शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लश्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
4
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
5
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
6
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
7
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
8
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
9
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
10
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
11
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
12
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
13
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
14
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
15
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
16
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
17
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
18
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
19
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
20
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...

विहिरींच्या निधीवर झाली कृषी समितीत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 23:57 IST

जि.प.च्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाºया विशेष घटक व आदिवासी उपायोजनेतील सिंचन विहिरी योजनेत जवळपास पाच कोटी ७0 लाख रुपये एवढ्या निधीची गरज असून तो न मिळाल्यास जवळपास शंभर ते दीडशे विहिरींची कामे धोक्यात येणार असल्याने यावर चर्चा करण्यात आली. हा निधी शासनाने उपलब्ध करून द्यावा, यासाठी पत्रव्यवहार करण्यास सांगण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जि.प.च्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाºया विशेष घटक व आदिवासी उपायोजनेतील सिंचन विहिरी योजनेत जवळपास पाच कोटी ७0 लाख रुपये एवढ्या निधीची गरज असून तो न मिळाल्यास जवळपास शंभर ते दीडशे विहिरींची कामे धोक्यात येणार असल्याने यावर चर्चा करण्यात आली. हा निधी शासनाने उपलब्ध करून द्यावा, यासाठी पत्रव्यवहार करण्यास सांगण्यात आले.कृषी सभापती प्रल्हाद राखोंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कृषी समितीच्या बैठकीस सदस्य डॉ.सतीश पाचपुते, फकिरा मुंडे, पं.स. सभापती भीमराव भगत, विलास काठमोडे जिल्हा कृषी विकास अधिकारी डुब्बल यांची उपस्थिती होती. यावेळी डुब्बल यांना विशेष घटक योजनेबाबत विचारणा केली असता त्यांनी सदस्यांसमोर आढावा मांडला. त्यात विशेष घटक योजनेत २0१६-१७ मध्ये ४३४ विहिरींचे काम सुरू केले होते. त्यापैकी ७१ पूर्ण तर ३६३ प्रगतीत आहेत. यापैकी ११६ चे तर यंदाच खोदकाम सुरू झाले आहे. यासाठी ९ कोटी रुपये एवढा निधी उपलब्ध झाला आहे. तर आणखी पाच कोटी रुपये लागणार आहेत. तरच ही सर्व कामे पूर्ण होणार आहेत. अन्यथा १00 विहिरींची कामे लटकण्याची भीती आहे. याशिवाय ओटीएसपीमध्ये २३५ विहिरींचे काम सुरू आहे. १.१६ कोटी मिळाले. तर ७0 लाखांची गरज आहे. यातही निधी न मिळाल्यास अडचण आहे. याशिवाय सदस्यांनी बोंडअळी सर्वेक्षणाची अंतिम आकडेवारी कधी मिळेल, अशी विचारणा केली.दरम्यान विशेष घटक योजनेत २0१६-१७ मध्ये १0७ विहिरींचे खोदकाम पूर्ण झाले आहे. त्यावेळी त्यांची देयके पं.स.तून काढावीत, असा नियम होता. मात्र ही कामे करीत असतानाच शासनाचे नवीन कामांसाठी पत्र आले. त्यात जि.प.च्या स्तरावरूनच लाभार्थ्यांना निधी वितरित करण्यास सांगण्यात आले आहे. मात्र त्यामुळे पं.स.तून जि.प.कडे निधी परत मागवावा लागणार आहे. याची प्रक्रिया सुरू असतानाच हा जुना निधी असल्याने तो पं.स.कडून वितरित केला तरीही चालेल, अशी काहींची भूमिका होती. यात नेमका तोडगाच निघत नसल्याने मागील काही महिन्यांपासून निधी असूनही तो लाभार्थ्यांच्या पदरी पडत नसल्याचे चित्र आहे. आजच्या विषय समितीतही यावर ठोस निर्णय घेवून लाभर्थ्यांना लाभ मिळावा, असे सांगण्यात आले.जि.प.च्या कृषी समितीच्या बैठकीनंतर जि.प.सदस्य डॉ.सतीश पाचपुते यांनी विशेष घटक व आदिवासी उपयोजनेत शेतकºयांना पूर्णपणे लाभ मिळण्यासाठी आणखी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली आहे. विशेष घटकमध्ये ४३४ लाभार्थ्यांसाठी १४.३९ कोटींची गरज आहे. यापैकी ९ कोटी मिळाले आहेत. आणखी ५ कोटी दिल्याशिवाय ही कामे पूर्ण करणे शक्य नाही. त्याचबरोबर आदिवासी उपयोजनेतही जवळपास ७0 लाख रुपयांची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे एवढा वाढीव निधी देण्याची मागणीही त्यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.