शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली डीपीसीच्या बैठकीत दुष्काळावरील चर्चा गाजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:58 IST

जिल्हा वार्षिक योजनेच्या १७१ कोटी ४१ लाखांच्या प्रारुप आराखड्यास नियोजन समितीच्या बैठकीत १३ जानेवारी रोजी पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली मान्यता देण्यात आली. मात्र यावेळी सदस्यांनी दुष्काळावरून प्रशासन व मंत्र्यांना घेरत चांगलेच धारेवर धरले.

हिंगोली : जिल्हा वार्षिक योजनेच्या १७१ कोटी ४१ लाखांच्या प्रारुप आराखड्यास नियोजन समितीच्या बैठकीत १३ जानेवारी रोजी पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली मान्यता देण्यात आली. मात्र यावेळी सदस्यांनी दुष्काळावरून प्रशासन व मंत्र्यांना घेरत चांगलेच धारेवर धरले.नियोजन समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीस जि. प. अध्यक्षा शिवराणी नरवाडे, खा. राजीव सातव, आ. तान्हाजी मुटकुळे, आ. डॉ. जयप्रकाश मुंदडा, आ. डॉ. संतोष टारफे, आ. रामराव वडकुते, आ. विप्लव बजोरिया, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, सीईओ एच.पी. तुम्मोड, पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार आदी उपस्थित होते.यावेळी खा.सातव, आ.मुटकुळे, आ.वडकुते यांनी दुष्काळाच्या मुद्यावरून रान उठविले. खरोखर दुष्काळ असतानाही दुष्काळ का जाहीर होत नाही, असा सवाल केला. त्यावर प्रस्ताव पाठविल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. तर आणेवारी जास्त दाखविल्यावर विमा कसा मिळेल, असा सवाल केल्यावर इतर निकष पूर्ण होत असल्याने पीकविमा मिळेल असे जयवंशी यांनी सांगितले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी दुष्काळ जाहीर करून उपायही होतील, असे सांगितले.२०१९-२० अंतर्गत सर्वसाधारण वार्षिक योजनाकरीता ९८ कोटी ७४ लाख तर अनुसूचित जाती उपयोजनेत ५० कोटी ४७ लाख आणि अनुसूचित जमाती उपयोजनेतंर्गत २२ कोटी २० लाख ९ हजार एकूण १७१ कोटी ४१ लाख ९ हजार खर्चाच्या प्रारुप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता दिली. जिल्हा वार्षिक योजना २०१८-१९ अंतर्गत डिसेंबर २०१८ अखेर झालेल्या खर्चाचाही आढावा घेतला. सर्वसाधारण योजनेअंतर्गत ४० कोटी ८२ लाख रुपये तर अनुसूचित जाती उपयोजनेतंर्गत १५ कोटी ७९ लाख रुपये खर्च झाला.अनुसूचित जमाती आदिवासी उपयोजनेंतर्गत १९ कोटी ९ लाख रुपये खर्च झाला आहे. यंदाच्या आराखड्यात गतवर्षीपेक्षा कमी निधी का मंजूर झाला, असा सवाल खा.सातव यांनी केला. यावेळी जि.प. सदस्य अंकुश आहेर, आखरे, मुंडे यांनी रस्ते, शाळा व उपकेंद्रांसाठी वाढीव निधीची मागणी केली. खासदार, आमदारांनीही आग्रह धरल्याने पालकमंत्र्यांनी होकार दिला. तर खा.सातव, आ.मुटकुळे यांनी महावितरणला पाच कोटी रुपयांचा जास्तीचा निधी देऊन डीपींची समस्या सोडविण्याची मागणी केली. त्याला होकार मिळाला. डॉ.अशोक बेलखोडे यांनी आरोग्य उपकेंद्रातील बाळंत कक्ष व आदर्श अंगणवाड्यांचे मॉडेल उभारण्याची मागणी केली.बैठकीस नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी, समाज कल्याण आयुक्त भाऊराव चव्हाण, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विशाल राठोड यांच्यासह पहिल्यांदाच अशासकीय सदस्यांची उपस्थिती असल्याचे दिसून आले. या सदस्यांचा यावेळी रोपटे देऊन सत्कारही करण्यात आला....तर गटशिक्षणाधिकारी निलंबित कराडॉ.सतीश पाचपुते यांनी जिल्ह्यात स्थलांतरित मजुरांच्या पाल्यांसाठी हंगामी वसतिगृह सुरू झाले नसल्याचा मुद्दा मांडला. यावर गटशिक्षणाधिकारी प्रस्ताव पाठवत नसल्याचे शिक्षणाधिकारी म्हणाले. जर बीईओंनी दिरंगाई केली तर निलंबनाचा आदेश पालकमंत्र्यांनी दिला. शिवाय जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: यात आढावा घेऊन प्रश्न निकाली काढू, असे सांगितले.सातवांची गांधीगिरीनियोजन विभागाच्या नियोजनशून्यतेमुळे खा.राजीव सातव यांनाच मंचावर बसायला जागा नव्हती. सातव उशिराने आल्यानंतर अशी व्यवस्था होण्याची चिन्हे दिसत नसल्याने ते थेट समोर सदस्यांसमवेत जावून बसले. नंतर त्यांना जागा दिली. शिवाय पत्रकारांसह इतरांना बाहेर जाण्याची नियोजन अधिकाºयांची विनंती भाजप व सेना कार्यकर्त्यांनी धुडकावत सभागृह सोडले नाही. त्यामुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीHingoli z pहिंगोली जिल्हा परिषद