शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
4
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
5
मतचोरीविरोधात काँग्रेसची "वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ" स्वाक्षरी मोहीम 
6
TCS, इन्फोसिससह टॉप IT कंपन्यांचे शेअर्स २६% पर्यंत कोसळले; ७ महिन्यांत कोट्यवधी रुपये पाण्यात; कारण आलं समोर
7
क्रूझ कंट्रोल, ३६०-डिग्री कॅमेरा... जे नव्हते तेच आणले...! Citroen C3X लाँच झाली, १५ नवीन इंटेलिजंट फिचर्स...
8
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
9
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
10
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
11
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
12
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
13
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
14
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
15
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
16
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
17
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
18
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
19
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
20
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...

तंटामुक्त गाव योजनेला लागली घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:22 IST

शेवाळा : महात्मा गांधी तंटामुक्त गाव याेजनेच्या माध्यमातून गावस्तरावरच तंटे साेडवित गावात सलाेख्याचे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. ...

शेवाळा : महात्मा गांधी तंटामुक्त गाव याेजनेच्या माध्यमातून गावस्तरावरच तंटे साेडवित गावात सलाेख्याचे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. मात्र, माेहिमेच्या तेराव्या वर्षांत या याेजनेला घरघर लागल्याचे दिसून येत आहे.

गावातील लहान तंटे गावातच मिटवून गावकऱ्यांचा पैसा व वेळ वाचविण्यासाठी माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पुढाकारातून १५ ऑगस्ट २००७ पासून राज्यात कार्यान्वित असलेल्या या बहुआगामी योजनेला युती सरकारमध्ये घरघर लागली होती. परंतु, महाविकास आघाडीत तरी या योजनेला नवसंजीवनी मिळण्याच्या प्रतीक्षेतील ही योजना गावखेड्यापासून दूर होत चालली आहे. यामुळे गावागावांत तंटमुक्ती समित्यांची नीट बसलेली घडी विस्कळीत झाली आहे. मध्यंतरीच्या काळात गाव समिती अध्यक्षपदासाठी राजकीय रस्सीखेचही अनेक ठिकाणी पहावयास मिळाली. विशेष म्हणजे, गृह विभाग राष्ट्रवादी काँग्रेसच्याच वाट्याला आल्याने मरगळलेल्या या योजनेला चालना मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांना होती. मात्र, तसे होताना दिसत नाही. परिणामी, मार्गदर्शनाचा अभाव व राजकारणाचा शिरकाव यामुळे पुढील वर्षात मोहिमेचे विसर्जन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मागील दहा वर्षांच्या काळात गृहविभागाने एकही नवीन परिपत्रक या योजनेची कार्यक्षमता वाढविण्याबाबत काढले नाही, हे विशेष. तसेच पुरस्कारही रखडले आहेत. पुरस्कार रकमेच्या विनियोगातून पुरस्कारप्राप्त गावांनी विविध विकासकामेही केली. परंतु, कामातील सातत्य जास्त काळ टिकले नाही. अनेक गावात तंटामुक्त मोहिमेने सुरुवातीचे पाच वर्षे वगळता नंतर नांगी टाकली आहे. त्यामुळे खेड्यापाड्यातील लहान वादविवाद आता पुन्हा पोलीस ठाणे गाठत आहे. आता या योजनेकडे झालेले दुर्लक्ष पुन्हा एकदा लहान - मोठ्या तंट्यांना जन्म देत आहेत. गावात या तंट्यांना सोडविण्यात येत नसल्याने आता पुन्हा नागरिक पोलीस ठाण्यात धाव घेत आहेत. ग्रामीण भागात गावगावांत भांडणतंटेही वाढत आहेत. त्यामुळे या योजनेला पुन्हा एकदा सक्रिय करणे गरजेचे झाले आहे.