शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
4
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
5
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
6
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
8
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
9
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
10
घटस्फोटाच्या चर्चा, चतुर्थीला नववधूसारखी नटली ही अभिनेत्री, एकटीनेच केली बाप्पाची पूजा
11
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
12
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
13
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
14
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
15
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
16
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
17
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
18
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
19
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
20
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

हिंगोलीमध्ये नोेंदणी केलेल्यांचे चुकारे वाटप सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 11:08 IST

नाफेडच्या केंद्रावर हमीभावाने खरेदी केलेल्या मालाचे चुकारे मिळत नसल्याने मागील दोन-तीन महिन्यांपासून चिंताग्रस्त शेतकºयांसाठी शुभवर्तमान आहे. ज्यांनी आधी नोंदणी करून माल विक्री केंद्रावर दिला अशांचे चुकारे तत्काळ वाटप केले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिली.

हिंगोली : नाफेडच्या केंद्रावर हमीभावाने खरेदी केलेल्या मालाचे चुकारे मिळत नसल्याने मागील दोन-तीन महिन्यांपासून चिंताग्रस्त शेतक-यांसाठी शुभवर्तमान आहे. ज्यांनी आधी नोंदणी करून माल विक्री केंद्रावर दिला अशांचे चुकारे तत्काळ वाटप केले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून जिल्हाभरात उडीद, मूग, सोयाबीनच्या चुकाºयांचा प्रश्न गाजत आहे. अनेक शेतक-यांनी माल विकल्यानंतरही त्यांना त्याचे पैसे मिळाले नाहीत. हिंगोली येथील हमी भाव केंद्रावर झालेल्या अनियमिततेचा सरसकट सर्वच शेतक-यांना फटका बसत होता. यातही पणनच्या अधिकाºयांनी केलेल्या तपासणीत १0६६ शेतक-यांपैकी केवळ मोजकेच शेतकरी रक्कम अदा करण्यास पात्र ठरत होते. त्यामुळे तर पेच वाढण्याची भीती होती. त्यानंतर या गंभीर प्रश्नात जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी लक्ष घातले. पणनच्या संचालक मेरीनिलिमा केरकट्टी यांच्याशी भंडारी यांनी चर्चा केली. त्यात ज्यांनी नोंदणी केली व ज्यांचा माल मोजणी करून वखार महामंडळाच्या गोदामात पोहोचला अशा सर्व शेतक-यांना चुकारे देण्यात यावे, असा मार्ग काढण्यात आला. तर नोंदणीच न केलेले जवळपास ३५0 शेतकरी आहेत. मात्र अशांचा माल मोजणी करून गोदामात पोहोचला असल्यास अशांनाही रक्कम मिळणार आहे.

जवळपास दीडशे शेतकरी असे नोंदणी न करता मोजणी झालेले मात्र मालही गोदामात न गेलेले निघण्याची शक्यता आहे. अशांच्या चुका-याचा प्रश्न निर्माण होवू शकतो.एकूण ३८१६ क्ंिवटल उडीद व १६१९ किलो मूग नाफेडने खरेदी केला होता. त्यातही जिल्ह्यात ज्या तालुक्याची सर्वाधिक उत्पादकता त्यानुसार खरेदीपर्यंत निकष शिथिल केला होता.तरीही हा प्रश्न पूर्णपणे सुटत नसल्याने भंडारी यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे शेवटी चुकारे वाटपाचा मार्ग मोकळा झाला.

चुका ग्राह्य धरल्याने दिलासाशेतक-यांना नोंदणी करण्याच्या सूचना दिल्यानंतर त्यात चुका झाल्या. कर्मचाºयांनाही योग्य प्रशिक्षण नव्हते. त्यामुळे रीतसर खरेदी प्रक्रियेला सामोरे गेलेल्याही अनेक शेतकºयांचे नुकसान होवू शकते, ही बाब शासनाच्या निदर्शनास आली. त्यामुळे अशा काहींना पुन्हा नोंदणी केल्यानंतरच त्यांच्या मालाचा विचार होणार असल्याचेही सांगितले जात आहे. तूर्ततरी ज्यांची रीतसर विक्री त्यांचे चुकारे मिळणार आहेत.