकांच्या प्रश्नांवर सरकारची चुप्पी आणि संसदीय कोंडी
16
जशी नोटाबंदी, टाळेबंदी.. तशीच नवी ‘व्होटबंदी’! निवडणूक आयोगाच्या नव्या मतदार यादी मोहिमेचे विच्छेदन
17
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
18
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
19
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
20
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...

जिल्हा कोरोनामुक्त झाला; इतर आजारांवरील शस्त्रक्रिया करायची कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:27 IST

हिंगोली : कोरोना महामारी संपली असून, हिंगोली जिल्हा कोरोनामुक्तही झाला आहे. कोरोनाकाळातही अत्यावश्यक शस्त्रक्रिया केल्या असून नियमित शस्त्रक्रिया जिल्हा ...

हिंगोली : कोरोना महामारी संपली असून, हिंगोली जिल्हा कोरोनामुक्तही झाला आहे. कोरोनाकाळातही अत्यावश्यक शस्त्रक्रिया केल्या असून नियमित शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालयात सद्य:स्थितीत सुरू असल्याचे सांगण्यात आले.

बाप्पांच्या आगमनापूर्वीच म्हणजे ९ सप्टेंबर रोजी हिंगोली जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. जिल्हा कोरोनामुक्त झाला असला तरी, नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी सामाजिक अंतर ठेवत मास्कचा वापर करून खरेदी करावी. सध्या सण, उत्सवाचे दिवस असल्यामुळे बाजारात खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळत आहे. बाजारातून घरी गेल्यानंतर सॅनिटायझरने किंवा साबणाने हातपाय स्वच्छ धुणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. कोरोना महामारी संपली म्हणून स्वच्छतेकडे कानाडोळा कोणीही करू नये, असेही आवाहन जिल्हा रुग्णालयाने केले आहे.

- अत्यावश्यक शस्त्रक्रिया...

कोरोना महामारीतही अत्यावश्यक शस्त्रक्रिया केल्या आहेत. आजमितीस जिल्हा रुग्णालयात नियमित शस्त्रक्रिया सुरू असल्याचे जिल्हा रुग्णालयातून सांगण्यात आले.

शस्त्रक्रियेसाठी वाट पाहावी लागणार नाही...

जिल्हा रुग्णालयात नियमित शस्त्रक्रिया सुरू असून रुग्णाला शस्त्रक्रियेसाठी वाट पाहावी लागणार नाही. कोणत्याही वेळी शस्त्रक्रिया केली जाईल. शस्त्रक्रियेसाठी तज्ज्ञ डॉक्टरांना पाचारण केले जाते.

- नागरिकांनी घ्यावी काळजी...

मागच्या पंधरा दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. सर्दी, खोकला, ताप, डेंग्यू अशा आजाराचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. तेव्हा घराच्या आसपास स्वच्छता ठेवावी. घराच्या आसपास पाणी साचू देऊ नये. अस्वच्छतेमुळे गंभीर आजाराला सामोरे जावे लागते.

- शस्त्रक्रिया नियमित...

जिल्हा रुग्णालयात नियमित शस्त्रक्रिया सुरू आहेत. या वेळी तज्ज्ञ डॉक्टरांना पाचारण करून त्यांची मदतही घेतली जात आहे. रुग्णांची देखभालही योग्य पद्धतीने केली जात आहे.

- डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक

कोरोनाचे एकूण रुग्ण १६०२९

बरे झालेले रुग्ण १५६३७

एकूण कोरोना बळी ३९२

सध्या उपचार सुरू असलेले ००