शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

हिंगोलीमध्ये नोेंदणी केलेल्यांचे चुकारे वाटप सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 11:08 IST

नाफेडच्या केंद्रावर हमीभावाने खरेदी केलेल्या मालाचे चुकारे मिळत नसल्याने मागील दोन-तीन महिन्यांपासून चिंताग्रस्त शेतकºयांसाठी शुभवर्तमान आहे. ज्यांनी आधी नोंदणी करून माल विक्री केंद्रावर दिला अशांचे चुकारे तत्काळ वाटप केले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिली.

हिंगोली : नाफेडच्या केंद्रावर हमीभावाने खरेदी केलेल्या मालाचे चुकारे मिळत नसल्याने मागील दोन-तीन महिन्यांपासून चिंताग्रस्त शेतक-यांसाठी शुभवर्तमान आहे. ज्यांनी आधी नोंदणी करून माल विक्री केंद्रावर दिला अशांचे चुकारे तत्काळ वाटप केले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून जिल्हाभरात उडीद, मूग, सोयाबीनच्या चुकाºयांचा प्रश्न गाजत आहे. अनेक शेतक-यांनी माल विकल्यानंतरही त्यांना त्याचे पैसे मिळाले नाहीत. हिंगोली येथील हमी भाव केंद्रावर झालेल्या अनियमिततेचा सरसकट सर्वच शेतक-यांना फटका बसत होता. यातही पणनच्या अधिकाºयांनी केलेल्या तपासणीत १0६६ शेतक-यांपैकी केवळ मोजकेच शेतकरी रक्कम अदा करण्यास पात्र ठरत होते. त्यामुळे तर पेच वाढण्याची भीती होती. त्यानंतर या गंभीर प्रश्नात जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी लक्ष घातले. पणनच्या संचालक मेरीनिलिमा केरकट्टी यांच्याशी भंडारी यांनी चर्चा केली. त्यात ज्यांनी नोंदणी केली व ज्यांचा माल मोजणी करून वखार महामंडळाच्या गोदामात पोहोचला अशा सर्व शेतक-यांना चुकारे देण्यात यावे, असा मार्ग काढण्यात आला. तर नोंदणीच न केलेले जवळपास ३५0 शेतकरी आहेत. मात्र अशांचा माल मोजणी करून गोदामात पोहोचला असल्यास अशांनाही रक्कम मिळणार आहे.

जवळपास दीडशे शेतकरी असे नोंदणी न करता मोजणी झालेले मात्र मालही गोदामात न गेलेले निघण्याची शक्यता आहे. अशांच्या चुका-याचा प्रश्न निर्माण होवू शकतो.एकूण ३८१६ क्ंिवटल उडीद व १६१९ किलो मूग नाफेडने खरेदी केला होता. त्यातही जिल्ह्यात ज्या तालुक्याची सर्वाधिक उत्पादकता त्यानुसार खरेदीपर्यंत निकष शिथिल केला होता.तरीही हा प्रश्न पूर्णपणे सुटत नसल्याने भंडारी यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे शेवटी चुकारे वाटपाचा मार्ग मोकळा झाला.

चुका ग्राह्य धरल्याने दिलासाशेतक-यांना नोंदणी करण्याच्या सूचना दिल्यानंतर त्यात चुका झाल्या. कर्मचाºयांनाही योग्य प्रशिक्षण नव्हते. त्यामुळे रीतसर खरेदी प्रक्रियेला सामोरे गेलेल्याही अनेक शेतकºयांचे नुकसान होवू शकते, ही बाब शासनाच्या निदर्शनास आली. त्यामुळे अशा काहींना पुन्हा नोंदणी केल्यानंतरच त्यांच्या मालाचा विचार होणार असल्याचेही सांगितले जात आहे. तूर्ततरी ज्यांची रीतसर विक्री त्यांचे चुकारे मिळणार आहेत.