शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

रेशनकार्डावरील मोफत धान्य आपल्याला मिळाले का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:20 IST

हिंगोली : अन्नसुरक्षा योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना दर महिन्याला दोन किलो तांदूळ व तीन किले गहू, असे पाच किलो धान्य ...

हिंगोली : अन्नसुरक्षा योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना दर महिन्याला दोन किलो तांदूळ व तीन किले गहू, असे पाच किलो धान्य मोफत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या धान्याचे बहुतांश ठिकाणी वाटप होत असले तरी अद्याप काही गावांमध्ये नियमित वाटप होत नसल्याचे आरोप लाभार्थींमधून होत आहेत. त्यामुळे अनेकांना मोफत धान्यापासून वंचित राहावे लागत आहे.

कोरोना संसर्ग वाढल्यामुळे राज्य शासनाकडून कडक निर्बंध लागू केले होते. त्यामुळे जवळपास सर्व व्यवसाय ठप्प झाले होते. पुन्हा निर्बंध शिथिल करण्यात आल्याने बाजारपेठ खुली झाली आहे. तरीदेखील आर्थिक घडी बसण्यासाठी काही वेळ जाऊ द्यावा लागणार आहे. कडक निर्बंध काळात अन्नधान्याविना उपासमार होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य शासनाकडून मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, पुरवठा विभागाकडून धान्याचा पुरवठा करण्यास प्राधान्य देण्यात आले होते. या निर्णयामुळे लाभार्थींमधून समाधान व्यक्त केले जात होते. बहुतांश ठिकाणी धान्य वाटप होत आहे, तर काही ठिकाणी रेशन धान्य वेळेवर मिळत नसल्यामुळे अडचण निर्माण होत आहे. त्यात कोणते धान्य कोणत्या महिन्यातील वाटपाचे आहे, हे स्पष्ट समजत नसल्याने याचा फायदा घेत काही रेशन दुकानदार हे धान्य काळ्याबाजारात विक्री करीत असल्याचा आरोप होत आहेत. मागील आठवड्यात सेनगाव तालुक्यातून रेशनचे धान्य काळ्याबाजारात विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

जिल्ह्यातील एकूण रेशनकार्ड- १८८८७३

अंत्योदय-२६३५९

अन्नसुरक्षा-१३१८३८

शेतकरी-३०७७६

रेशन मिळत असल्याने अडचणीत दिलासा?

कोरोनामुळे अनेकांच्या हातचे काम गेले होते. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. सरकारने मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. नियमित व वेळेवर धान्य मिळत आहे. त्यामुळे लाभार्थींच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटण्यास मदत झाली आहे.

- सुरेश पाईकराव, येलकी

मागील दोन महिन्यांपासून काम नाही. त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली होती. शासनाच्या घोषणेनुसार मोफत रेशन वाटप केले जात आहे. सध्या तरी रेशनसंदर्भात कोणतीही तक्रार नाही. रेशन मिळत असल्याने दिलासा मिळाला आहे.

- दीपक पतंगे, येलकी

कोरोनामुळे हाताला काम मिळणे कठीण झाले आहे. मोफत धान्यामुळे मागील वर्षी दिलासा मिळाला होता. याही वर्षी रेशन वाटप होत आहे, मात्र यातील तांदूळ निकृष्ट दर्जाचा असल्याने लाभार्थी असा तांदूळ घेण्याचे टाळत आहेत.

- सुदर्शन पाईकराव, घोडा

धान्य घेतल्यानंतर अंगठा लावाच

अंगठा लावल्याने कोरोना पसरेल अशी भीती व्यक्त करीत ई-पॉस मशीनवर फक्त रेशन दुकानदाराचा अंगठा लावण्याची परवानगी राज्य शासनाने दिली आहे. याचाच गैरफायदा घेत काही रेशन दुकानदार हे धान्य काळ्याबाजारात विक्री करीत आहेत. त्यामुळे लाभार्थींनी सतर्क राहून दर महिन्याला मोफत धान्य घ्यावे. तसेच पात्र लाभार्थ्यांना एखादा दुकानदार धान्य देत नसेल तर अशांची जिल्हा व तालुका प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.